शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत : नवीन सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:03 AM

पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच होणार असून, नागपुरात पूर्वीप्रमाणे हिवाळी अधिवेशन होणार आहे. राज्यपाल कार्यालयाने त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊन नवीन पायंडा पाडणाऱ्या भाजप सरकारला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याची वेळ सरकारवर आली. त्यामुळे पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्यात येत असल्याचे सांगितले जाते. १७ जूनपासून अधिवेशन सुरू होणार असून, राज्यपालांनी तशी अधिसूचनाही काढली आहे तर, परंपरेनुसार हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. जे नवीन सरकार आल्यानंतरचे असेल.

ठळक मुद्देराज्यपाल कार्यालयाची अधिसूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच होणार असून, नागपुरात पूर्वीप्रमाणे हिवाळी अधिवेशन होणार आहे. राज्यपाल कार्यालयाने त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊन नवीन पायंडा पाडणाऱ्या भाजप सरकारला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याची वेळ सरकारवर आली. त्यामुळे पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्यात येत असल्याचे सांगितले जाते. १७ जूनपासून अधिवेशन सुरू होणार असून, राज्यपालांनी तशी अधिसूचनाही काढली आहे तर, परंपरेनुसार हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. जे नवीन सरकार आल्यानंतरचे असेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रहाने पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले होते. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी असतो. निधीही संपलेला असतो. त्यामुळे वैदर्भीयांना न्याय देता येत नाही, असा युक्तिवाद भाजपतर्फे करण्यात आला होता. विरोधकांनी मात्र मोर्चे, आंदोलनाला सरकार घाबरत असल्याचे सांगून आरोपही केले होते. मुंबईतील मनोरा आमदार निवास पाडणार असल्याने आमदारांची गैरसोय होईल, असाही तर्क लावला जात होता. सर्व आरोपानंतरही सरकारने अधिवेशन नागपूरला घेतले. ४ जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र पावसाने धुमाकूळ घातला. विधानसभेच्या इमारतीत पाणी घुसले. वीज यंत्रणा असलेल्या खोलीत पाणी घुसले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करावा लागला. या सर्व गोंधळामुळे संपूर्ण दिवसाचे कामकाज बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. त्यामुळे यंदा पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्यात येणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMumbaiमुंबई