शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मुत्तेमवार- ठाकरे द्वेषपूर्ण वागताहेत : गेव्ह आवारी यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:26 IST

आपण घेतलेल्या आक्षेपांना माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या समर्थकांना समोर करून माझ्यावर बदनामीकारक आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुत्तेमवार- ठाकरे हे द्वेषपूर्ण भावनेतून वागतात हे या प्रकरणाने सिद्ध झाले आहे, अशी नाराजी माजी खासदार गेव्ह आवारी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्दे नागपुरात संघटनात्मक निवडणुका होतील

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपण घेतलेल्या आक्षेपांना माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या समर्थकांना समोर करून माझ्यावर बदनामीकारक आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुत्तेमवार- ठाकरे हे द्वेषपूर्ण भावनेतून वागतात हे या प्रकरणाने सिद्ध झाले आहे, अशी नाराजी माजी खासदार गेव्ह आवारी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.आवारी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून मुत्तेमवार- ठाकरे यांच्या कार्यशैलीमुळे शहरात काँग्रेसचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी मुत्तेमवार-ठाकरे समर्थकांनी देवडिया काँग्रेस भवनात बैठक घेत आवारी यांनीच १९९७ च्या महापालिका निवडणुकीत ‘पंजा’ गोठवून काँग्रेस बुडविल्याचा आरोप करीत ते चतुर्वेदींच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसमध्ये ‘लेटरवॉर’ भडकले असून गटबाजी टोकाला गेल्याचे चित्र निर्माण झाला आहे.दरम्यान, मुत्तेमवार समर्थकांनी केलेल्या आरोपांचे आवारी यांनी लोकमतशी बोलताना खंडन केले. आवारी म्हणाले, माझ्याबाबत अशा प्रतिक्रिया वाचून दु:ख झाले.यावरून मुत्तेमवार व ठाकरे हे कसे काँग्रेस चालवित आहेत, हे सिद्ध होते. आपण उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला मुत्तेमवार- ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. माझ्यावर पंजा गोठवल्याचा आरोप करून ते मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करू पाहत आहेत. प्रदेश काँग्रेस समितीची कुठलीही बैठक अद्याप झालेली नाही. सर्व कमिट्या सध्या हंगामी आहेत. त्यामुळे आपल्याला प्रदेशच्या बैठकीला बोलविण्याचा प्रश्नच येत नाही. नागपुरातून एवढे वर्षे खासदार राहिलेल्या मुत्तेमवार यांना नागपूरच्या बाहेरून प्रदेश काँग्रेसवर प्रतिनिधी म्हणून जाण्याची वेळ आली. त्यांनी यावर आत्मपरीक्षण करावे. मी भगोडा नाही. त्यामुळे नागपूर सोडून प्रदेशवर गेलो नाही, अशी टीकाही आवारी यांनी केली.हायकमांडने नागपुरात संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. मुत्तेमवार-ठाकरे यांची सदस्य नोंदणी कमी झाल्यामुळे ते निवडणूक टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदस्य नोंदणीच्या आधारे निवडणूक व्हावी किंवा नियुक्ती करावी, अशी मागणी आपण यापूर्वीच हायकमांडकडे केली होती, असेही आवारी यांनी सांगितले.पंजा गोठवण्याचा निर्णय तत्कालीन हायकमांडचा १९९७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत ‘पंजा’ चिन्ह गोठविण्यात आले, याबाबत आवारी म्हणाले, ही वास्तविकता आहे. मात्र, पंजा गोठवणे हा तत्कालीन प्रदेश हायकमांडचा निर्णय होता. हा माझा एकट्याचा निर्णय नव्हता. मी फक्त शहर काँग्रेसचा अध्यक्ष होतो एवढेच. त्यावेळी सर्वांनी आपली बाजू मांडली व त्यानंतर तसा निर्णय घेण्यात आला होता. उलट त्यावेळी विकास ठाकरे यांना अभ्यंकर नगर वॉर्डातून महापालिकेचे तिकीट मिळावे म्हणून माझा तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांच्याशी वादही झाला होता. मात्र, दुर्दैवाने ठाकरे यांना विसर पडला आहे. पंजा गोठवण्याएवढा मी ताकदवार असतो तर मी मुत्तेमवार यांना नागपुरात तिकीटच मिळू दिले नसते. मला बदनाम करण्यासाठी हे असे आरोप करवून घेतले जात आहेत, असेही आवारी म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर