शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

Nagpur Crime: पैशावर डोळा, ब्लॅकमेलिंगचा प्लॅन! तीन मित्रांनीच मुलाचे केले अपहरण, कट फसताच कारमध्येच केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:02 IST

आधी केले अपहरण : चनकापूर शिवारातील झुडपात आढळला मृतदेह, तिघांना ठोकल्या बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : वडिलांना ब्लॅकमेल करीत पैसे मागण्याच्या उद्देशाने तिघांनी अल्पवयीन मुलाचे आधी अपहरण केले. तिघेही त्याच्या वडिलांचे मित्र आहेत. त्यांनी त्याची कारमध्ये गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह पोत्यात बांधून चनकापूर (ता. सावनेर) शिवारातील झुडपात फेकून दिला. संशयाच्या आधारावर पोलिसांनी वडिलांच्या एका मित्रास ताब्यात घेतले आणि हत्येचे बिंग फुटले. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. १५) रात्री घडली असून, बुधवारी (दि. १७) सकाळी उघडकीस आली.

जितू युवराज सोनेकर (११, रा. वॉर्ड क्रमांक २, खापरखेडा, ता. सावनेर) असे मृत मुलाचे नाव असून, राहुल पाल, यश वर्मा व अरुण भारती (तिघेही रा. चनकापूर, ता. सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही जितूच्या वडिलांचे मित्र होत. जितू हा खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात इयत्ता सहावीत शिकायचा. तो सोमवारी सकाळी शाळेत गेला; पण, सायंकाळी घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. 

शिवाय, तो बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रारही नोंदविली. दरम्यान, बुधवारी सकाळी चनकापूर येथील वेकोलि कॉलनीलगतच्या झुडपात बकऱ्या चारणाऱ्याला त्याचा मृतदेह आढळून आला. डोके व डोळ्याला असलेल्या जखमा व रक्तस्त्रावामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. जितू शाळेत बसने ये-जा करायचा. त्याच्याकडे बसचा पासदेखील आहे. मात्र, तो सोमवारी सायंकाळी बसने घरी येण्याऐवजी पायी निघाला. तो पांढऱ्या कारमध्ये बसून गेल्याची माहिती त्याच्या मित्रांनी देताच आईची शंका राहुलवर गेली. विशेष म्हणजे, तो जितूच्या वडिलांसोबत त्याचा शोध घेत फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली देत दोघांची नावे सांगितली. त्यामुळे खापरखेडा पोलिसांनी तिघांना अटक करीत त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवित तपास सुरू केला. हा गुन्हा ठाणेदार हरीश रुमकर यांच्या मार्गदर्शनात खापरखेडा पोलिस व झोन-५च्या गुन्हे शाखेचे उघड केला.

कारमध्ये आवळला गळा अन् मृतदेह पोत्यात टाकला

जितू आरोपी राहुल पालला ओळखायचा. वडिलांकडे जायचे असल्याने तो सोमवारी सायंकाळी राहुलसोबत एमएच ४०- ए ७२२७ क्रमांकाच्या कारमध्ये बसला, या कारमध्ये बसताना जितूच्या तीन मित्रांनी बघितले होते. राहुल, यश व अरुणने त्याला अण्णामोड, कोराडी मंदिर रोड, बारेगाव, भानेगाव, बिना संगम मार्गे पारशिवनीच्या दिशेने नेले आणि परत पोटा, चनकापूरच्या दिशेने आणले. त्यानंतर रात्री ११ ते १२ वाजताच्या दरम्यान एबी इन्कलाइल कोळसा खाण मार्गावर त्याची कारमध्येच गळा आवळून हत्या केली व मृतदेह पोत्यात टाकला.

शेतीच्या पैशावर डोळा

जितूचे आई-वडील वेगवेगळे राहतात. आई खापरखेडा येथे तिच्या आईकडे तर वडील चनकापूर येथे राहतात. तो आईकडे राहत असला तरी त्याला वडिलांकडे राहायचे होते. त्याचे वडील भाजीपाला विकत असले तरी त्यांची पांढुर्णा (मध्य प्रदेश) येथे शेती आहे. त्या शेतीच्या व्यवहारातून त्यांना काही रक्कम मिळाली होती तर मोठी रक्कम मिळणार होती. या सर्व बाबी राहुलला माहीत होत्या. जितूचे अपहरण करून त्याच्या वडिलांना पाच लाख रुपये मागण्याची त्याने योजना आखली आणि जितूचे अपहरण केले. रात्री तो कारमध्ये चिडचिड करीत असल्याने त्यांनी त्याची हत्या केली.

वेकोलि क्वॉर्टरमध्ये ठेवला मृतदेह

राहुलने वेकोलिच्या चनकापूर येथील एका क्वॉर्टरवर अवैधरीत्या कब्जा केला आहे. या तिघांनी जितूचा मृतदेह पोत्यात भरून त्या क्वॉर्टरमध्ये ठेवला होता. दुर्गंधी येत असल्याने त्यांनी मृतदेह झुडपात फेकला आणि पोते जवळच्या रेतीच्या ढिगाऱ्यात दाबून ठेवले. पोलिसांनी आरोपींकडून कार, क्वॉर्टरमधून स्कूल बॅग आणि रेतीच्या ढिगाऱ्यातून पोते जप्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरKidnappingअपहरण