शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नागपुरातील एक लाखाहून अधिक झोपडपट्टीधारक दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:09 IST

पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत.

ठळक मुद्देआदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपड्या हटविण्यासाठी नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ४२७ झोपडपट्ट्या आहेत. यातील जवळपास २९८ नोटिफाईड झालेल्या आहेत. विशेष म्हणगजे शहरातील नाल्याच्या काठावर ५० हून अधिक झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. यात एक लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत.आदर्श नगर नाल्यांची काही दिवसापूर्वी संरक्षण भिंत पडली. या भिंती लगतच्या काही घरांना धोका निर्माण झाला. या नागरिकांनी स्वत:हून आपली घरे सोडण्याची तयारी दर्शवली. परंतु मनपाच्या अतिक्रमण विभागाने तीन झोपड्या पोलिसांच्या मदतीने हटविल्या, तसेच काठावरील अन्य झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण घेण्यासंदर्भात नोटीस बजावली. आदर्श नगर ही झोपडपट्टी नोटीफाईड आहे. येथील झोपडपट्टीधारकांना मनपा प्रशासनाने मालकी हक्क पट्टे वाटप केले आहे. असे असतानाही अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील झोपडपट्टीधारकांत दहशतीचे वातावरण आहे.पावसाळा आला की मनपा प्रशासनातर्फे नदी-नाले काठावरील झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात अतिक्रमण हटविणे योग्य नाही. याची जाणीव असूनही अशा स्वरूपाच्या नोटीस बजावल्या जातात.आधी पुनर्वसन नंतर कारवाई करादेशातील कोणताही नागरिक बेघर राहणार नाही, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. यातूनच पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले जात आहे. असे असतानाही झोपडपट्टीधारकांना अतिक्रमणाच्या नावाखाली नोटीस बजावणे योग्य नाही. आधी पुनर्वसन करा नंतर अतिक्रमण हटवा, अशी मागणी झोपडपट्टीधारकांनी केली आहे. तर प्रशासनाने ही कारवाई तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा अ‍ॅड. यशवंत मेश्राम यांनी दिला आहे.कारवाईपूर्वी पुनर्वसन कराआदर्श नगर झोपडपट्टी नोटीफाईड आहे. येथील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे. नाल्याची भिंत जीर्ण झाल्याने धोका असलेल्या घरमालकांनी स्वत:हून घरे पाडण्याची तयारी दर्शविली.परंतु मनपाच्या अधिकाऱ्­यांनी धोका असलेली इमारत न पडता बाजूच्या झोपड्या पाडल्या. अन्य घरांनाही नोटीस बजावल्या. झोपडपट्टीधारकाचे पुनर्वसन न करता नोटीस बजावणे योग्य नाही. आधी पुनर्वसन करा नंतर कारवाई करा.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेसमनपाची कारवाई अन्यायकारकआदर्श नगर स्लम नोटीफाईड आहे. येथील लोकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी केलेले बांधकाम अधिक्रमण ठरवून नोटीस बजावणे योग्य नाही मनपा प्रशासनाने आधी त्यांचे पुनर्वसन करावे नंतरच कारवाई करावी.अ‍ॅड. यशवंत मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक.कोरोना विस्थापित करणे अयोग्यकोरोनामुळे सर्वजण संकटात आहेत. त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत.अशा परिस्थितीत झोपडपट्टीधारकांना विस्थापित करणे योग्य नाही. आधी त्यांची पुनर्वसनाची व्यवस्था करावी नंतरच प्रशासनाने कारवाई करावी.अनिल वासनिक, संयोजक विकास मंचकारवाई नियमानुसारचबांधकाम नकाशा मंजूर केल्याशिवाय मालकीहक्क पट्टे वाटप करता येत नाही. झोपडपट्टीधारकांनी आधी बांधकाम मंजूर करून घेणे अपेक्षित होते. परंतु तसे केले नाही. ६०० फुटाऐवजी अनेकांनी २ हजार चौरस फूट जागेत दोन मजली घरे उभारली. आदर्श नगर नाल्याची भिंत कोसळली. बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. उद्या एखादी दुर्घटना घडली तर यासाठी मनपालाच दोषी धरले जाईल. त्यामुळे कारवाई योग्यच आहे.महेश मोरोणे उपायुक्त मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका