शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

Nagpur: विनासुरक्षा ५०० किलो स्फोटके हाताळत होते शिकाऊ कामगार, स्फाेटात ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 07:59 IST

Nagpur Blast: नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत.

- जितेंद्र ढवळे/ नरेश डोंगरे/ योगेश पांडेनागपूर - नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी नागपूर-अमरावती मार्ग रोखून धरला होता. हा स्फोट नेमका कसा झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना, सूत्रांनी स्फोटावेळी केवळ शिकाऊ कामगार व महिलाच कामाला होत्या. सुमारे ५०० किलो स्फोटके व वातींमध्ये काम करताना पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्यानेच त्यांना जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

घटनेचे कारण अस्पष्ट‘लोकमत’ने या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. प्रामुख्याने फटाक्यांसाठी लागणाऱ्या वाती, सेफ्टी फ्युजेस व मायक्रोकॉर्ड बनविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येते. त्यासाठी परिसरातील तरुण व महिला कामावर होते. पॅकिंग युनिटमध्ये स्फोटके ठेवून वाती तयार केल्या जात होत्या. गुरुवारी नऊ कामगार आत असताना अचानक स्पार्क झाला व पूर्ण स्फोटके, वातींनी क्षणार्धात पेट घेतला. स्फोटाची तीव्रता माेठी होती व त्यामुळे कामगारांना हलण्यासदेखील वेळ मिळाला नाही. 

रोषाचा भडका : या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर संतप्त कामगार आणि गावकऱ्यांच्या रोषाचा भडका उडाला. त्यांनी व्यवस्थापन तसेच प्रशासनाच्या अनास्थेचे गाऱ्हाणे मांडून त्यांचा निषेध नोंदवत नागपूर-अमरावती महामार्गावरची वाहतूक रोखली. घटनास्थळी मोठा पोलिस ताफा तैनात करण्यात आला. 

एक मीटरमागे दोन मिलीग्रॅम बारूदवात तयार करण्याची प्रक्रिया मशीनच्या माध्यमातून होत होती. त्याचे पॅकिंगचे काम कामगार करायचे. एक मीटर वातीमागे जवळपास दोन मिलीग्रॅम बारूद वापरण्यात येत होता. तेथे चारकोल, सल्फर, पोटॅशिअम होते. पॅकिंग झालेल्या वाती बॉक्समध्ये ठेवण्यात येत होत्या. एका अर्थाने त्या जिवंत वाती होत्या व घर्षणामुळे स्पार्क होऊन स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

नेमके काय घडले?२२ एकरांत पसरलेल्या कंपनीत बारूद व फटाक्याच्या वाती तयार केल्या जातात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी अचानक भीषण स्फोट झाला. मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर अवस्थेत विव्हळणाऱ्या जखमींसाठी गावकरी रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करीत होते. मात्र, प्रशासन थंड होते.दीड तासानंतर रुग्णवाहिका पोहोचली. अग्निशमन दलाचे बंबही पोहोचले. तोपर्यंत चार ते पाचजणांचा मृत्यू झाला होता. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी शीतल चटप (क्षीरसागर) या विवाहितेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनास्थळी धाव : पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. 

 

टॅग्स :nagpurनागपूरBlastस्फोट