शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Nagpur: विनासुरक्षा ५०० किलो स्फोटके हाताळत होते शिकाऊ कामगार, स्फाेटात ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 07:59 IST

Nagpur Blast: नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत.

- जितेंद्र ढवळे/ नरेश डोंगरे/ योगेश पांडेनागपूर - नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात चार तरुणी, एक विवाहिता अन् एक पुरुष अशा सहाजणांचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी नागपूर-अमरावती मार्ग रोखून धरला होता. हा स्फोट नेमका कसा झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना, सूत्रांनी स्फोटावेळी केवळ शिकाऊ कामगार व महिलाच कामाला होत्या. सुमारे ५०० किलो स्फोटके व वातींमध्ये काम करताना पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्यानेच त्यांना जीव गमवावा लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

घटनेचे कारण अस्पष्ट‘लोकमत’ने या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. प्रामुख्याने फटाक्यांसाठी लागणाऱ्या वाती, सेफ्टी फ्युजेस व मायक्रोकॉर्ड बनविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येते. त्यासाठी परिसरातील तरुण व महिला कामावर होते. पॅकिंग युनिटमध्ये स्फोटके ठेवून वाती तयार केल्या जात होत्या. गुरुवारी नऊ कामगार आत असताना अचानक स्पार्क झाला व पूर्ण स्फोटके, वातींनी क्षणार्धात पेट घेतला. स्फोटाची तीव्रता माेठी होती व त्यामुळे कामगारांना हलण्यासदेखील वेळ मिळाला नाही. 

रोषाचा भडका : या भीषण स्फोटाच्या घटनेनंतर संतप्त कामगार आणि गावकऱ्यांच्या रोषाचा भडका उडाला. त्यांनी व्यवस्थापन तसेच प्रशासनाच्या अनास्थेचे गाऱ्हाणे मांडून त्यांचा निषेध नोंदवत नागपूर-अमरावती महामार्गावरची वाहतूक रोखली. घटनास्थळी मोठा पोलिस ताफा तैनात करण्यात आला. 

एक मीटरमागे दोन मिलीग्रॅम बारूदवात तयार करण्याची प्रक्रिया मशीनच्या माध्यमातून होत होती. त्याचे पॅकिंगचे काम कामगार करायचे. एक मीटर वातीमागे जवळपास दोन मिलीग्रॅम बारूद वापरण्यात येत होता. तेथे चारकोल, सल्फर, पोटॅशिअम होते. पॅकिंग झालेल्या वाती बॉक्समध्ये ठेवण्यात येत होत्या. एका अर्थाने त्या जिवंत वाती होत्या व घर्षणामुळे स्पार्क होऊन स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

नेमके काय घडले?२२ एकरांत पसरलेल्या कंपनीत बारूद व फटाक्याच्या वाती तयार केल्या जातात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळपासून बारूद पॅकिंग व हाताळणीचे काम सुरू असताना दुपारी अचानक भीषण स्फोट झाला. मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर अवस्थेत विव्हळणाऱ्या जखमींसाठी गावकरी रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करीत होते. मात्र, प्रशासन थंड होते.दीड तासानंतर रुग्णवाहिका पोहोचली. अग्निशमन दलाचे बंबही पोहोचले. तोपर्यंत चार ते पाचजणांचा मृत्यू झाला होता. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी शीतल चटप (क्षीरसागर) या विवाहितेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनास्थळी धाव : पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. 

 

टॅग्स :nagpurनागपूरBlastस्फोट