शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूरसह विदर्भात आठवडाभर मध्यम ते जाेरदार पाऊस

By निशांत वानखेडे | Updated: September 27, 2023 19:17 IST

हवामान विभागाने दिला येलाे अलर्ट : परत जाईपर्यंत हजेरीचा अंदाज

नागपूर : ढगाळ वातावरणासह विदर्भात सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपात हजेरी लावणारा पाऊस पुढचा आठवडाभर असाच सक्रिय राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती व यवतमाळमध्ये पुढचे पाच दिवस तर इतर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस येलाे अलर्ट जारी केला आहे.

मान्सूनने राजस्थानाहून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर ५ ऑक्टाेबरपर्यंत विदर्भासह महाराष्ट्रातून निराेप घेण्याचा अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातून पाय काढेपर्यंत पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात २८ सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी तर त्यानंतर ३ ऑक्टाेबरपर्यंत अनेक ठिकाणी मध्यम ते जाेराचा पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. भंडारा, वर्धा, अमरावती जिल्ह्यात हीच स्थिती राहिल तर चंद्रपूर, गडचिराेली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात आजपासूनच पावसाला जाेर राहिल, असा अंदाज आहे. या काळात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्यासह कृषी विभागानेही दिला आहे.

दरम्यान मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची सक्रियता वाढली आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यवतमाळमध्ये सर्वाधिक ४४ मि.मी. पाऊस झाला. यासह मूर्तीजापूर, अंजनगाव सुर्जी, भंडारा-पवनी, संग्रमापूर, सिंदेवाही, काेरची, सडक अर्जुनी, मंगरूळपिर अशा सर्व जिल्ह्यात पावसाने किरकाेळ हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे तापमान अंशत: कमी झाल्याचे जाणवत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस