शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अटल ‘काव्यांजली’चा नागपूर भाजपाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 12:14 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त त्यांना ‘काव्यांजली’ देण्यासंदर्भात भाजपाच्या ‘हायकमांड’कडून आवाहन करण्यात आले होते. नागपुरात मात्र आयोजनाचा शहर भाजपाला विसर पडला.

ठळक मुद्देशहर भाजपातर्फे कुठलाच पुढाकार नाही देशात मात्र ठिकठिकाणी आयोजन

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त देशभरात त्यांना ‘काव्यांजली’ देण्यासंदर्भात भाजपाच्या ‘हायकमांड’कडून आवाहन करण्यात आले होते. देशातील विविध ठिकाणी यासंदर्भात आयोजनदेखील झाले. मात्र अटलजींचा ऋणानुबंध असलेल्या नागपुरात मात्र आयोजनाचा शहर भाजपाला विसर पडला. वाजपेयींच्या अस्थींच्या कलशयात्रेत समोर असलेल्या नेत्यांनीदेखील यासंदर्भात कुठलाही पुढाकार घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ आॅगस्ट रोजी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोक पाळण्यात आला. शिवाय त्यांच्या अस्थींच्या कलशाची देशभरात ठिकठिकाणी यात्रादेखील काढण्यात आली. अटलजींच्या प्रथम मासिक पुण्यतिथीनिमित्त त्यांना ‘काव्यांजली’ अर्पण करून त्यांच्या स्मृतींचा जागर करण्यात यावा. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात याचे आयोजन होईल, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. यात अटलजींच्या कवितांचे वाचन, कविसंमेलन यांचे आयोजन यांचादेखील समावेश असेल, असे शाह यांनी स्पष्ट केले होते.त्याअनुसार १६ व १७ सप्टेंबर रोजी देशाच्या राजधानीसह विविध ठिकाणी ‘काव्यांजली’चे आयोजन करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी त्या त्या क्षेत्रातील मोठे नेते, कवी उपस्थित होते. मात्र नागपूर भाजपाला मात्र बहुधा राष्ट्रीय अध्यक्षांच्या घोषणेचाच विसर पडला. त्यामुळेच की काय शहरात एकाही विधानसभा क्षेत्रात कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अटलजींच्या अस्थींच्या कलश यात्रेत शहरातील अनेक नेते उपस्थित होते. त्यांनीदेखील या आयोजनासंदर्भात कुठलाही पुढाकार घेतला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शहराध्यक्ष म्हणतात, एकत्रित आयोजन करणारयासंदर्भात प्रतिक्रियेसाठी शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी १६ व १७ सप्टेंबर रोजी आयोजन झाले नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वेगवेगळे आयोजन करण्याऐवजी एकत्रित आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. याबाबत आमची प्राथमिक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आयोजन नेमके कधी होणार व त्याचे स्वरुप कसे होणार याबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ‘काव्यांजली’चे आयोजन करण्याचे निर्देश अमित शाह यांनी दिले होते.

‘कार्यांजली’ चौकटीत बांधली गेली‘काव्यांजली’ झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या आठवडा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू होणारा सेवा सप्ताह पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपर्यंत चालेल व ही अटलजींना ‘कार्यांजली’ असेल, असे निर्देशदेखील अमित शाह यांनी दिले होते. नागपुरात सोमवारपासून काही प्रभागांमध्ये सोमवारपासून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनीदेखील यात सहभाग घेतला. मात्र प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वेगळे स्वच्छता अभियान व आरोग्य शिबीरांचे आयोजन झाले नसल्याची माहिती भाजपच्याच एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

‘सोशल मीडिया’वर शांतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी ‘पोस्ट’ टाकण्यात भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते आघाडीवर होते. मात्र अटल ‘काव्यांजली’ व ‘कार्यांजली’चा उल्लेखदेखील दिसून आला नाही. अटलजींच्या नावाने ‘काव्यांजली’चा उपक्रम होणार की नाही, असा प्रश्न भाजपच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा