शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

-तर मुंबई घटनेसारखी नागपुरातही पुनरावृत्ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:12 AM

मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर १५७ जण जखमी झाले. नागपूरच्या सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयातही या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकामगार रुग्णालयाची इमारत धोकादायकदुसऱ्या मजल्यावर गाद्या व रद्दीचा खच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर १५७ जण जखमी झाले. नागपूरच्या सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयातही या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.या रुग्णालयातही ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आहे. ‘रॅम्प’ नाहीत. अरुंद पायऱ्या आहेत. रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावर मोठ्या संख्येत गाद्या, रद्दी पेपर, फाईल्सचा ढीग व भंगार साहित्य पडून आहेत. येथील विद्युत व्यवस्थाही योग्य पद्धतीची नाही. आग विझवण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. रुग्णालयात समाजविघातकांचा वावर असल्याने मोठ्या धोक्याची शक्यता वर्तवली जात आहे.अग्निशमन विभागाच्या रुग्णालयांसाठी अग्निशमन यंत्रणा लावण्याबाबत स्पष्ट सूचना आहेत. कायद्यानुसार १५ मीटरपेक्षा उंच व ५० खाटांच्या रुग्णालयामध्ये ‘आॅटोमॅटिक हिट डिटेक्टर’, ‘हॉजव्हील’, ‘फायर अलार्म सिस्टीम’, ‘वेटराईजर’, भूमिगत पाण्याची टाकी असणे आवश्यक आहे. आपत्कालीन स्थितीत उपचार घेणाºया रुग्णांना कमीत कमी वेळेत इमारतीतून बाहेर काढता यावे यासाठी विशेष उपाययोजना क्रमप्राप्त आहे. परंतु दोन मजल्याच्या कामगार रुग्णालयात अशी कोणतीच व्यवस्था नाही. प्रत्येक माळ्यावर एक-एक व तळमजल्यावर दोन ते चार अग्निशमन उपकरण बसवून अग्निशमन विभागाच्या अटींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.कुणीही या-कुणीही जा‘लोकमत’ प्रतिनिधीने मुंबई घटनेच्या धर्तीवर या रुग्णालयाची पाहणी केली असता आगीसारख्या घटनेसाठी तातडीने विविध उपाययोजना करण्याची गरज असल्याचे दिसून आले. कामगार रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावरील वॉर्ड क्र. पाच व सहामध्ये भंगार साहित्य पडून आहे. विशेषत: मोठ्या संख्येत गाद्यांचा ढीग, रद्दी कागद, फाईल्सचा खच पडला आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक राहत नसल्याने कुणीही ये-जा करू शकतात. समाजविघातकांचा रुग्णालयात वावर असल्याचेही दिसून आले. अशावेळी दुसऱ्या मजल्यावरील गाद्यांना कुणी आग लावल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

अरुंद पायऱ्या व खिडक्यांवर काचेचे तावदानरुग्णालयात १३० खाटांची सोय आहे. पहिल्या मजल्यावरील वॉर्डात रुग्णांना ठेवले जाते. परंतु येथे जाण्यासाठी एकमेव पायऱ्यांचा अरुंद मार्ग आहे. येथे ‘रॅम्प’ नाहीत. पायऱ्यांच्या मार्गावरील खिडक्यांना काचेचे तावदान लावून बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे आकस्मिक घटनेत रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविणे अडचणीचे आहे. शिवाय, धूर कोंडण्याचीही शक्यता आहे.एकच प्रवेशद्वारमुंबईप्रमाणे या रुग्णालयातही एकच प्रवेशद्वार आहे. मागील भागात एक दार आहे. परंतु ते नेहमी कुलूपबंद असते. रुग्णालयात मोजकीच अग्निशमन उपकरणे आहेत. त्याचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देण्यात आले नसल्याचे समजते.

टॅग्स :Accidentअपघात