शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Nagpur Garbage Issue : महापौर व आयुक्तांचा मुखवटा घालून चक्क ७५ कचरा ढिगार्‍यांचे उद्धाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 14:28 IST

नागपूर महानगरपालिकेने शहरास 'बीन फ्री सिटी' म्हणजेच "कचरापेटी मुक्त शहर" घोषित केले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वस्त्यांमध्ये कचरा गाड्या नियमित येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा टाकावा लागतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. (garbage issue in nagpur)

ठळक मुद्देनागपूर सिटिझन्स फोरमचे लक्षवेधी आंदोलन

नागपूर : शहरात कचऱ्याची समस्या (Garbage Issue) मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे भरमसाठ वाढलेल्या प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने त्यावर निर्बंध आणले. मात्र, इतके असुनही शहरात ठिकठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग लागलेला दिसतो. नुकतचं काही दिवसांआधी कचरा संकलन करणारी वाहनं नियमित येत नसल्याची बाब समोर आली होती. (garbage problem in nagpur)

नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Municipal Corporation) शहरास 'बीन फ्री सिटी' (bin free city) म्हणजेच "कचरापेटी मुक्त शहर" घोषित केले आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती काही वेगळीच आहे. पूर्वी वस्त्यावस्त्यांमध्ये कचरा संकलनासाठी (Garbage Collection) ज्या कचरा पेट्या किंवा मोठे कंटेनर होते ते काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे जागोजागी कचर्‍याचे ढीग साचल्याचे पहायला मिळते. अनेक वस्त्यांमध्ये कचरा गाड्या नियमित येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा टाकावा लागतो. ओल्या कचर्‍यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

 शहरातील कचर्‍याच्या समस्येकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने रविवारी अनोखे आंदोलन केले. महापौर व आयुक्तांचा मुखवटा घालून शहरातील तब्बल ७५ कचरा ढिगार्‍यांसमोर लाल फित कापून या ढिगार्‍यांचे उद्धाटन करण्यात आले. सिटीझन्स फोरमने रविवारी पश्चिम नागपुरातील पोलीस लाईन टाकळी, उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती नगर, मध्य नागपुरातील रेल्वे स्टेशन व काॅटन मार्केट परिसरात हे प्रतिकात्मक आंदोलन केले. फोरमने कचर्‍याचे ढीग जमा होणारे शहरातील ७५ स्पाॅट शोधून त्याठिकाणी हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. रविवारपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे.

स्वच्छ नागपूर सुंदर नागपूरचा दावा कितपत खरा?

नागपूरची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याचा दावा महानगरपालिका करते. याचवेळी स्वच्छ व सुंदर शहराचा ठेंभा ही मिरवला जातो मात्र हा दावा किती फोल आहे हे वस्त्यावस्त्यांमधील कचर्‍याच्या ढिगार्‍याकडे पाहिल्यावर लक्षात येत असल्याचे फोरमचे पदाधिकारी अभिजीत झा यांनी म्हटले आहे. बीन फ्री सिटी हे एक मोठे थोतांड असून हा जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. नियमित साफसफाई व कचरा संकलन झाले तर अशा प्रकारे कचर्‍याचे ढीग जमा होणार नाहीत. महापालिका प्रशासन व पदाधिकार्‍यांनी संवेदनशीलता दाखवून ही समस्या मार्गी लावण्याची गरज असल्याचे झा म्हणालेत.

विनंती अर्जांनाही केराचीच टोपली

निवेदन, अर्ज, विनंत्या करुन कचर्‍याची समस्या सुटत नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला अशा प्रकारचे आंदोलन करावे लागत असल्याचे फोरमने म्हटले आहे. महानगरपालिका प्रशासन व पदाधिकार्‍यांनी हा विषय गांभिर्याने घेतला नाही तर येत्या काळात ज्या ज्या ठिकाणी कचरा दिसेल त्याठिकाणी पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवकांच्या नावाने त्या जागेचे नामकरण करण्याचा इशारा नागपूर सिटीझन्स फोरमने दिला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणGarbage Disposal Issueकचरा प्रश्नnagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका