शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आर्थिक तंगीच्या वैफल्यातून संपूर्ण कुटुंबच संपले; आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 16:59 IST

नागपूरातील कार जळीतकांड प्रकरणातील व्यावसायिक भट यांच्या मुलाचेदेखील निधन

नागपूर : आर्थिक विवंचनेमुळे स्वत: ला कारमध्ये जाळून घेणाऱ्या उद्योजक रामराज भट यांच्या पत्नीनंतर आता मुलगा नंदन याचे देखील निधन झाले आहे. आईवडिलांचा अशाप्रकारे अंत झाल्याने त्याला प्रचंड धक्का बसला होता व ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. आर्थिक तंगीच्या वैफल्यातून संपूर्ण कुटुंबाचा अशाप्रकारे अंत झाल्याने नातेवाईक शोकाकुल झाले आहे. या प्रकरणात दोष कुणाचा होता व याची जबरी शिक्षा कुणाला मिळाली असाच सवाल व्यक्त करण्यात येत आहे.

रामराज भट यांचे व्यवसायात खूप नुकसान झाले होते. आर्थिक कोंडीमुळे ते प्रचंड अस्वस्थ होते. आर्थिक विवंचनेतून भट यांनी स्वत: सह कुटुंबीयांना संपविण्याचा निर्णय घेतला. १९ जुलै रोजी वर्धा मार्गावरील एका पॉश हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी व मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी व मुलाला पिण्यासाठी विष दिले. दोघांनाही संशय आल्याने भट यांनी हे ॲसिडिटीचे औषध असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळील बाटलीतील द्रव पदार्थ तिघांवरही फवारला आणि पत्नी व मुलाला काही समजण्यापूर्वी त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले ; परंतु आई व मुलगा जखमी झाले. तर वडिलांचा मात्र मृत्यू झाला. त्यांच्या सुसाईड नोट वरून कारणाचा खुलासा झाला.

संगीता या हल्ल्यात ६० टक्क्यांहून अधिक भाजल्या होत्या. २४ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाच दिवसांच्या अंतराने वडील व आई गमावल्याने नंदनला मोठा धक्का बसला होता. त्याची प्रकृती आणखी खालावत गेली व मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले, अशी माहिती बेलतरोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव यांनी दिली.

 

वडिलांच्या हट्टामुळे नंदनचे स्वप्न भंगले

दरम्यान, नंदनच्या बयाणातून मोठा खुलासा झाला आहे. त्याचे वडील २०१४ पर्यंत एका कंपनीचे वर्कशॉप चालवत होते. मात्र त्यानंतर ते घरीच होते. नंदन हा बी.ई. झाला होता व त्याला नोकरीत अजिबात रस नव्हता. त्याला स्वत: चा व्यवसाय सुरू करायचा होता. मात्र त्याचे वडील नोकरीसाठी दबाव टाकत होते. नंदन युट्यूब वरील व्हिडीओ पाहून ऑनलाईन स्टॉक मार्केटचे धडे घेत होता. परंतु त्याच्या वडिलांच्या आत्मघातकी पावलामुळे त्याचे स्वप्न नेहमीसाठीच भंगले.

नंदनच्या बयाणाच्या आधारावरच वडिलांवर हत्येचा गुन्हा

भट यांची पत्नी व मुलगा यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांचे बयाण घेणे पोलिसांना शक्य झाले नव्हते. संगीता यांचा मृत्यू झाल्याने नंदनच्या बयाणावरच अनेक गोष्टी अवलंबून होत्या. बेलतरोडी पोलिसांनी अखेर त्याचे बयाण घेतले. वडील असे काही पाऊल उचलतील याची काहीच कल्पना नव्हती, असे त्याने सांगितले होते. त्याच्या बयाणाच्या आधारावर पोलिसांनी रामराज भट यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूर