शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

मोहम्मद रफींची ‘सावली’ हरवली : गायक मोहम्मद अझीझ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:14 IST

दोघांच्याही नावात मोहम्मद होते. एक मोहम्मद रफी तर दुसरा मोहम्मद अझीझ. मोहम्मद रफींची गायनाची शैली अंगिकारून मोहम्मद अझीझ यांनी आयुष्यभर संगीताची पूजा बांधली, म्हणूनच त्यांना मोहम्मद रफींची ‘सावली’ संबोधले जायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात समग्र मानव कल्याणाचा संदेश देणाऱ्या धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे मोहम्मद अझीझ यांचे नागपूरवर विशेष प्रेम होते.

ठळक मुद्देनागपुरात केले होते बाबासाहेबांच्या महानतेचे कौतुक

सुमेध वाघमारेनागपूर : दोघांच्याही नावात मोहम्मद होते. एक मोहम्मद रफी तर दुसरा मोहम्मद अझीझ. मोहम्मद रफींची गायनाची शैली अंगिकारून मोहम्मद अझीझ यांनी आयुष्यभर संगीताची पूजा बांधली, म्हणूनच त्यांना मोहम्मद रफींची ‘सावली’ संबोधले जायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात समग्र मानव कल्याणाचा संदेश देणाऱ्या धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे मोहम्मद अझीझ यांचे नागपूरवर विशेष प्रेम होते.एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने २५ एप्रिल २०१४ रोजी ते नागपुरात आले असताना एका खासगी चॅनलने त्यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी आपल्या जीवनातील काही अंतरंग उलगडले होते. विशेषत: बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ते भरभरून बोलले.बाबासाहेबांमुळेच खऱ्या अर्थाने अस्पृश्य समाज स्वतंत्र झाला. हा महामानव जन्माला आला नसता तर गावकुसाबाहेरचा हा वंचित समाज कधीच समाजाच्या मुख्य प्रवाहाचा भाग झाला नसता, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. ही मुलाखत प्रत्यक्ष पाहणाऱ्या शेकडो नागपूरकरांनी तेव्हा मोहम्मद अझीझ यांच्या या आंबेडकरप्रेमाचे विशेष कौतुकही केले होते. आज त्यांच्या मृत्यूची बातमी शहरात धडकली आणि त्या गाजलेल्या मुलाखतीचे सर्वांना स्मरण झाले.मोहम्मद अझीझ यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमधील अशोकनगर येथे झाला. १९८०-९० दरम्यान त्यांनी सुपरहिट गाणी गायली. दूध का कर्ज, खुदा गवाह, हीना, स्वर्ग, गीत यासारख्या चित्रपटांत पार्श्वगायन केले. तर ‘मर्द टांगेवाला’, ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘मैं से मीना से न साकी’, ‘आपके आ जाने से’ प्यार हमारा अमर रहे, ऐ मेरे दोस्त, तेरी बेवफाई का शिकवा, मितवा भूल ना जाना, फूल गुलाब का, दुनिया में कितना गम है, रब को याद करू, बहुत जताते हो, तू कल चला जायेगा, यासारखी सुपरहिट गीते दिली. 

नागपुरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना त्यांनी दिलेल्या एका संगीताचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, माझे गुरू व आदर्श मोहम्मद रफी यांचे गाणे गातच लहानाचा मोठा झालो. चित्रपटात गाणी गाण्याची पाहिली संधी ‘अंबर’ या चित्रपटात मिळाली. परंतु प्रसिद्धी आणि ओळख मिळाली ते ‘मर्द’ या चित्रपटातील ‘मै मर्द टांगेवाला’ या गाण्यातून. त्यानंतर सर्वच संगीतकारांसोबत गाणी गायिली. माझ्या करिअरमध्ये प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक उषा खन्ना यांनी बरीच मदत केली. त्या माझ्या बहिणीसारख्या होत्या. लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्यासोबत २७७ गाणी गायिली. त्यांच्यासोबत काम करणे कठीण असले तरी एक उत्साह असायचा, असेही ते म्हणाले. या मुलाखतीपूर्वी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. परिवर्तनाची भूमी त्यांनी अनुभवली. म्हणूनच मुलाखतीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवर्जून उल्लेख केला. अस्पृश्यांना खरे स्वातंत्र्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळाले, असे म्हणत बाबासाहेबांच्या कार्याची महती सांगितली. त्यांनी आपल्या नागपुरातील ‘मोहम्मद अझीझ लाईव्ह कॉन्सेट’मध्ये ‘जयभीम जयभीम, जयभीम राया दलितों का तुमने भाग्य जगाया’, हे गीतही सादर केले होते.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर