शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  आठवलेंची रिपाइं भाजपवर नाराज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 20:05 IST

गेल्या निवडणुकीमध्ये रिपाइं(आ)ने भाजपाशी युती केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात मंत्री झाले. परंतु कार्यकर्त्यांना मात्र काहीही मिळाले नाही. गेल्या चार वर्षांत सामान्य कार्यकर्त्यांना या युतीचा कवडीचा फायदा झाला नसल्याची टीका करीत भाजपावर नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देयुतीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी : शहर कार्यकारिणीचा ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या निवडणुकीमध्ये रिपाइं(आ)ने भाजपाशी युती केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात मंत्री झाले. परंतु कार्यकर्त्यांना मात्र काहीही मिळाले नाही. गेल्या चार वर्षांत सामान्य कार्यकर्त्यांना या युतीचा कवडीचा फायदा झाला नसल्याची टीका करीत भाजपावर नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर युतीबाबत पुनर्विचार करावा, असा ठरावदेखील शहर कार्यकारिणीने पारित केला असून, त्याबाबत पक्ष नेतृत्वाला कळविले आहे.रिपाइं(आ.)चे शहर अध्यक्ष बाळू घरडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कार्यकारिणीची बैठक रविभवन येथे पार पडली. बैठकीत कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराची घटना आणि त्यातील आरोपींवर होत नसलेल्या कारवाईबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपा-रिपाइं(आ.) युतीला सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण होत आहेत. या युतीचा दलित, शोषित,वंचित, पीडित आदिवासी, अल्पसंख्यक आणि शेतकरीवर्गाला कवडीचाही फायदा झालेला नाही, अशी जाहीर नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाकडे कर्ज वाटण्यासाठी निधीच उपलब्ध नाही. परिणामी होतकरू युवकांना आर्थिक आधार मिळत नसल्याने बेरोजगारीची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.युती होत असताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी जी आश्वासने दिली होती त्या आश्वासनाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे या युतीबाबत पुनर्विचार व्हावा, अशी विनंती पक्ष नेतृत्वाला करण्यात आली आहे.बैठकीत पुरुषोत्तम गायकवाड, भीमराव मेश्राम, बंटी अलेक्झांडर, सिद्धार्थ कांबळे, अ‍ॅड. भीमराव कांबळे, डॉ. मनोज मेश्राम, निशिकांत हुमणे, हरीश जानोरकर, प्रभाकर गेडाम, सुमित कुरिल, रवी सूर्यवंशी, संदेश खोब्रागडे, धर्मपाल गजभिये, वीरेंद्र मेश्राम, सुमित एकवारे, साजर मेश्राम, रामेश्वर काळबांडे, राजकृष्ण गजभिये, राजू घोंगाडे, डॅसमंड जॉन, जितेंद्र पुंजे आदी उपस्थित होते.स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी पंतप्रधानांना निवेदनयेत्या १२ मार्च रोजी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलन होणार आहे. त्यासाठी शहरातून हजारो कार्यकर्ते सहभागी होतील. १३ मार्च रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात येईल. त्यासाठी शहरात स्वतंत्र विदर्भ राज्य जनजागरण अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण