शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मोहन भागवतांना नागपुरच्याच तुरुंगात टाकणार; प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 20:30 IST

नागपुरमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघातर्फे वंचित आघाडीचे अर्थव्यवस्था अधिवेशन घेण्यात आले.

नागपूर : काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांना नक्षलग्रस्त भागातील खनिजसंपत्ती लुटायची आहे. म्हणून सलवा जुडुम राबविण्यात आला. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव अडकवले. पुढील निवडणुकीत भाजपला दोन आकडी जागांवर आणणार असून संरसंघचालक मोहन भागवत यांना नागपुरच्याच तुरुंगात टाकण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला. 

नागपुरमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघातर्फे वंचित आघाडीचे अर्थव्यवस्था अधिवेशन घेण्यात आले. यावेळी एमआयएमचे आमदार वारीस पठाण हजर होते. यावेळी आंबेडकर यांनी विविध विषयांवर सरकारवर टीका केली. उर्जित पटेल यांच्या जागी आलेल्या नूतन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास हे इतिहासाचे पदवीधर आहेत. मग त्यांना आरबीआयचे गव्हर्नर का केले? असे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना संघ आरबीआयला इतिहासजमा करायला निघाला आहे का, असा सवाल उपस्थित केला. 

हेमंत करकरेंना कोणी मारले? पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव अडकवले गेले. या सरकारला पुढील निवडणुकीत दोन आकडी जागांवर आणण्याचे सांगतानाचा भागवतांना नागपुरच्याच तुरुंगात टाकणार असल्याचे वक्तव्य आंबेडकर यांनी केले. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसला आमच्याशी आघाडी करायची असेल तर एमआयएमसोबतही करावी लागेल. आम्ही एमआयएमची साथ सोडणार नाही. महत्वाचे म्हणजे अशोक चव्हाणांना आधी केंद्रीय नेतृत्वाने आघाडी कोणाशी करावी आणि कोणाशी करू नये याचे अधिकार दिले आहेत का हे आधी स्पष्ट करावे, असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMohan Bhagwatमोहन भागवतAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ