शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात   ९० किमी वेगाने धावली माझी मेट्रो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 21:54 IST

आरडीएसओद्वारे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ऑसिलेशन ट्रायल घेण्यात आली. महामेट्रोने चार हजार पोती भरून ९० किमी प्रती तासाने ट्रायल घेतली.

ठळक मुद्दे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनचा प्रवास २० मिनिटात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या रिच-१ मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली असली तरी नागरिकांच्या सोयी सवलती आणि सुरक्षेच्या अनुषंगाने कार्य चालू आहेत. आरडीएसओद्वारे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ऑसिलेशन ट्रायल घेण्यात आली. महामेट्रोने चार हजार पोती भरून ९० किमी प्रती तासाने ट्रायल घेतली.११.५ कि.मी लांबीच्या या मार्गावर आरडीएसओचे निरीक्षण घेण्यात आले. ९७० प्रवाशांच्या वजनाइतकी म्हणजे ६३ टन रेतीची पोती रेल्वेत भरली होती. रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) यांच्या उपस्थितीत परीक्षण घेण्यात आले. गाडीत काही यंत्राच्या साहाय्याने गतीमर्यादा आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या कंपनाची नोंद घेण्यात आली. आरडीएसओच्या मापदंडानुसार ही चाचणी घेण्यात आली.सुरुवातीला पूर्णपणे रिकाम्या आणि नंतर पूर्ण वजनाने भरून ५० किमी वेगाने मेट्रो चालविण्यात आली. हळूहळू वेग वाढविण्यात आला. त्यानंतर ताशी ९० किमीपर्यंत चालविण्याची परीक्षाही मेट्रोने उत्तीर्ण केली. परीक्षणासाठी डीएमसी-ए फर्स्ट बोगी, टीसी फर्स्ट बोगी आणि डीएमसी-बी फर्स्ट बोगीवर ब्रॅकेटिंग करण्यात आले होते. तसेच गतिमापक सेन्सर आणि यावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली होती. आरडीएसओ पथकाने गाडीच्या विविध भागात सेन्सर्स बसवले होते. या सर्व मानकांतर्गत होणारी चाचणी सामान्य तसेच पावसाळी वातावरण निर्माण करून आरडीएसओतर्फे करण्यात आल्या. यानंतर याचा सविस्तर अहवाल तयार करून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर