शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मेळघाटात पाच वर्षांत चौदाशेहून अधिक बालमृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 07:30 IST

Nagpur News २०१७ पासून मेळघाटात चौदाशेहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. कागदावर कुपोषण नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी विदारक स्थिती कायम आहे.

ठळक मुद्देविदर्भाच्या दुर्गम भागातील वास्तव सुविधांचे दावे, मग मृत्यूंचे कारण काय?

नागपूर : मेळघाटमध्ये मागील पाच वर्षांत कुपोषणामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्य शासनातर्फे करण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात २०१७ पासून मेळघाटात चौदाशेहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. कागदावर कुपोषण नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी विदारक स्थिती कायम आहे. अशा स्थितीत राज्यातील माता व बालमृत्यू थांबणार तरी कसे व या मृत्यूंचे नेमके कारण तरी काय? याचे उत्तर कोण देणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. (More than 1400 child deaths in Melghat in five years)

मेळघाट क्षेत्र हे ३२३ गावांनी बनले असून, तेथील लोकसंख्या ३ लाख ३ हजार ४८० इतकी आहे. त्यातील २ लाख ३५ हजार २४१ नागरिक आदिवासी आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्याच आकडेवारीनुसार मार्च २०१७ ते ३१ मे २०२१ या कालावधीत १ हजार ४४९ बाल व अर्भक मृत्यू झाले. यात ० ते २८ दिवसांच्या वयोगटातील नवजात बाळांची संख्या ७४२ इतकी होती, तर ४३२ अर्भकांचा मृत्यू झाला. १ ते ६ या वयोगटातील ३४५ बालकांचा मृत्यू झाला.

योजनांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह

यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे झालेला नसून, सर्व मृत्यू विविध आजारांमुळे झाले आहेत, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करीत असले, तरी या मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूंमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकप्रतिनिधी कधी जागे होणार?

विदर्भातील गडचिरोली, अमरावती जिल्ह्यांत आदिवासी क्षेत्रात बाल आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अशी स्थिती असती तर तेथील नेत्यांनी प्रशासनाला सळो की पळो करून सोडले असते. मात्र, विदर्भातील लोकप्रतिनिधींमध्ये यासंदर्भात उदासीनता दिसून येत आहे.

 

वर्ष - अर्भक मृत्यू - नवजात अर्भक मृत्यू (० ते २८ दिवस) - बालमृत्यू (१ ते ६ वर्षे)

मार्च २०१७ - १६० - १२० - १२७

मार्च २०१८ - १५१ - ६६ - ५१

मार्च २०१९ - १४४ - १०१ - ६४

मार्च २०२० - १२२ - ७४ - ५०

मार्च २०२१ - १५५ - ५७ - ४१

मे २०२१ - १० - १४ - १२

टॅग्स :Melghatमेळघाट