शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
2
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
3
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
4
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
5
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
6
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
7
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
8
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
9
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
10
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
11
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
12
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
13
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
14
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
15
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
16
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
17
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
18
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
19
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
20
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड

मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच निधी देतात; आमदार आशिष जयस्वालांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 18:19 IST

आमदार आशिष जयस्वाल यांनी निधी वाटपावरून पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळला आहे.

ठळक मुद्देआशिष जयस्वाल यांनी पुन्हा ठेवले मंत्र्यांच्या टक्केवारीवर बोट

नागपूर : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. आशिष जयस्वाल यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या टक्केवारीवर बोट ठेवत नाराजीचा सूर आवळला आहे. अनेक मंत्री आमदारांपासून मतदारसंघाच्या कामातून देखील पैशाची अपेक्षा ठेवतात. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच काही मंत्री निधी देतात. वेगवेगळ्या पद्धतीने तो निधी घेण्याचा प्रयत्न करतात, असा खळबळजनक आरोप पुन्हा आशिष जयस्वाल यांनी सोमवारी केला.

आ. जयस्वाल म्हणाले, काही मंत्री चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. त्यांना असे वाटत आहे की मीच सर्वेसर्वा झालो आहे. मीच या निधीचा मालक आहे. अशांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी केली पाहिजे. आमदारांना सांभाळण्याची मंत्र्यांची जबाबदारी आहे. मी शिवसैनिक आहे. महाविकास आघाडी सोबत आहे. त्यामुळे राज्यसभा व विधान परिषदेची निवडणूक झाल्यावर मी माझी लढाई सुरू ठेवीन.

...तर सरकारला दुष्परिणाम भोगावे लागतील

निधी वाटपावरून आमदारांची नाराजी कायम आहे. निधी वाटपाचा असमतोल सहन करणार नाही. जे मंत्री आमदारांना मोजत नाही, किंमत देत नाही, जर आमदारांचे प्रश्न सुटले नाही, न्याय मिळाला नाही, तर आम्ही सहन करणार नाही. याचा उद्रेक होईल. याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा जयस्वाल यांनी दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Jaiswalआशीष जयस्वालnagpurनागपूरfundsनिधीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी