शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आत्महत्या करणारे रामाणी यांनी अंडरवर्ल्ड-मीडियावर बनवला होता चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:30 IST

चित्रपट बनविणे आणि अभिनयाच्या शौकामुळे विनोद रामाणी कर्जबाजारी झाले. रामाणीचे कुटुंब मूळचे जरीपटका येथील आहे. ते पाच भाऊ आहेत. तीन नागपुरात राहतात. एक दुबईमध्ये व दुसरा मुंबईत राहतो. नागपुरात राहणाऱ्या रितेशचे औषधाचे दुकान आहे तर मनोहरलाल कपड्याचा व्यवसाय करतात. रामाणीने अतिशय छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला होता. परंतु आपल्या व्यावसायिक कौशल्याने त्यांनी व्यवसाय वाढवला. त्यांनी औषध दुकानांचे चेन सिस्टिम सुरू केले होते.

ठळक मुद्देअभिनयाचाही होता छंद : कॉफी विथ डी आपटला अन् रामाणी कर्जबाजारी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चित्रपट बनविणे आणि अभिनयाच्या शौकामुळे विनोद रामाणी कर्जबाजारी झाले. रामाणीचे कुटुंब मूळचे जरीपटका येथील आहे. ते पाच भाऊ आहेत. तीन नागपुरात राहतात. एक दुबईमध्ये व दुसरा मुंबईत राहतो. नागपुरात राहणाऱ्या रितेशचे औषधाचे दुकान आहे तर मनोहरलाल कपड्याचा व्यवसाय करतात. रामाणीने अतिशय छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला होता. परंतु आपल्या व्यावसायिक कौशल्याने त्यांनी व्यवसाय वाढवला. त्यांनी औषध दुकानांचे चेन सिस्टिम सुरू केले होते.रामाणी यांना अभिनयाचा शौक होता. त्यांनी सुरुवातीला दोन सिंधी चित्रपटात काम केले. त्यांच्या अभिनयाचे कुटुंबीय व मित्रांनी कौतुक केले. यामुळे उत्साहित होऊन त्यांनी चित्रपट निर्माण क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘कॉफी विथ डी’ नावाचा चित्रपट बनवला. या चित्रपटात कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील चर्चीत सुनील ग्रोवर मुख्य भूमिकेत होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व मीडियावर केंद्रित या चित्रपटाचे प्रोड्युसर रामाणी होते. त्यांनी चित्रपटात अभिनयसुद्धा केला होता. परंतु हा चित्रपट पहिल्याच दिवशी अपयशी ठरला. यामुळे रामाणी यांचे कोट्यवधी रुपये बुडाले. त्यांनी चित्रपट बनविण्यासाठी सावकारांकडून २०१६ ते २०१७ या दरम्यान कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपटासोबतच रामाणीही बुडाले. यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली. पैशासाठी सावकार सातत्याने दबाव टाकू लागल्याने रामाणी यांनी नशेचे इंजेक्शन घ्यायला सुरुवात केली. अलीकडे ते पत्नीशी विनाकारण भांडायचे. तिच्यावर घरून निघून जाण्यास दबाव टाकायचे. शनिवारीसुद्धा त्यांनी पत्नीशी वाद घातला. पत्नी जरीपटक्याला निघून गेल्यानंतर त्यांनी स्वत:ला इंजेक्शन लावले आणि गळफास घेतला.यापूर्वीही केला होता प्रयत्नमिळालेल्या माहितीनुसार, रामाणी यांनी यापूर्वीही चार ते पाचवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबातील सदस्यांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना राग यायचा. ते हिंसक व्हायचे. त्यामुळे कुटुंबाल लोकही त्यांच्याशी बोलताना सावधगिरी बाळगायचे. त्यांना एकटे सोडत नव्हते. परंतु रामाणी त्यांच्याशी वाद घालून त्यांना घरातून बाहेर जाण्यास भाग पाडायचे.चित्रपट बनवून डेअरी व्यापारीही बुडालाचित्रपट निर्माणामुळे बुडणारे रामाणी शहरतील दुसरे व्यापारी आहेत. यापूर्वी एक डेअरी व्यापारीसुद्धा कोट्यवधी रुपये गमावून बसले. क्रिकेट बुकी आणि सावकारांनी त्याच्या इतवारीतील दुकानावर कब्जाही केला होता. त्या व्यापाऱ्याने चित्रपटासाठी बँकेतूनही कर्ज घेतले होते. बोगस दस्तावेजावर कर्ज घेतल्याने व्यापारी कुटुंबावर सीबीआयने गुन्हा दाखल करून अटक केली होती.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर