शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

अबब...नागपुरात जागोजागी अवतरल्या गोगलगायी; नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:46 IST

दक्षिण नागपूरच्या मानेवाडा, बेसा परिसरात रहिवासी नागरिकांना गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो आहे. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये शंख असलेल्या लाखो गोगलगायींनी अक्षरश: सुळसुळाट केला आहे.

ठळक मुद्देकाही विषारी असण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच कोरोनाच्या धास्तीने नागरिकांना हैराण केले असताना दक्षिण नागपूरच्या मानेवाडा, बेसा परिसरात रहिवासी नागरिकांना गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो आहे. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये शंख असलेल्या लाखो गोगलगायींनी अक्षरश: सुळसुळाट केला आहे. घरात, विहिरीत, भिंतीवर, छपरावर चालणाऱ्या या गोगलगाईं अंगणात अक्षरश: खच पडलेला असतो. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने गोगलगाई दिसत असल्याने लोकांमध्ये वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण झाली आहे.

बेसा रोड, मानेवाडा भागातील गीतानगर, गजानननगर, शाहूनगर, कपिलनगर आदी वस्त्यांमधील नागरिकांना येत आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर घराच दरवाजा उघडला की अंगणात या शंख असलेल्या गोगलगाईंचा सडा पडलेला असतो. घरातील महिला, मुले यांना भीती वाटत असल्याने हात लावायला तयार नसतात. त्यामुळे घरच्या पुरुषांना सकाळी उठल्यावर आधी यांना बाहेर काढण्याचे काम करावे लागते. एकएक घरातून ३०० ते ५०० गोगलगाई टोपलीने किंवा बोºयात भरून काढाव्या लागतात.

वस्तीमध्ये रिकाम्या भूखंडांवरील पाण्यात, कचºयात अगदी लाखोंच्या संख्येने त्या पसरलेल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी यांचा प्रादुर्भाव अधिक आहे. विहिरीच्या पाण्यात, कचºयात, गवतात त्या दिसतात. त्यामुळे पाण्यातून घाण व कुजकट दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. परिसरातील नागरिक पांडुरंग ठाणेकर यांनी सांगितले, याबाबत महापालिक, आरोग्य विभाग व प्रभागाच्या नगरसेवकांना माहिती दिली होती, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांमध्ये असंतोष पसरला आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की गोगलगाय दिसते पण त्यांचे प्रमाण नगण्य असते. मात्र यावर्षी त्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आधीच कोरोनामुळे नागरिक दहशतीत जगत असताना यावेळी एवढ्या मोठ्या संख्येने गोगलगाय का निघाल्या, या विचाराने लोकांमध्ये अनामिक भीती निर्माण झाली आहे.- ३०-४० वर्षापूर्वी येथे मानवी वस्ती नव्हती, जंगलाचा परिसर होता. त्यामुळे कदाचित गोगलगाई आल्या असाव्यात, अशी शंका आहे. मात्र यापूर्वी त्या मोठ्या संख्येने कधी दिसल्या नाही आणि यावर्षी असे चित्र दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागात दिसतात पण शहरात पहिल्यांदा मोठ्या संख्येने त्या दिसत असल्याचे बोलले जात आहे.- मीठ टाकून मारण्याचा प्रयत्नया गोगलगाईंमुळे नागरिकांना शारीरिक किंवा आजाराबाबतची कुठलीही समस्या आली नसली तरी अनामिक भीती, अस्वस्थपणा व विचित्रपणा नक्कीच अनुभवावा लागतो आहे. तक्रारीनंतरही मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी स्वत:च ब्लिचिंग पावडर किंवा फिनाईल टाकून पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र फायदा होत नसल्याने गोगलगाईंवर मीठ टाकून मारले जात आहे.- काही विषारीही असतातगोगलगाईबाबत माहिती जाणून घेतली असता, त्या ३५ हजार प्रकारच्या असल्याची माहिती मिळाली. हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो. विशिष्ट खूण ठेवण्यासाठी चिकट पदार्थ स्रवत असतात. त्यातील काही विषारी तर काही बिनविषारी असतात. शंख असलेल्या गोगलगाईंमध्येच विषारी प्रकार आढळून येतो. त्यामुळे या विषारीही असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते आपल्याकडे विषारी प्रकार आढळून येत नाही.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव