शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उत्साह आणि अपेक्षांचे क्षण! जीएमसीमधील २०१९ बॅचचा दीक्षांत सोहळा

By सुमेध वाघमार | Updated: April 29, 2025 16:07 IST

डॉक्टरांनी घेतली समाजसेवेची शपथ : पहिल्याच सोहळ्याने वेधले लक्ष

सुमेध वाघमारे नागपूर : शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयामधील (जीएमसी) २०१९ एमबीबीएस बॅचच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कठोर परिश्रम आणि समर्पण भावनेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. उत्साह आणि अपेक्षांचे क्षण असलेल्या या जीएमसीमधील पहिल्याच सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधले.

प्रमुख पाहुणे म्हणून जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व डॉ. समीर गोलावार उपस्थित होते. या दीक्षांत सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता आणि मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. त्यांना पदवी प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रिना वाघ व डॉ. रिना कळसी यांच्या नेतृत्वात २०२२ च्या बॅचच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांनी केले. आभार डॉ. माहोरे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते. आपल्या मुलांच्या या यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

जिथे सर्वाधिक गरज आहे तेथून रुग्णसेवेची सुरुवात करा-डॉ. गजभियेअधिष्ठाता डॉ. राज गजभिये म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची उपलब्धता शहरांच्या तुलनेत खूपच कमी असते. त्यामुळे, आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग अशा ठिकाणी केल्यास, खऱ्या अर्थाने गरजवंत लोकांची सेवा घडेल. तिथे सोयीसुविधांचा अभाव असू शकतो, आव्हाने अधिक असू शकतात; पण त्यातून मिळणारे समाधान निश्चितच खूप मोठे आणि अनमोल असेल. ग्रामीण भागात अनेक गंभीर आजारांवर वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत, जर आपण स्वत:हून पुढे येऊन त्यांना मदत केली, तर त्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञता हे आपल्या कामाचे सर्वांत मोठे पारितोषिक असेल.

एआयचा वापर करताना मानवी मूल्यांना प्राधान्य द्या -डॉ. देशपांडेकुलगुरू डॉ. देशपांडे म्हणाले, आज कृत्रिम बुद्धिमत्ता जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ह्यएआयह्णमध्ये प्रचंड क्षमता आहे, पण ते मानवी भावना, सहानुभूती आणि नैतिक मूल्यांची जागा घेऊ शकत नाही. एआयचा निर्णय घेताना आणि कृती करताना मानवी स्पर्श आणि विचार महत्त्वाचे असतात. विशेषत: आरोग्य सेवेसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये ह्यएआयह्णचा वापर करताना मानवी मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करताना माणसांमधील मानवता, नैतिकता आणि सामाजिक बांधीलकी विसरता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयnagpurनागपूर