शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

देशातील मुसलमान मोदींकडे आकर्षित होत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:40 IST

७० वर्षांपासून कॉंग्रेसने मुस्लिमांना विकासापासून दूर ठेवत केवळ भय दाखविले व राजकीय पोळी शेकून घेतली. मात्र आता मुस्लिमांना सत्य समजत आहे. ज्या नरेंद्र मोदींबाबत कॉंग्रेसने द्वेष पसरविला त्यांच्याकडेच आता मुस्लिम आकर्षित होत आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनेहरुंनी देशाला तोडले, पटेलांनी जोडलेइंद्रेशकुमार यांचे वक्तव्य

आॅनलाईन लोकमतनागपूर : ७० वर्षांपासून कॉंग्रेसने मुस्लिमांना विकासापासून दूर ठेवत केवळ भय दाखविले व राजकीय पोळी शेकून घेतली. मात्र आता मुस्लिमांना सत्य समजत आहे. ज्या नरेंद्र मोदींबाबत कॉंग्रेसने द्वेष पसरविला त्यांच्याकडेच आता मुस्लिम आकर्षित होत आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. प्रमोद वडनेरकर यांनी ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेवर लिहिलेल्या ‘जंग-ए-खिलाफत’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बुधवारी बोलत होते.रामनगरातील श्रीराम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, एअर वाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात स्वातंत्र्योत्तर काळात जनतेला वारंवार हे सांगण्यात आले की काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु, प्रत्यक्षात नेहरुंच्या धोरणांमुळे देशाचे नुकसान झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचादेखील कॉंग्रेसने शासनकाळात वारंवार अपमान केला. कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य नव्हे तर फाळणी दिली. फाळणीचे कटू सत्य माहिती असेलेल महात्मा गांधी, विनोबा भावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्योत्सवात कुठेच दिसले नाहीत. जवाहरलाल नेहरु यांनी देशाला तोडण्याचे काम केले. तर दुसरीकडे सरदार पटेल यांनी देशाला जोडले. गेल्या ७० वर्षापासून कॉंग्रेसने यासंदर्भात केवळ असत्याचा प्रचार केला, असा आरोप इंद्रेश कुमार यांनी केला.‘आयसिस’ला केवळ दहशतवादी संघटना म्हणणे अयोग्य ठरेल. ती धर्मांध संघटना असून धर्माच्या आधारावर केवळ संहार करण्याचे त्यांचे धोरण आहे. आपल्या देशातील काही तरुण ‘आयसिस’कडे वळले. आपल्या देशातील मुस्लिम सहिष्णू आहेत. मात्र काही लोकांमुळे पूर्ण धर्मावर शिंतोडे उडविण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुस्लिमांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, असे मत विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.मुस्लिम राष्ट्रांमध्ये दहशतवादाची मूळे आहेत. जोपर्यंत त्यांच्या मानसिकतेबाबत समजणार नाही तोपर्यंत ते हिंसेच्या मार्गावर का चालतात, याचे उत्तर मिळणार नाही. दहशतवादाला दहशतीनेच उत्तर दिले जाऊ शकत नाही, असे सूर्यकांत चाफेकर म्हणाले. प्रिती वडनेरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.राहुल गांधी जातीधर्माचे राजकारण करताहेतगुजरात विधानसभा निवडणूकांमध्ये राहुल गांधी व कॉंग्रेसकडून जातीधर्माचे राजकारण करण्यात येत आहे. मात्र जनतेला विकासाचे राजकारण हवे आहे. तेथे कॉंग्रेसची ही चाल विफल ठरेल, असे इंद्रेश कुमार म्हणाले. राहुल गांधी यांच्या सोमनाथ मंदिरातील गैरहिंदू पुस्तिकेतील स्वाक्षरीचा वादावर त्यांनी फारसे भाष्य केले नाही. मात्र राहुल गांधी यांच्या वडिलांचे नाव राजीव, आजोबांचे नाव फिरोज, फिरोज यांच्या वडिल व आजोबांचा शोध घेतला असता राहुल गांधीचा खरा धर्म कळेल, असे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले.अयोध्या ही तर रामाची ‘प्रॉपर्टी’राममंदिरावर बोलताना अयोध्या ही रामाचीच ‘प्रॉपर्टी’ असल्याचे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. अयोध्येत रामजन्मभूमीत रामाचेच मंदिर होईल, हे मुसलमानांनीदेखील मान्य केले आहे. त्यामुळे लवकरच मंदिर तेथेच बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ