शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

मेळघाटात पाच वर्षांत चौदाशेहून अधिक बालमृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 07:30 IST

Nagpur News २०१७ पासून मेळघाटात चौदाशेहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. कागदावर कुपोषण नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी विदारक स्थिती कायम आहे.

ठळक मुद्देविदर्भाच्या दुर्गम भागातील वास्तव सुविधांचे दावे, मग मृत्यूंचे कारण काय?

नागपूर : मेळघाटमध्ये मागील पाच वर्षांत कुपोषणामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्य शासनातर्फे करण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात २०१७ पासून मेळघाटात चौदाशेहून अधिक अर्भक व बालमृत्यू झाले आहेत. कागदावर कुपोषण नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी विदारक स्थिती कायम आहे. अशा स्थितीत राज्यातील माता व बालमृत्यू थांबणार तरी कसे व या मृत्यूंचे नेमके कारण तरी काय? याचे उत्तर कोण देणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. (More than 1400 child deaths in Melghat in five years)

मेळघाट क्षेत्र हे ३२३ गावांनी बनले असून, तेथील लोकसंख्या ३ लाख ३ हजार ४८० इतकी आहे. त्यातील २ लाख ३५ हजार २४१ नागरिक आदिवासी आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्याच आकडेवारीनुसार मार्च २०१७ ते ३१ मे २०२१ या कालावधीत १ हजार ४४९ बाल व अर्भक मृत्यू झाले. यात ० ते २८ दिवसांच्या वयोगटातील नवजात बाळांची संख्या ७४२ इतकी होती, तर ४३२ अर्भकांचा मृत्यू झाला. १ ते ६ या वयोगटातील ३४५ बालकांचा मृत्यू झाला.

योजनांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह

यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे झालेला नसून, सर्व मृत्यू विविध आजारांमुळे झाले आहेत, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करीत असले, तरी या मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूंमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकप्रतिनिधी कधी जागे होणार?

विदर्भातील गडचिरोली, अमरावती जिल्ह्यांत आदिवासी क्षेत्रात बाल आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अशी स्थिती असती तर तेथील नेत्यांनी प्रशासनाला सळो की पळो करून सोडले असते. मात्र, विदर्भातील लोकप्रतिनिधींमध्ये यासंदर्भात उदासीनता दिसून येत आहे.

 

वर्ष - अर्भक मृत्यू - नवजात अर्भक मृत्यू (० ते २८ दिवस) - बालमृत्यू (१ ते ६ वर्षे)

मार्च २०१७ - १६० - १२० - १२७

मार्च २०१८ - १५१ - ६६ - ५१

मार्च २०१९ - १४४ - १०१ - ६४

मार्च २०२० - १२२ - ७४ - ५०

मार्च २०२१ - १५५ - ५७ - ४१

मे २०२१ - १० - १४ - १२

टॅग्स :Melghatमेळघाट