शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल जॅमर... भास्कर जाधवांचा व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 10:18 IST

दिल्लीतील घुसखोरीच्या घटनेनंतर विधानपरिषद सभागृहात पास देताना केवळ आमदारांच्या दोनच सदस्यांना पास दिले जातील

नागपूर - देशाच्या संसदेत दोन दिवसांपूर्वी काही तरुणांनी घुसखोरी करत गोंधळ घातला. देशाच्या सर्वोच्च सभागृहात अशाप्रकारची घटना घडल्यामुळे देशभर चर्चा होत असून संसद आणि विधानसभा सभागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संसदेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाची कसून तपासणी होत असते. सभागृहात जाताना काहीही नेण्यास परवानगी नसते. तरीही दोन तरुणांनी घुसकोरी करत सभागृहात रंगाच्या धुरांचे फटाके फोडले. दिल्लीतील या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. 

दिल्लीतील घुसखोरीच्या घटनेनंतर विधानपरिषद सभागृहात पास देताना केवळ आमदारांच्या दोनच सदस्यांना पास दिले जातील, असे सांगण्यात आले. तसेच, प्रेक्षकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. एकीकडे संसद किंवा विधानसभेतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळातही आमदारांना मोबाईल बंदी करण्याची मागणी केली आहे. देशाच्या संसदेत खासदारांना मोबाईल घेऊन दिला जात नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या विधिमंडळातही मोबाईल फोन्सना बंदी करावी, असे आमदार राणेंनी म्हटलं आहे. यावेळी, सभागृहात महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असतानाही आमदार भास्कर जाधव फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

''पार्लमेंटमध्ये मोबाईल फोन चालत नाही, तिथे jammer असल्यामुळे फोन बंद असतो. विधिमंडळ सभागृहामध्ये एसटी कर्मचारी यांच्या बँकेचा महत्त्वाचा विषय चालू असताना महा फडतूस भास्कर जाधव हा फोनवर बोलताना दिसतोय. मुळात सभागृहामध्ये पार्लमेंटसारखं मोबाईल चालताच कामा नये,'' असे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं. तसेच, प्रत्येक आमदाराला समोर लॅपटॉप दिला आहे, मग तो कशासाठी? सभागृहाच्या आत मोबाईलवर असं कुठलं वेगळं कामकाज असतं?, असा सवालही आमदार राणेंनी विचारला आहे. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे MobileमोबाइलBhaskar Jadhavभास्कर जाधवvidhan sabhaविधानसभा