शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नागपूर अधिवेशनाचा फटका; कर्मचारी वसतिगृहात आणि विद्यार्थी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 10:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिष्यवृत्ती आणि जात वैधता प्रमाणपत्रामुळे आधीच विद्यार्थी त्रस्त असून, यामुळे विद्यार्थांमध्ये रोष पसरला आहे.गेल्या चार दशकात पहिल्यांदाच पावसाळी ...

ठळक मुद्देचोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिष्यवृत्ती आणि जात वैधता प्रमाणपत्रामुळे आधीच विद्यार्थी त्रस्त असून, यामुळे विद्यार्थांमध्ये रोष पसरला आहे.गेल्या चार दशकात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. यासाठी १० हजारांवर अधिकारी, कर्मचारी दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी कळमना मार्केट, शासकीय समाजभवन हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. विधानभवनापासून काही स्थळ लांब असल्याने ते वगळण्यात आल्याचे समजते. विधिमंडळ अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय शासकीय वसतिगृहात करण्यात येत आहे. चोखामेळा वसतिगृहातील खोल्या पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहच खाली करण्यात सांगितले आहे. काही विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडल्याची माहिती आहे. चोखामेळा वसतिगृहात दीडशेवर मुलांच्या राहण्याची सोय आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाळा असल्याने स्थानिक प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहाची मागणी केली होती. विद्यार्थ्यांना हलविण्यास त्यांची गैरसोय होईल, असे म्हणत समाजकल्याण विभागाने विरोध दर्शविला. ाात्र प्रशासनाने वसतिगृह देण्याचे आदेश काढल्याची माहिती आहे. विदर्भातील शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात घेण्यात येते. मात्र हे अधिवेशनच विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.

चोखामेळा वसतिगृह पाडून त्या जागी नवीन वसतिगृहाची इमारत बांधण्यात येणार आहे. याचे कार्य महाविद्यालये सुरू होण्यापूर्वीच सुरू करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्था इतरत्र करण्यात येत आहे. त्यामुळे वसतिगृहात यंदा नवीन विद्यार्थ्यांना ठेवण्यात आले नाही. जुन्या विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे सुरू आहे. यातच अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृह द्यावे, त्यानंतर इमारतीचे काम सुरू करावे, अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली. अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आलेले नाही.- विजय वाकुळकर,समाजकल्याण अधिकारी

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८