शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

देशातील मुसलमान मोदींकडे आकर्षित होत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:40 IST

७० वर्षांपासून कॉंग्रेसने मुस्लिमांना विकासापासून दूर ठेवत केवळ भय दाखविले व राजकीय पोळी शेकून घेतली. मात्र आता मुस्लिमांना सत्य समजत आहे. ज्या नरेंद्र मोदींबाबत कॉंग्रेसने द्वेष पसरविला त्यांच्याकडेच आता मुस्लिम आकर्षित होत आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनेहरुंनी देशाला तोडले, पटेलांनी जोडलेइंद्रेशकुमार यांचे वक्तव्य

आॅनलाईन लोकमतनागपूर : ७० वर्षांपासून कॉंग्रेसने मुस्लिमांना विकासापासून दूर ठेवत केवळ भय दाखविले व राजकीय पोळी शेकून घेतली. मात्र आता मुस्लिमांना सत्य समजत आहे. ज्या नरेंद्र मोदींबाबत कॉंग्रेसने द्वेष पसरविला त्यांच्याकडेच आता मुस्लिम आकर्षित होत आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. प्रमोद वडनेरकर यांनी ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेवर लिहिलेल्या ‘जंग-ए-खिलाफत’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बुधवारी बोलत होते.रामनगरातील श्रीराम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, एअर वाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात स्वातंत्र्योत्तर काळात जनतेला वारंवार हे सांगण्यात आले की काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु, प्रत्यक्षात नेहरुंच्या धोरणांमुळे देशाचे नुकसान झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचादेखील कॉंग्रेसने शासनकाळात वारंवार अपमान केला. कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य नव्हे तर फाळणी दिली. फाळणीचे कटू सत्य माहिती असेलेल महात्मा गांधी, विनोबा भावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्योत्सवात कुठेच दिसले नाहीत. जवाहरलाल नेहरु यांनी देशाला तोडण्याचे काम केले. तर दुसरीकडे सरदार पटेल यांनी देशाला जोडले. गेल्या ७० वर्षापासून कॉंग्रेसने यासंदर्भात केवळ असत्याचा प्रचार केला, असा आरोप इंद्रेश कुमार यांनी केला.‘आयसिस’ला केवळ दहशतवादी संघटना म्हणणे अयोग्य ठरेल. ती धर्मांध संघटना असून धर्माच्या आधारावर केवळ संहार करण्याचे त्यांचे धोरण आहे. आपल्या देशातील काही तरुण ‘आयसिस’कडे वळले. आपल्या देशातील मुस्लिम सहिष्णू आहेत. मात्र काही लोकांमुळे पूर्ण धर्मावर शिंतोडे उडविण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुस्लिमांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, असे मत विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.मुस्लिम राष्ट्रांमध्ये दहशतवादाची मूळे आहेत. जोपर्यंत त्यांच्या मानसिकतेबाबत समजणार नाही तोपर्यंत ते हिंसेच्या मार्गावर का चालतात, याचे उत्तर मिळणार नाही. दहशतवादाला दहशतीनेच उत्तर दिले जाऊ शकत नाही, असे सूर्यकांत चाफेकर म्हणाले. प्रिती वडनेरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.राहुल गांधी जातीधर्माचे राजकारण करताहेतगुजरात विधानसभा निवडणूकांमध्ये राहुल गांधी व कॉंग्रेसकडून जातीधर्माचे राजकारण करण्यात येत आहे. मात्र जनतेला विकासाचे राजकारण हवे आहे. तेथे कॉंग्रेसची ही चाल विफल ठरेल, असे इंद्रेश कुमार म्हणाले. राहुल गांधी यांच्या सोमनाथ मंदिरातील गैरहिंदू पुस्तिकेतील स्वाक्षरीचा वादावर त्यांनी फारसे भाष्य केले नाही. मात्र राहुल गांधी यांच्या वडिलांचे नाव राजीव, आजोबांचे नाव फिरोज, फिरोज यांच्या वडिल व आजोबांचा शोध घेतला असता राहुल गांधीचा खरा धर्म कळेल, असे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले.अयोध्या ही तर रामाची ‘प्रॉपर्टी’राममंदिरावर बोलताना अयोध्या ही रामाचीच ‘प्रॉपर्टी’ असल्याचे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. अयोध्येत रामजन्मभूमीत रामाचेच मंदिर होईल, हे मुसलमानांनीदेखील मान्य केले आहे. त्यामुळे लवकरच मंदिर तेथेच बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ