शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

सैन्य प्रशिक्षण काळातील 'रगडा'च सैनिकांना घडवितो : कॅ. मधुसूदन वखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:01 IST

युद्ध प्रसंगात मेलो तर मेलो आणि जगलो तर जगलो, अशी योद्धा मानसिकता असते. ही मानसिकता सैन्य प्रशिक्षण काळातील शिक्षा ज्याला 'रगडा' म्हणतात, त्यातूनच घडत जाते, अश्या भावना सेवानिवृत्त कॅप्टन मधुसूदन वखरे यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देअ वॉर डायरी : १९७१ चे युद्ध आणि पाकड्यांनी बंगालींवर केलेला अत्याचारउलगडला बांग्लादेश निर्मितीचा थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युद्ध प्रसंगात मेलो तर मेलो आणि जगलो तर जगलो, अशी योद्धा मानसिकता असते. ही मानसिकता सैन्य प्रशिक्षण काळातील शिक्षा ज्याला 'रगडा' म्हणतात, त्यातूनच घडत जाते, अश्या भावना सेवानिवृत्त कॅप्टन मधुसूदन वखरे यांनी व्यक्त केल्या.रणशिंग आणि मनी बी च्या वतीने १९७१च्या युद्धातील विजयाला, बांगलादेश निर्मितीला व ९३ हजार पाकिस्तानि सैनिकांच्या शरणागतीला ४८ वर्ष पूर्ण झाल्याच्या पर्वावर त्या युद्धात आत्ताच्या बांगलादेश सीमेवर तीन पॉईंटवर नेतृत्व करणाऱ्या कॅ. वखरे यांची प्रगट मुलाखत प्रसिद्ध निवेदिका रेणुका देशकर यांनी घेतली. सिव्हिल लाईन्स येथील चिटनविस सेंटर येथे हा कार्यक्रम सोमवारी पार पडला.११ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१ या युद्धाच्या काळात मी डायरी लिहिली. कुठून डायरी आली आणि त्यावर युद्ध प्रसंगातील घटना लिहून काढाव्या, असे सुचले हे देवच जाणे. मात्र, त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीच डायरी लिहिली नाही. या डायरीमधील नोंदी युद्धप्रसंगातील दस्ताऐवज झाल्याचे कॅ. वखरे यावेळी म्हणाले. सेनेत अनुशासन, चिकाटी आणि देशनिष्ठा अंगी बाणवली जाते. सैनिक युद्धात कधीच मरत नाही. तो विरगतीला प्राप्त होतो. मृत्यूचे भय जपून मुलांना सेनेत जाण्यापासून परावृत्त करू नका. सेनेत युद्धात विरगतीला प्राप्त होणाऱ्यांपेक्षा देशात दररोज रस्ते अपघातात हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. सैनिकाची नोकरी ही मानाची, प्रत्येक कुटूंबाला अभिमान वाटावी अशी आहे. प्रत्येक घरातून एक तरुण सेनेत असला तर त्या कुटूंबात आपल्या सिमा, देश आणि आपले नागरिक, आपला इतिहास याबद्दल समाजात जाणिव होईल. सैनिकाबद्दल मनात सन्मान वाढेल आणि संपूर्ण समाज अनुशाशीत होईल, असे ते म्हणाले. यावेळी प्रसिध्द वक्ते आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी उपस्थित होते. निवेदन प्रफुल्ल माटेगावकर यांनी केले.बरं झालं घोडा नव्हता! - अनुराधा वखरेहे उत्तम घोडेस्वार आहेत. सर्कस मधील सर्व कवायती ते सहज करतात. कुठे फिरायला गेलो आणि घोडा दिसला की लगेच घोड्याची लगाम घ्यायची आणि सुसाट पळायचं, हा त्यांचा नेम. बरं झालं आमच्या लग्नात नवरदेवाला घोडा नव्हता. नाही तर घोड्यावर नवरदेव म्हणून आलेले कॅप्टन स्वत:ला पृथ्वीराज चौहान समजले असते आणि मला संयुक्ता समजून सुसाट पळाले असते, अशी मिस्कीली अनुराधा मधुसूदन वखरे यांनी यावेळी केली. देशभक्ती प्रत्येकाच्या मनात असलीच पाहिजे. आई-वडिलांनी मुलांमध्ये देशप्रेम जागृत केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.अटलजींचे ते आवाहन मानले गेले असते तर! - दयाशंकर तिवारी१९०५ मध्ये आपण गुलामीत असतानाही इंग्रजांना बंगालची फाळणी करू दिली नव्हती. त्यासाठी लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल यांनी आंदोलन उभे केले. १९४७मध्ये भारताचे विभाजन झाल्यानंतर, १९७१च्या युद्धामुळे बंगाल प्रांत पुन्हा भारतात विलिन करून लाल-बाल-पाल यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्याची मागणी तेव्हा संसदेत अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे केली होती. मात्र, तसे केले गेले नाही. अन्यथा बांग्लादेश कधीच अस्तित्त्वात आला नसता, अशी भावना दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :warयुद्धPakistanपाकिस्तान