शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच निधी देतात; आमदार आशिष जयस्वालांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 18:19 IST

आमदार आशिष जयस्वाल यांनी निधी वाटपावरून पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळला आहे.

ठळक मुद्देआशिष जयस्वाल यांनी पुन्हा ठेवले मंत्र्यांच्या टक्केवारीवर बोट

नागपूर : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. आशिष जयस्वाल यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या टक्केवारीवर बोट ठेवत नाराजीचा सूर आवळला आहे. अनेक मंत्री आमदारांपासून मतदारसंघाच्या कामातून देखील पैशाची अपेक्षा ठेवतात. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच काही मंत्री निधी देतात. वेगवेगळ्या पद्धतीने तो निधी घेण्याचा प्रयत्न करतात, असा खळबळजनक आरोप पुन्हा आशिष जयस्वाल यांनी सोमवारी केला.

आ. जयस्वाल म्हणाले, काही मंत्री चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. त्यांना असे वाटत आहे की मीच सर्वेसर्वा झालो आहे. मीच या निधीचा मालक आहे. अशांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी केली पाहिजे. आमदारांना सांभाळण्याची मंत्र्यांची जबाबदारी आहे. मी शिवसैनिक आहे. महाविकास आघाडी सोबत आहे. त्यामुळे राज्यसभा व विधान परिषदेची निवडणूक झाल्यावर मी माझी लढाई सुरू ठेवीन.

...तर सरकारला दुष्परिणाम भोगावे लागतील

निधी वाटपावरून आमदारांची नाराजी कायम आहे. निधी वाटपाचा असमतोल सहन करणार नाही. जे मंत्री आमदारांना मोजत नाही, किंमत देत नाही, जर आमदारांचे प्रश्न सुटले नाही, न्याय मिळाला नाही, तर आम्ही सहन करणार नाही. याचा उद्रेक होईल. याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा जयस्वाल यांनी दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Jaiswalआशीष जयस्वालnagpurनागपूरfundsनिधीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी