शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

..तर आमच्या वडापावच्या गाडीवरही 'ईडी' कारवाई करेल असे वाटते; संजय राऊतांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 18:35 IST

आम्हाला सुडाच्या कारवाया करायच्या असतील तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल. परंतु, आम्हाला तशी गरज नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

नागपूर : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गेल्या काही दिवसांपासून ईडी, आयकर विभागाकडून करावाईचं सत्र सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना, मला भीती वाटते की, आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल त्याचावरही ईडी कारवाई करेल, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तपास यंत्रणांना लगावला. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

तेलाच्या किंमती वाढत आहेत. काल संसदेत महागाईवर चर्चा झाली व सभागृह चालू दिलं नाही. हे भाजपच एक धोरण, नीती आहे, लोकं याला बळी पडतात. मात्र, देशात खरी समस्या रशिया-युक्रेन, हिजाब, काश्मीर फाईल नाही, त्या तर राहतीलच पण बेरोजगारी आणि महागाई ही खरी समस्या असल्याचे राऊत म्हणाले. 

केंद्रीय तपास यंत्रणा ज्या सुडाच्या भावनेन राजकारण करत आहेत. महाराष्ट्राचं गृहमंत्रालय तर असं कधीच करणार नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. ते त्यापद्धतीनच काम करेल विरोधीपक्ष नेते कितीही बोंबलले की सुडाच्या कारवाया सुरू आहेत. जर आम्हाला सुडाच्या कारवाया करायच्या असतील तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल. परंतु, आम्हाला तशी गरज नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

निल सोमय्यांच्या प्रकरणाबाबत विचारले असता, मी सरकारकडे काही पुरावे देण्याचं काम केलं. त्यापुढचं काम तपास यंत्रणांना करायचं आहे. पुराव्यात काही दम असेल तर पोलीस कारवाई करतील. माझा आणि सरकारचा दबाव नाही. तपास यंत्रणा स्वतंत्र आहे, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाInflationमहागाईShiv Senaशिवसेना