शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

आंदोलनात सामील झालेल्या दाम्पत्याला घराबाहेर काढणाऱ्या घरमालकाविरुद्ध नागपूरच्या दाम्पत्याचा ऐतिहासिक विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:02 IST

Nagpur : ॲट्रॉसिटीत बौद्धिक संपदा भरपाईसाठी पात्रच ; सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुम्ही दलित असाल, शिक्षण हीच तुमची एकमेव संपत्ती असेल आणि तुमची ही संपत्ती कोणीतरी हिसकावून घेत असेल. तुमची स्वप्ने उद्ध्वस्त करत असेल आणि तुमचा समान संधीचा अधिकार काढून घेत असेल, तर तुम्ही काय कराल? तुम्ही ते जाऊ देणार की लढाल. एका दलित संशोधक दाम्पत्याने याविरोधात लढण्याचे ठरवले. ही लढाई संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात होती. तरी ते लढले आणि जिंकलेही.

डॉ. क्षिप्रा कमलेश उके आणि डॉ. शिव शंकर दास असे या दलित संशोधक दाम्पत्याचे नाव. दोघेही जेएनयूचे पीएच. डी. धारक आहेत. नागपुरातील लक्ष्मीनगरात ते भाड्याने राहायचे. घरमालकासोबत त्यांचे सुरुवातीला चांगले संबंध होते. परंतु रोहित वेमुला आत्महत्येनंतर झालेल्या आंदोलनात त्यांच्या सक्रीय सहभागानंतर मात्र घरमालकाचे घर खाली करण्यासाठी दबाव टाकू लागले. त्यावेळी क्षिप्रा आठ महिन्याची गर्भवती होती. त्यांनी थोडा अवधी मागितला. परंतु ते ऐकायला तयार नव्हते. या काळात त्यांनी बराच मानसिक त्रास सोसला. ८ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांच्या अनुपस्थितीत पोलिसांना हाताशी धरून घर मालकाच्या मुलाने घर रिकामे केले. यात दोघांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांसह लॅपटॉप आणि पेनड्राइव्हमधील प्रचंड संशोधन डेटा, ५ हजार सर्वेक्षण नमुने, शैक्षणिक प्रकाशने आणि प्रमाणपत्रे आर्दीचे नुकसान झाले होता.

या विरोधात त्यांनी न्यायालयात अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत दाद मागितली. तसेच बौद्धिक संपत्तीच्या नुकसानीची मागणी केली. डॉ. क्षिप्रा यांनी स्वतः न्यायालयात बाजू मांडली. १० नोव्हेंबर २०२३ रोजी उच्च न्यायालयाच्या न्या. विनय जोशी व न्या. वाल्मिकी मेंझेस यांच्या खंडपीठाने बौद्धिक संपदा हीदेखील मालमत्ता असल्याचा निर्वाळा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी दहा मुद्यांवर भरपाईची रक्कम ठरवावी, असे निर्देश दिले. महाराष्ट्र सरकारने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली. २४ जानेवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आणि उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल कायम ठेवला.

बौद्धिक संपत्ती ही कोणत्याही अन्य स्थावर किंवा जंगम मालमत्तेसारखी मौल्यवान संपत्ती असल्याचे उच्च न्यायालयाने मान्य केले. त्या निकालाला आव्हान देणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. परिणामी, सरकारला बौद्धिक संपत्तीच्या नुकसानीसाठी एससी, एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे.

१२७ कोटी रूपये भरपाईचा दावायाचिकाकर्त्यांनी ही भरपाईची रक्कम तब्बल १२७ कोटी असल्याचा दावा केला आहे तर सामाजिक न्याय विभागाच्या मते उच्च न्यायालयाच्या निकालावेळी ही रक्कम ७६ लाख रूपये होती. 

भारतातील पहिले प्रकरणअनुसूचित जाती और अनुसूचित जमाती (अत्याचार निवारण) अधिनियम कायद्यात बौद्धिक संपदा ही पीडितांची मालमत्ता असू शकते का हे स्पष्ट नाही. या दलित दाम्पत्याने न्यायव्यवस्थेला बौद्धिक संपत्ती ही मौल्यवान मालमत्ता म्हणून मान्यता देण्याची बाब पटवून दिली. न्यायालयानेसुद्धा ही बाब मान्य करीत ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले. हे देशातील पहिलेच प्रकरण आहे

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय