शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

पुढील उन्हाळ्यापर्यंत नागपुरात २४ तास पाणी : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:54 IST

२४ बाय ७ योजना राबविणारे नागपूर हे देशातील पहिले शहर आहे. सध्या पेंचमध्ये पाण्याची अडचण आहे. मात्र शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्यादृष्टीने व्यवस्था उभारण्यात येत आहे. पुढील उन्हाळ्यापर्यंत नागपुरात २४ तास पाणी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. एकता नगरजवळील जयहिंद सोसायटी येथे आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देविकासाच्या कामांमध्ये राजकारण नको

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २४ बाय ७ योजना राबविणारे नागपूर हे देशातील पहिले शहर आहे. सध्या पेंचमध्ये पाण्याची अडचण आहे. मात्र शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्यादृष्टीने व्यवस्था उभारण्यात येत आहे. पुढील उन्हाळ्यापर्यंत नागपुरात २४ तास पाणी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. एकता नगरजवळील जयहिंद सोसायटी येथे आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.यावेळी मंचावर माजी खासदार दत्ता मेघे, बरिएमंच्या नेत्या अ‍ॅड.सुलेखा कुंभारे, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, रमेश मानकर, नगरसेवक अविनाश ठाकरे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, संदीप गवई, रिपाइंचे राजू बहादुरे, रमेश भंडारी प्रामुख्याने उपस्थित होते. मागील पाच वर्षांत नागपूरचे चित्र बदलले आहे. झपाट्याने विकास होत असून ‘मेट्रो’ शहर अशी उपराजधानीची ओळख निर्माण झाली आहे. याहून पुढे जात ‘ब्रॉडगेज मेट्रो’ ही वर्धासारख्या शहरांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे तेथून नागपूरला येण्यासाठी अवघी ३५ मिनिटे लागणार आहेत. अजनी रेल्वेस्थानक हे जगातील सर्वात सुंदर व मोठे रेल्वेस्थानक राहणार आहे. क्रीडा, शिक्षण, दळणवळण, पायाभूत सुविधा, रस्ते, सांस्कृतिक क्षेत्र सर्वच बाबींचा विकास झाला आहे. नागपूर जगातील सर्वात चांगले शहर झाले पाहिजे, असा मानस आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.विदेशातदेखील केले कामदेशात दळणवळणाच्या क्षेत्रात १७ लाख कोटींच्या कामाचे वाटप झाले आहे. मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे विदेशातदेखील काम करण्याची संधी मिळाली. इराणमध्ये चाबहार येथे अत्याधुनिक बंदर बांधण्यात आले. तर बांगलादेशमध्ये अडीचशे कोटी खर्च करून जलमार्ग तयार करण्यात आला. याशिवाय भारत, भूतान, बांगलादेश, नेपाळ यांना जोडणारे रस्ते व पूल बांधण्याचे कामदेखील सुरू असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.विकास हेच राजकारणाचे ध्येय हवेमी जात, पंथ, धर्म इत्यादींच्या राजकारणाला मानत नाही. विकास हेच ध्येय असले पाहिजे व विकासाच्या कामात राजकारण व्हायला नको. जनप्रतिनिधींनी पाच वर्षांच्या कामाचा हिशेब जनतेला दिलाच पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.मानवी शोषण समाप्त झाल्याचे समाधानआपल्या देशात सायकल रिक्षांचे प्रस्थ होते. मात्र माणसाने माणसांना ओढणे हे एकप्रकारचे शोषणच होते. ‘ई रिक्षा’ आल्यामुळे सायकलरिक्षा चालकांचे कष्ट संपले व ते ‘ई रिक्षा’चालक झाले आहे. देशात एक कोटीच्या वर ‘ई रिक्षा’ चालक आहे. माझ्या कार्यकाळात मानवी शोषण समाप्त झाल्याचे मोठे समाधान आहे, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.‘बुुद्धिस्ट सर्किट’चे काम वेगातभगवान गौतम बुद्ध यांच्याशी निगडीत असलेल्या जागांना जोडणाऱ्या ‘बुद्धिस्ट सर्किट’चे काम वेगाने सुरू आहे. अनेकांना यावर विश्वास बसत नव्हता. मात्र तेथे गेलेल्या बौद्ध भिख्खूंनी याला दुजोरा दिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे देशासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरून लोक बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जास्त प्रमाणात पुढाकार घेतील, असे गडकरी म्हणाले.राष्ट्रीय कार्यात जैन बांधव अग्रेसरदरम्यान, शनिवारी नितीन गडकरी यांनी इतवारी येथील अहिंसा भवन येथे आयोजित जैन समाज स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थिती लावली. जैन बांधवांची सौहार्दपूर्ण वागणूक निश्चितच अनुकरणीय आहे. देशात कुठलेही नैसर्गिक संकट आले तर मदतीचा हात पुढे करणाऱ्यांमध्ये जैन बांधव मोठ्या संख्येने पुढे असतात. भगवान महावीर यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे जैन बांधव ही संस्कृती सातत्याने जपतात हे अधोरेखित करण्यासारखे आहे. राष्ट्रीय कार्यामध्ये जैन बांधव अग्रेसर असतात, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. या संमेलनाला आ. गिरीश व्यास,आ. विकास कुंभारे, प्रफुल्ल दोशी, मनीष मेहता, नरेश पाटनी, संतोष पेंढारी, नरेंद्र कोठारी, अनिल पारख , सुमित लल्ला, सुभाष कोटेचा, पंकज भन्साली, राजेंद्र प्रसाद वैद, अजय वैद्य, निखिल कुसुमगर, सुरेंद्र लोढा, गणेश जैन, दिलीप राका प्रामुख्याने उपस्थित होते

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Gadkariनितीन गडकरी