अजुनही मानसूनचा बॅकलाॅग ५ टक्के...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST2021-09-12T04:11:48+5:302021-09-12T04:11:48+5:30

हवामान अभ्यासक सुरेश चाेपणे यांच्या मते, मानसूनच्या वागण्यामध्ये आलेली अनियमितता पर्यावरणीय बदलाचे परिणाम आहेत. आतापर्यंत नैर्ऋत्य माेसमी वाऱ्यापासून आपल्या ...

Monsoon backlog still 5% ... | अजुनही मानसूनचा बॅकलाॅग ५ टक्के...

अजुनही मानसूनचा बॅकलाॅग ५ टक्के...

हवामान अभ्यासक सुरेश चाेपणे यांच्या मते, मानसूनच्या वागण्यामध्ये आलेली अनियमितता पर्यावरणीय बदलाचे परिणाम आहेत. आतापर्यंत नैर्ऋत्य माेसमी वाऱ्यापासून आपल्या महाराष्ट्रात पाऊस व्हायचा. आता पाऊस बंगालच्या खाडीत हाेणाऱ्या बदलावर अवलंबून असताे. गेल्या काही वर्षात झडीचा पाऊसच दिसेनासा झाला. महिन्यातून काही दिवस जाेरदार पाऊस हाेताे, पण असा पाऊस पिकांसाठी हानीकारक असल्याचे चाेपणे म्हणाले.

जुलै व ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाल्याने पावसाची कमतरता २० टक्क्याच्या वर गेली हाेती. सप्टेंबरच्या पावसाने तुटवडा १० टक्केच्या खाली आला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस सामान्यच म्हणता येईल. या आठवड्यात चांगला पाऊस हाेईल. आपल्याकडे सप्टेंबर व ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून चालताे. त्यामुळे ही तूट सहज भरली जाईल.

- एम.एन. साहू, संचालक, हवामान विभाग, नागपूर

जिल्हा आतापर्यंत पाऊस गेल्या वर्षी सामान्य

नागपूर ८२७.३ मिमी ८३३.९ ९२०.४

वर्धा ७८९ ६०८.८ ८७४.५

भंडारा ९०९.५ १०९८.६ ११५७

गाेंदिया ९१७.९ १२३१.९ १२२०.३

चंद्रपूर ११०२.३ ७५४.४ १०८४

गडचिराेली ९८२.६ १२००.३ १२५४.१

Web Title: Monsoon backlog still 5% ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.