शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मुत्तेमवार- ठाकरे द्वेषपूर्ण वागताहेत : गेव्ह आवारी यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:26 IST

आपण घेतलेल्या आक्षेपांना माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या समर्थकांना समोर करून माझ्यावर बदनामीकारक आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुत्तेमवार- ठाकरे हे द्वेषपूर्ण भावनेतून वागतात हे या प्रकरणाने सिद्ध झाले आहे, अशी नाराजी माजी खासदार गेव्ह आवारी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्दे नागपुरात संघटनात्मक निवडणुका होतील

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपण घेतलेल्या आक्षेपांना माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या समर्थकांना समोर करून माझ्यावर बदनामीकारक आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुत्तेमवार- ठाकरे हे द्वेषपूर्ण भावनेतून वागतात हे या प्रकरणाने सिद्ध झाले आहे, अशी नाराजी माजी खासदार गेव्ह आवारी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.आवारी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून मुत्तेमवार- ठाकरे यांच्या कार्यशैलीमुळे शहरात काँग्रेसचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी मुत्तेमवार-ठाकरे समर्थकांनी देवडिया काँग्रेस भवनात बैठक घेत आवारी यांनीच १९९७ च्या महापालिका निवडणुकीत ‘पंजा’ गोठवून काँग्रेस बुडविल्याचा आरोप करीत ते चतुर्वेदींच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसमध्ये ‘लेटरवॉर’ भडकले असून गटबाजी टोकाला गेल्याचे चित्र निर्माण झाला आहे.दरम्यान, मुत्तेमवार समर्थकांनी केलेल्या आरोपांचे आवारी यांनी लोकमतशी बोलताना खंडन केले. आवारी म्हणाले, माझ्याबाबत अशा प्रतिक्रिया वाचून दु:ख झाले.यावरून मुत्तेमवार व ठाकरे हे कसे काँग्रेस चालवित आहेत, हे सिद्ध होते. आपण उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला मुत्तेमवार- ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. माझ्यावर पंजा गोठवल्याचा आरोप करून ते मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करू पाहत आहेत. प्रदेश काँग्रेस समितीची कुठलीही बैठक अद्याप झालेली नाही. सर्व कमिट्या सध्या हंगामी आहेत. त्यामुळे आपल्याला प्रदेशच्या बैठकीला बोलविण्याचा प्रश्नच येत नाही. नागपुरातून एवढे वर्षे खासदार राहिलेल्या मुत्तेमवार यांना नागपूरच्या बाहेरून प्रदेश काँग्रेसवर प्रतिनिधी म्हणून जाण्याची वेळ आली. त्यांनी यावर आत्मपरीक्षण करावे. मी भगोडा नाही. त्यामुळे नागपूर सोडून प्रदेशवर गेलो नाही, अशी टीकाही आवारी यांनी केली.हायकमांडने नागपुरात संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. मुत्तेमवार-ठाकरे यांची सदस्य नोंदणी कमी झाल्यामुळे ते निवडणूक टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदस्य नोंदणीच्या आधारे निवडणूक व्हावी किंवा नियुक्ती करावी, अशी मागणी आपण यापूर्वीच हायकमांडकडे केली होती, असेही आवारी यांनी सांगितले.पंजा गोठवण्याचा निर्णय तत्कालीन हायकमांडचा १९९७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत ‘पंजा’ चिन्ह गोठविण्यात आले, याबाबत आवारी म्हणाले, ही वास्तविकता आहे. मात्र, पंजा गोठवणे हा तत्कालीन प्रदेश हायकमांडचा निर्णय होता. हा माझा एकट्याचा निर्णय नव्हता. मी फक्त शहर काँग्रेसचा अध्यक्ष होतो एवढेच. त्यावेळी सर्वांनी आपली बाजू मांडली व त्यानंतर तसा निर्णय घेण्यात आला होता. उलट त्यावेळी विकास ठाकरे यांना अभ्यंकर नगर वॉर्डातून महापालिकेचे तिकीट मिळावे म्हणून माझा तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांच्याशी वादही झाला होता. मात्र, दुर्दैवाने ठाकरे यांना विसर पडला आहे. पंजा गोठवण्याएवढा मी ताकदवार असतो तर मी मुत्तेमवार यांना नागपुरात तिकीटच मिळू दिले नसते. मला बदनाम करण्यासाठी हे असे आरोप करवून घेतले जात आहेत, असेही आवारी म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर