शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मिरची १०० तर कोथिंबीर १२० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 10:04 IST

खरीप हंगामामुळे नागपूर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाज्यांची आवक कमी तर बाहेरून जास्त आहे. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले आहेत.

ठळक मुद्देदोन महिने भाज्या महाग मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामामुळे नागपूर जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून ठोक बाजारात भाज्यांची आवक कमी तर बाहेरून जास्त आहे. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले आहेत. सामान्यांसाठी वांगे, पत्ताकोबी, कोहळे, पालक, लवकी परवडणाऱ्या किमतीत आहे. पेरणीनंतर शेतकरी भाज्यांची लागवड करतील. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास भाव कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.स्थानिक शेतकऱ्यांकडून केवळ १० टक्के भाज्यांची आवक सुरू आहे. बहुतांश भाज्या नागपूर जिल्ह्याबाहेरून आणि अन्य राज्यातून येत असल्यामुळे सध्या भाज्या महाग आहेत. पत्ताकोबी वर्षभर मुलताई येथून विक्रीला येते. टोमॅटो संगमनेर, नाशिक या भागातून तर तोंडले, भिलई, रायपूर, दुर्ग येथून आणि गेल्या सात ते आठ वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातून कोहळे आणि हिरवी मिरची मोठ्या प्रमाणात नागपूर बाजारपेठेत येत आहे.परतवाडा येथून बारीक हिरव्या मिरचीची आवक आहे. तसे पाहिल्यास एक महिन्यापासून भाज्यांच्या किमती स्थिर आहेत. कॉटन मार्केटमध्ये दररोज लहानमोठ्या ६० ते ७० गाड्या आणि कळमन्यात १२० ट्रकची आवक आहे. पण किरकोळमध्ये दुप्पट आणि तिपटीच्या भावात विक्री होत असल्यामुळे गृहिणींना भाज्या जास्त भावातच खरेदी कराव्या लागतात, अशी माहिती कॉटन मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली.

फूलकोबी ४० रुपयांवरकॉटन मार्केट आणि कळमना ठोक बाजारात भाज्यांची आवक चांगली असतानाही किरकोळमध्ये गृहिणींना भाज्या दुप्पट भावातच खरेदी कराव्या लागतात. काही भाज्यांमुळे गृहिणींचे बजेट वाढले आहे. कॉटन मार्केटमध्ये फूल कोबी २५ रुपये आणि हिरव्या मिरचीचे भाव ५० रुपये आहेत. पण किरकोळमध्ये फूलकोबी प्रति किलो ५० रुपये आणि हिरवी मिरची ८० ते १०० रुपयांपर्यंत खरेदी करावी लागते. दुपटीच्या आकडेवारीनुसार किरकोळमध्ये वांगे प्रति किलो १५ रुपये, पत्ताकोबी ३० रुपये, कोहळे ३०, लवकी २०, भेंडी ५०, कारले ७०, तोंडले ४० ते ५० रु., सिमला मिरची ८०, चवळी शेंग ३५, गवार ४०, बीन्स ८०, परवल ६०, ढेमस ६०, पालक २५, चवळी भाजी ४०, मेथी ८० रु., काकडी ४०, मुळा ४०, गाजर ४०, फणस ६० आणि कैरीचे प्रति किलो भाव ३० ते ४० रुपये आहेत.टोमॅटोही आले ४० वरपावसामुळे कोथिंबीर खराब झाल्यामुळे भाव अचानक वाढले. स्थानिकांकडून आवक नगण्य आहे. सध्या कोथिंबीर नांदेड, छिंदवाडा, उमरानाला आणि रामकोना येथून विक्रीस येत आहे. आवक कमी असल्यामुळे कॉटन मार्केटमध्ये दर्जानुसार ७० ते ८० रुपये किलो विक्री सुरू आहे. किरकोळमध्ये १२० ते १३० रुपयांपर्यंत गृहिणींना खरेदी करावी लागत आहे. महिन्यापासून कमी असलेले टोमॅटोचे भाव किरकोळमध्ये ४० रुपयांपर्यंत वाढले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक बंद आहे. पण सध्या नाशिक, संगमनेर या भागातून नागपुरात वर्षभर टोमॅटो विक्रीस येतात.

टॅग्स :vegetableभाज्या