शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालय की 'लुटारूंच्या टोळीचे' केंद्र ? विजय वडेट्टीवारांचा घणाघाती आरोप; 'खरात' प्रकरणावरून खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:11 IST

Nagpur : मंत्रालयात २०% कमिशनचा बाजार ! १५०० कोटींच्या काळ्या पैशावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर : महाराष्ट्र सरकार हे आता सर्वसामान्यांना न्याय देणारे केंद्र राहिले नसून, ते लुटारूंच्या टोळीचे केंद्र झाले आहे,अशा अत्यंत तिखट शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मंत्रालयातील भ्रष्टाचारापासून ते खरात प्रकरणापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना धक्कादायक खुलासे केले.

​'खरात' हा महाराष्ट्राला लागलेला कलंक

​सुषमा अंधारे यांनी उघड केलेल्या पुराव्यांचा संदर्भ देत वडेट्टीवार म्हणाले की, "खरात हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. काळा पैसा पांढरा करणाऱ्या या व्यक्तीचे नाव कोडमध्ये लिहिले असण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील व्हिडिओमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. केवळ चाकणकर यांच्यावर कारवाई करून चालणार नाही, तर या प्रकरणातील सर्व 'मोठ्या माशांवर' कठोर कारवाई झाली पाहिजे." कायदे बनवणारेच जर कायदे मोडत असतील, तर ही राज्यासाठी शरमेची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मंत्रालयात कमिशनखोरीचा बाजार?

​राज्यात सध्या सुरू असलेल्या शासन निर्णयांच्या (GR) पावसावर वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझ्या माहितीनुसार आतापर्यंत हजारपेक्षा जास्त जीआर काढले गेले आहेत. मंत्रालयातील सर्व विभागांतून केवळ पैसे वाटण्याचे काम सुरू असून, प्रत्येक बिलामागे १० ते २० टक्के कमिशन घेतले जात आहे,असा गंभीर आरोप त्यांनी केला.

​१५०० कोटींचा काळा पैसा आणि 'सीए' चौकशीची मागणी

​खरात प्रकरणातील पैशांच्या स्त्रोताबाबत बोलताना ते म्हणाले की, आज १५०० ते २००० कोटी रुपयांचा आकडा समोर येत आहे, हा पैसा आला कुठून? मंत्रालयातील निम्म्या लोकांनी आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी खरातचा वापर केला असावा, असा मला संशय आहे. त्यामुळे केवळ नोटीस देऊन चालणार नाही, तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल 'सीए' (CA) चौकशी झाली पाहिजे, तरच सत्य बाहेर येईल.

​या प्रकरणातील खरे सूत्रधार राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील कोण आहेत, याचा पर्दाफाश झाल्याशिवाय ही चौकशी पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra government a den of looters? Vadettiwar alleges corruption.

Web Summary : Vijay Vadettiwar accuses the Maharashtra government of being a den of looters, citing corruption and the 'Kharat' case. He demands a CA investigation into the alleged 1500 crore black money laundering, implicating officials.
टॅग्स :nagpurनागपूर