शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

उत्साह आणि अपेक्षांचे क्षण! जीएमसीमधील २०१९ बॅचचा दीक्षांत सोहळा

By सुमेध वाघमार | Updated: April 29, 2025 16:07 IST

डॉक्टरांनी घेतली समाजसेवेची शपथ : पहिल्याच सोहळ्याने वेधले लक्ष

सुमेध वाघमारे नागपूर : शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयामधील (जीएमसी) २०१९ एमबीबीएस बॅचच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कठोर परिश्रम आणि समर्पण भावनेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. उत्साह आणि अपेक्षांचे क्षण असलेल्या या जीएमसीमधील पहिल्याच सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधले.

प्रमुख पाहुणे म्हणून जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व डॉ. समीर गोलावार उपस्थित होते. या दीक्षांत सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व्यवसायातील नैतिकता आणि मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. त्यांना पदवी प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रिना वाघ व डॉ. रिना कळसी यांच्या नेतृत्वात २०२२ च्या बॅचच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांनी केले. आभार डॉ. माहोरे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते. आपल्या मुलांच्या या यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

जिथे सर्वाधिक गरज आहे तेथून रुग्णसेवेची सुरुवात करा-डॉ. गजभियेअधिष्ठाता डॉ. राज गजभिये म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची उपलब्धता शहरांच्या तुलनेत खूपच कमी असते. त्यामुळे, आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग अशा ठिकाणी केल्यास, खऱ्या अर्थाने गरजवंत लोकांची सेवा घडेल. तिथे सोयीसुविधांचा अभाव असू शकतो, आव्हाने अधिक असू शकतात; पण त्यातून मिळणारे समाधान निश्चितच खूप मोठे आणि अनमोल असेल. ग्रामीण भागात अनेक गंभीर आजारांवर वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत, जर आपण स्वत:हून पुढे येऊन त्यांना मदत केली, तर त्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञता हे आपल्या कामाचे सर्वांत मोठे पारितोषिक असेल.

एआयचा वापर करताना मानवी मूल्यांना प्राधान्य द्या -डॉ. देशपांडेकुलगुरू डॉ. देशपांडे म्हणाले, आज कृत्रिम बुद्धिमत्ता जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ह्यएआयह्णमध्ये प्रचंड क्षमता आहे, पण ते मानवी भावना, सहानुभूती आणि नैतिक मूल्यांची जागा घेऊ शकत नाही. एआयचा निर्णय घेताना आणि कृती करताना मानवी स्पर्श आणि विचार महत्त्वाचे असतात. विशेषत: आरोग्य सेवेसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये ह्यएआयह्णचा वापर करताना मानवी मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करताना माणसांमधील मानवता, नैतिकता आणि सामाजिक बांधीलकी विसरता कामा नये, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयnagpurनागपूर