शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

नागपूर मनपात पाणीटंचाईच्या मुद्यावरून नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 9:31 PM

उन्हाळा सुरू होताच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कन्हान नदीच्या पात्रातील पातळी कमी झाली आहे. यासोबतच शहरातील नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंगळवारी सर्वसाधारण सभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. २४ बाल ७ योजनेच्या माध्यमातून शहरातील किती भागातील नागरिकांना २४ तास पाणी मिळते, असा सवाल उपस्थित केला.

ठळक मुद्दे२४ बाय ७ योजनेवर २९२ कोटींचा खर्च : ६८ पैकी १६ कमांड एरियातील कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळा सुरू होताच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कन्हान नदीच्या पात्रातील पातळी कमी झाली आहे. यासोबतच शहरातील नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंगळवारी सर्वसाधारण सभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. २४ बाल ७ योजनेच्या माध्यमातून शहरातील किती भागातील नागरिकांना २४ तास पाणी मिळते, असा सवाल उपस्थित केला.सभागृहात अमृत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या विषयावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी २४ बाय ७ योजनेचा मुद्दा उपस्थित केला. शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ही योजना राबविली जात आहे. परंतु या योजनेच्या माध्यमातून कोणत्या भागातील नागरिकांना २४ तास पाणी मिळते तसेच या योजनवरील खर्चाची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली.२४ बाय ७ पाणीपुरवठा प्रकल्प ३८७ कोटींचा आहे. यावर २९२ कोटींचा खर्च झाला आहे. शहरातील ६८ कमांड एरियात हा प्रकल्प राबविला जात आहे. १६ कमांड एरियातील कामे पूर्ण झालेली आहेत. यात धरमपेठ, लक्ष्मीनगर यासह अन्य भागांचा समावेश आहे. कामे पूर्ण झालेल्या भागातील नागरिकांना २४ तास पाणी मिळत असल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६० जलकुंभ उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.कामे पूर्ण झालेल्या कमांड एरियांची यादी सभागृहाला द्या, या भागात २४ तास पाणी मिळते का असा प्रश्न विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी उपस्थित केला. भाजपाचे धरमपाल मेश्राम यांनी त्यांच्या प्रभागातील झोपडपट्टीला २४ तास पाणीपुुरवठा होत असल्याचे सांगितले. काँग्रेसचे नितीन साठवणे, हरीश ग्वालबंशी,मनोज सांगोळे यांच्यासह विरोधी सदस्यांनी पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आणले. पाण्याच्या मुद्यावरून र्गोधळाला सुरुवात होताच महापौर नंदा जिचकार यांनी सभागृहाचे कामकाज संपल्याचे जाहीर केले.२८२ कोटींची पाणीपुरवठा योजनाकेंद्र सरकारच्या अटल मिशन फॉर रिज्युनेशन आॅफ अर्बन ट्रान्समिशन(अमृत)अभियानांतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या २८२.५९ कोटींच्या निधीतून शहरातील नळाचे नेटवर्क नसलेल्या भागात पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. भारत सरकारचा उपक्रम असलेली वाप्कोस लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून राबविण्याचे निर्देश मुंबई येथे आयोजित बैठकीत देण्यात आले होते. परंतु यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने ही केंद्र सरकारची योजना असल्याने महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात यावी, अशा स्वरूपाचे निर्देश दिले होते. प्राधिकरणच्या माध्यमातून ही योजना राबविल्यास कामाला विलंब होण्याची शक्यता विचारात घेता वाप्कोस कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दिली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाagitationआंदोलन