शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

मुलाला वाचविताना आईचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 7:29 PM

पाण्याचा अंदाज आला नसल्याने बैलबंडी नदीत उलटली. बैलासह मुलगा वाहून जात असल्याचे लक्षात येताच बंडीच्या मागे असलेल्या त्याच्या आईने मुलाचा वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तीच वाहून गेली आणि मृत्युमुखी पडली.

ठळक मुद्दे पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृत्यू : कोकर्डा येथील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (काटोल) : पाण्याचा अंदाज आला नसल्याने बैलबंडी नदीत उलटली. बैलासह मुलगा वाहून जात असल्याचे लक्षात येताच बंडीच्या मागे असलेल्या त्याच्या आईने मुलाचा वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तीच वाहून गेली आणि मृत्युमुखी पडली.  इंदू रामराव तभाने (६५) असे मृत महिलेचे नाव आहे.शेतीची कामे आटोपून इंदू तभाने व तिचा मुलगा उत्तम हे दोघेही सायंकाळी घरी वापस येत होते. गुरुवारी या परिसरात मुसळधार पाऊस झाला. शेतातून गावात येत असताना मधातच नदी ओलांडून जावे लागते. सायंकाळच्या वेळेला काळेकुट्ट आभाळ असल्यामुळे नेमका नदीतील पाण्याचा अंदाज बैलबंडी चालवीत असलेल्या मुलास आला नाही. शिवाय अचानक नदीतील पाण्याचा ओघ वाढला व मुलगा उत्तम याची बैलबंडी नदीत उलटली. त्या बैलबंडीच्या मागे असलेली त्याची आई बैलबंडी उलटल्याचे पाहून व मुलगा वाहून जात असल्याचे पाहून घाबरली. तिने मुलाला वाचविण्यासाठी मदतीचा हात दिला. काही कळायच्या आतच तिलासुद्धा पाण्याच्या वेगाने वाहून नेले. उत्तम मात्र समोरच्या एका चिल्हाटीच्या झुडपाला अडकला व बाहेर निघाला. बैलसुद्धा बंडीच्या जुवानीशी बाहेर निघून घरी पळत सुटले. इकडे उत्तम आपल्या आईला शोधू लागला. परंतु शेवटी आई मिळाली नसल्याने धावत येऊन घरच्यांना माहिती दिली. कुटुंब व गावकऱ्यांच्या मदतीने इंदू यांचा शोध घेतला असता घटनेच्या काही अंतरावरच तिचा मृतदेह रात्री ९ वाजताच्या सुमारास आढळून आला.

टॅग्स :Deathमृत्यूWomenमहिला