शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

अबब...नागपुरात जागोजागी अवतरल्या गोगलगायी; नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:46 IST

दक्षिण नागपूरच्या मानेवाडा, बेसा परिसरात रहिवासी नागरिकांना गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो आहे. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये शंख असलेल्या लाखो गोगलगायींनी अक्षरश: सुळसुळाट केला आहे.

ठळक मुद्देकाही विषारी असण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच कोरोनाच्या धास्तीने नागरिकांना हैराण केले असताना दक्षिण नागपूरच्या मानेवाडा, बेसा परिसरात रहिवासी नागरिकांना गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो आहे. या भागातील अनेक वस्त्यांमध्ये शंख असलेल्या लाखो गोगलगायींनी अक्षरश: सुळसुळाट केला आहे. घरात, विहिरीत, भिंतीवर, छपरावर चालणाऱ्या या गोगलगाईं अंगणात अक्षरश: खच पडलेला असतो. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने गोगलगाई दिसत असल्याने लोकांमध्ये वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण झाली आहे.

बेसा रोड, मानेवाडा भागातील गीतानगर, गजानननगर, शाहूनगर, कपिलनगर आदी वस्त्यांमधील नागरिकांना येत आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर घराच दरवाजा उघडला की अंगणात या शंख असलेल्या गोगलगाईंचा सडा पडलेला असतो. घरातील महिला, मुले यांना भीती वाटत असल्याने हात लावायला तयार नसतात. त्यामुळे घरच्या पुरुषांना सकाळी उठल्यावर आधी यांना बाहेर काढण्याचे काम करावे लागते. एकएक घरातून ३०० ते ५०० गोगलगाई टोपलीने किंवा बोºयात भरून काढाव्या लागतात.

वस्तीमध्ये रिकाम्या भूखंडांवरील पाण्यात, कचºयात अगदी लाखोंच्या संख्येने त्या पसरलेल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी यांचा प्रादुर्भाव अधिक आहे. विहिरीच्या पाण्यात, कचºयात, गवतात त्या दिसतात. त्यामुळे पाण्यातून घाण व कुजकट दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. परिसरातील नागरिक पांडुरंग ठाणेकर यांनी सांगितले, याबाबत महापालिक, आरोग्य विभाग व प्रभागाच्या नगरसेवकांना माहिती दिली होती, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांमध्ये असंतोष पसरला आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की गोगलगाय दिसते पण त्यांचे प्रमाण नगण्य असते. मात्र यावर्षी त्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आधीच कोरोनामुळे नागरिक दहशतीत जगत असताना यावेळी एवढ्या मोठ्या संख्येने गोगलगाय का निघाल्या, या विचाराने लोकांमध्ये अनामिक भीती निर्माण झाली आहे.- ३०-४० वर्षापूर्वी येथे मानवी वस्ती नव्हती, जंगलाचा परिसर होता. त्यामुळे कदाचित गोगलगाई आल्या असाव्यात, अशी शंका आहे. मात्र यापूर्वी त्या मोठ्या संख्येने कधी दिसल्या नाही आणि यावर्षी असे चित्र दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागात दिसतात पण शहरात पहिल्यांदा मोठ्या संख्येने त्या दिसत असल्याचे बोलले जात आहे.- मीठ टाकून मारण्याचा प्रयत्नया गोगलगाईंमुळे नागरिकांना शारीरिक किंवा आजाराबाबतची कुठलीही समस्या आली नसली तरी अनामिक भीती, अस्वस्थपणा व विचित्रपणा नक्कीच अनुभवावा लागतो आहे. तक्रारीनंतरही मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी स्वत:च ब्लिचिंग पावडर किंवा फिनाईल टाकून पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र फायदा होत नसल्याने गोगलगाईंवर मीठ टाकून मारले जात आहे.- काही विषारीही असतातगोगलगाईबाबत माहिती जाणून घेतली असता, त्या ३५ हजार प्रकारच्या असल्याची माहिती मिळाली. हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो. विशिष्ट खूण ठेवण्यासाठी चिकट पदार्थ स्रवत असतात. त्यातील काही विषारी तर काही बिनविषारी असतात. शंख असलेल्या गोगलगाईंमध्येच विषारी प्रकार आढळून येतो. त्यामुळे या विषारीही असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते आपल्याकडे विषारी प्रकार आढळून येत नाही.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव