शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मुत्तेमवार- ठाकरे द्वेषपूर्ण वागताहेत : गेव्ह आवारी यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:26 IST

आपण घेतलेल्या आक्षेपांना माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या समर्थकांना समोर करून माझ्यावर बदनामीकारक आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुत्तेमवार- ठाकरे हे द्वेषपूर्ण भावनेतून वागतात हे या प्रकरणाने सिद्ध झाले आहे, अशी नाराजी माजी खासदार गेव्ह आवारी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्दे नागपुरात संघटनात्मक निवडणुका होतील

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपण घेतलेल्या आक्षेपांना माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या समर्थकांना समोर करून माझ्यावर बदनामीकारक आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुत्तेमवार- ठाकरे हे द्वेषपूर्ण भावनेतून वागतात हे या प्रकरणाने सिद्ध झाले आहे, अशी नाराजी माजी खासदार गेव्ह आवारी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.आवारी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून मुत्तेमवार- ठाकरे यांच्या कार्यशैलीमुळे शहरात काँग्रेसचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी मुत्तेमवार-ठाकरे समर्थकांनी देवडिया काँग्रेस भवनात बैठक घेत आवारी यांनीच १९९७ च्या महापालिका निवडणुकीत ‘पंजा’ गोठवून काँग्रेस बुडविल्याचा आरोप करीत ते चतुर्वेदींच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसमध्ये ‘लेटरवॉर’ भडकले असून गटबाजी टोकाला गेल्याचे चित्र निर्माण झाला आहे.दरम्यान, मुत्तेमवार समर्थकांनी केलेल्या आरोपांचे आवारी यांनी लोकमतशी बोलताना खंडन केले. आवारी म्हणाले, माझ्याबाबत अशा प्रतिक्रिया वाचून दु:ख झाले.यावरून मुत्तेमवार व ठाकरे हे कसे काँग्रेस चालवित आहेत, हे सिद्ध होते. आपण उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला मुत्तेमवार- ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. माझ्यावर पंजा गोठवल्याचा आरोप करून ते मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करू पाहत आहेत. प्रदेश काँग्रेस समितीची कुठलीही बैठक अद्याप झालेली नाही. सर्व कमिट्या सध्या हंगामी आहेत. त्यामुळे आपल्याला प्रदेशच्या बैठकीला बोलविण्याचा प्रश्नच येत नाही. नागपुरातून एवढे वर्षे खासदार राहिलेल्या मुत्तेमवार यांना नागपूरच्या बाहेरून प्रदेश काँग्रेसवर प्रतिनिधी म्हणून जाण्याची वेळ आली. त्यांनी यावर आत्मपरीक्षण करावे. मी भगोडा नाही. त्यामुळे नागपूर सोडून प्रदेशवर गेलो नाही, अशी टीकाही आवारी यांनी केली.हायकमांडने नागपुरात संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. मुत्तेमवार-ठाकरे यांची सदस्य नोंदणी कमी झाल्यामुळे ते निवडणूक टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदस्य नोंदणीच्या आधारे निवडणूक व्हावी किंवा नियुक्ती करावी, अशी मागणी आपण यापूर्वीच हायकमांडकडे केली होती, असेही आवारी यांनी सांगितले.पंजा गोठवण्याचा निर्णय तत्कालीन हायकमांडचा १९९७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत ‘पंजा’ चिन्ह गोठविण्यात आले, याबाबत आवारी म्हणाले, ही वास्तविकता आहे. मात्र, पंजा गोठवणे हा तत्कालीन प्रदेश हायकमांडचा निर्णय होता. हा माझा एकट्याचा निर्णय नव्हता. मी फक्त शहर काँग्रेसचा अध्यक्ष होतो एवढेच. त्यावेळी सर्वांनी आपली बाजू मांडली व त्यानंतर तसा निर्णय घेण्यात आला होता. उलट त्यावेळी विकास ठाकरे यांना अभ्यंकर नगर वॉर्डातून महापालिकेचे तिकीट मिळावे म्हणून माझा तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांच्याशी वादही झाला होता. मात्र, दुर्दैवाने ठाकरे यांना विसर पडला आहे. पंजा गोठवण्याएवढा मी ताकदवार असतो तर मी मुत्तेमवार यांना नागपुरात तिकीटच मिळू दिले नसते. मला बदनाम करण्यासाठी हे असे आरोप करवून घेतले जात आहेत, असेही आवारी म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर