शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

लॉकडाउनमुळे छिंदवाड्यात अडकली आई : मुलीची खुशाली जाणण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 22:02 IST

मुलीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबातील अचानक आलेल्या प्रसंगामुळे मुलीला सोडून आईवडिलांना आपल्या गावी जावे लागले. नेमके याचवेळी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने देशातील शहरे लॉकडाऊन झाली.

ठळक मुद्देनागपुरात मुलीशी संपर्क होत नसल्याने वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबातील अचानक आलेल्या प्रसंगामुळे मुलीला सोडून आईवडिलांना आपल्या गावी जावे लागले. नेमके याचवेळी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने देशातील शहरे लॉकडाऊन झाली. या अघटित प्रसंगामुळे आई आणि मुलीचा संपर्क तुटला. आपली मुलगी सुरक्षित आहे की नाही या चिंतेमुळे कौटुंबिक कारणासाठी छिंदवाड्याला गेलेली आई भयक्रांत झाली असून मुलीची खुशाली जाणण्यासाठी टाहो फोडत आहे.कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. ही परिस्थिती नियंत्रित ठेवून विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता ही संचारबंदी अत्यावश्यक असली तरी यामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. जे घरात आहेत ते घरात आणि जे बाहेर आहेत ते बाहेरच अडकले आहेत आणि याची एकेक उदाहरणे समोर येत आहेत. या लॉकडाऊनमुळे आईमुलीची ताटातूट होण्याचा भीषण प्रसंग पिटेसूर, गोरेवाडा येथील कहार कुटुंबावर ओढवला आहे. राजेश कहार व त्यांची पत्नी सुनंदा कहार हे मूळचे छिंदवाडा येथील रहिवासी असून कामाच्या शोधात नागपूरला आलेले हे कुटुंब गोरेवाडाजवळ पिटेसूरच्या हनुमान मंदिराजवळ राहत आहे. त्यांच्यासोबत त्यांची १३ वर्षीय मुलगी कशिश ही सुद्धा राहते. मिळालेल्या माहितीनुसार छिंदवाडा येथील एका नातेवाईकाचे निधन झाल्याने ६ मार्च रोजी आईवडील छिंदवाड्याला निघाले. सुनंदा यांचा भाऊ जवळच राहतो. मुलीची परीक्षा सुरू असल्याने भावाच्या आसऱ्याने तिला येथेच सोडून ते गावाकडे निघाले. निधनाचे सोपस्कर आटोपून लवकर परत येऊ असा त्यांचा विचार होता. मात्र याच काळात कोरोना विषाणूचे संकट आपल्याही देशावर ओढवले. या संकटाला थोपविण्यासाठी आधी विविध राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मध्य प्रदेशही त्यातील एक. त्यानंतर महाराष्ट्रातही संचारबंदी लागू करण्यात आली आणि आता तर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.यामुळे जे जिथे आहेत तेथेच अडकले. सुनंदा आणि राजेश कहार हे सुद्धा सध्या छिंदवाड्यात अडकले आहेत. सुरुवातीला काही दिवस मुलीशी संपर्क होत होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून मुलीशी संपर्कच होत नसल्याने त्यांची चिंता वाढायला लागली. शेजाऱ्यांशीही संपर्क होत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आपली मुलगी सुरक्षित आहे की नाही, या विचाराने छिंदवाड्यात अडकलेले हे कुटुंब भयक्रांत झाले असून मुलीची परिस्थिती जाणण्यासाठी आईने टाहो फोडला आहे. आपल्या मुलीला मानेवाडा येथे राहणाऱ्या तिच्या आजीकडे सुखरूप सोडावे, अशी याचना तिची आई करीत आहे. पोलिसांपर्यंत त्यांची विनंती पोहचावी म्हणून ती धडपड करीत आहे.गृहमंत्र्यांनी लगेच पोलिसांना दिल्या सूचनादरम्यान आईचा हा टाहो गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचला. या माहितीची लगेच दखल घेत मुलीला मदत पोहचविण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. आईच्या सांगण्यानुसार मुलीला तिच्या मानेवाडा येथे राहणाऱ्या आजीपर्यंत पोहचविण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिल्या आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर