शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

देशातील मुसलमान मोदींकडे आकर्षित होत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:40 IST

७० वर्षांपासून कॉंग्रेसने मुस्लिमांना विकासापासून दूर ठेवत केवळ भय दाखविले व राजकीय पोळी शेकून घेतली. मात्र आता मुस्लिमांना सत्य समजत आहे. ज्या नरेंद्र मोदींबाबत कॉंग्रेसने द्वेष पसरविला त्यांच्याकडेच आता मुस्लिम आकर्षित होत आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनेहरुंनी देशाला तोडले, पटेलांनी जोडलेइंद्रेशकुमार यांचे वक्तव्य

आॅनलाईन लोकमतनागपूर : ७० वर्षांपासून कॉंग्रेसने मुस्लिमांना विकासापासून दूर ठेवत केवळ भय दाखविले व राजकीय पोळी शेकून घेतली. मात्र आता मुस्लिमांना सत्य समजत आहे. ज्या नरेंद्र मोदींबाबत कॉंग्रेसने द्वेष पसरविला त्यांच्याकडेच आता मुस्लिम आकर्षित होत आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. प्रमोद वडनेरकर यांनी ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेवर लिहिलेल्या ‘जंग-ए-खिलाफत’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बुधवारी बोलत होते.रामनगरातील श्रीराम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, एअर वाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात स्वातंत्र्योत्तर काळात जनतेला वारंवार हे सांगण्यात आले की काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु, प्रत्यक्षात नेहरुंच्या धोरणांमुळे देशाचे नुकसान झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचादेखील कॉंग्रेसने शासनकाळात वारंवार अपमान केला. कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य नव्हे तर फाळणी दिली. फाळणीचे कटू सत्य माहिती असेलेल महात्मा गांधी, विनोबा भावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्योत्सवात कुठेच दिसले नाहीत. जवाहरलाल नेहरु यांनी देशाला तोडण्याचे काम केले. तर दुसरीकडे सरदार पटेल यांनी देशाला जोडले. गेल्या ७० वर्षापासून कॉंग्रेसने यासंदर्भात केवळ असत्याचा प्रचार केला, असा आरोप इंद्रेश कुमार यांनी केला.‘आयसिस’ला केवळ दहशतवादी संघटना म्हणणे अयोग्य ठरेल. ती धर्मांध संघटना असून धर्माच्या आधारावर केवळ संहार करण्याचे त्यांचे धोरण आहे. आपल्या देशातील काही तरुण ‘आयसिस’कडे वळले. आपल्या देशातील मुस्लिम सहिष्णू आहेत. मात्र काही लोकांमुळे पूर्ण धर्मावर शिंतोडे उडविण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुस्लिमांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, असे मत विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.मुस्लिम राष्ट्रांमध्ये दहशतवादाची मूळे आहेत. जोपर्यंत त्यांच्या मानसिकतेबाबत समजणार नाही तोपर्यंत ते हिंसेच्या मार्गावर का चालतात, याचे उत्तर मिळणार नाही. दहशतवादाला दहशतीनेच उत्तर दिले जाऊ शकत नाही, असे सूर्यकांत चाफेकर म्हणाले. प्रिती वडनेरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.राहुल गांधी जातीधर्माचे राजकारण करताहेतगुजरात विधानसभा निवडणूकांमध्ये राहुल गांधी व कॉंग्रेसकडून जातीधर्माचे राजकारण करण्यात येत आहे. मात्र जनतेला विकासाचे राजकारण हवे आहे. तेथे कॉंग्रेसची ही चाल विफल ठरेल, असे इंद्रेश कुमार म्हणाले. राहुल गांधी यांच्या सोमनाथ मंदिरातील गैरहिंदू पुस्तिकेतील स्वाक्षरीचा वादावर त्यांनी फारसे भाष्य केले नाही. मात्र राहुल गांधी यांच्या वडिलांचे नाव राजीव, आजोबांचे नाव फिरोज, फिरोज यांच्या वडिल व आजोबांचा शोध घेतला असता राहुल गांधीचा खरा धर्म कळेल, असे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले.अयोध्या ही तर रामाची ‘प्रॉपर्टी’राममंदिरावर बोलताना अयोध्या ही रामाचीच ‘प्रॉपर्टी’ असल्याचे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. अयोध्येत रामजन्मभूमीत रामाचेच मंदिर होईल, हे मुसलमानांनीदेखील मान्य केले आहे. त्यामुळे लवकरच मंदिर तेथेच बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ