शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूरनजीकच्या कोरडी भागात शेतकऱ्यांसाठी ‘मॉर्निंग वॉक’ ठरतेय डोकेदुखी  !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 20:23 IST

सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने ‘मॉर्निंग वॉक’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सकाळी फिरायला जाणारी काही मंडळी नुसतीच फिरत नसून ती शेतीतील हरभरा आणि भाजीपाल्याची चोरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे कोराडीनजीकच्या घोगली येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतीमालाची चोरी वाढली : घोगली येथील शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूत नेटवर्कनागपूर  : सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने ‘मॉर्निंग वॉक’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सकाळी फिरायला जाणारी काही मंडळी नुसतीच फिरत नसून ती शेतीतील हरभरा आणि भाजीपाल्याची चोरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे कोराडीनजीकच्या घोगली येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत.कोराडी व परिसरातील काही गावांमधील नागरिक घोगली शिवारात रोज सकाळी फिरायला जातात. यातील काही हौशी मंडळी रोडलगतच्या शेतांमध्ये शिरतात आणि शेतातील हरभरा, मेथी, पालक, गाजर यासह अन्य भाजीपाला चोरून नेतात. घोगली येथल हरिभाऊ देवमन भांगे यांची शेती रोडलगत आहे. त्यांनी बाजारात विक्रीला नेण्यासाठी शेतातील मेथी गुरुवारी सायंकाळी उपटून शेतातच ठेवली होती. दुसऱ्या  दिवशी सकाळी (शुक्रवारी) फिरायला येणाऱ्यांनी ही मेथी चोरून नेली. ही मंडळी रोज सकाळी हातात मावेल इतका हरभरा उपटून नेत असल्याचेही हरिभाऊ भांगे यांनी सांगितले.सध्या या परिसरात असलेल्या तलावाचे पर्यटनाच्या दृष्टीने सौंदर्यीकरण केले जात आहे. त्यात तलावाची पाळ उंच व रुंद करण्यात आली. ही पाळ नांदा व कोराडी येथील नागरिकांसाठी ‘मॉर्निंग वॉक’च्या दृष्टीने पर्वणी ठरल्याने या भागात फिरायला येणाऱ्या  नागरिकांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. या भागातील शेतकरी भाजीपाल्याची पिके घेत असून, ते आधी भाजीपाला उपटून ठेवतात आणि दुसऱ्या  दिवशी विक्रीला नेतात. शुक्रवारी सकाळी या भागात फिरायला जाणाऱ्यांपैकी बहुतेकांच्या हातात मेथी दिसत आल्याची माहिती काहीं प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, याला आळा घालणार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर