शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य प्रशिक्षण काळातील 'रगडा'च सैनिकांना घडवितो : कॅ. मधुसूदन वखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:01 IST

युद्ध प्रसंगात मेलो तर मेलो आणि जगलो तर जगलो, अशी योद्धा मानसिकता असते. ही मानसिकता सैन्य प्रशिक्षण काळातील शिक्षा ज्याला 'रगडा' म्हणतात, त्यातूनच घडत जाते, अश्या भावना सेवानिवृत्त कॅप्टन मधुसूदन वखरे यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देअ वॉर डायरी : १९७१ चे युद्ध आणि पाकड्यांनी बंगालींवर केलेला अत्याचारउलगडला बांग्लादेश निर्मितीचा थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युद्ध प्रसंगात मेलो तर मेलो आणि जगलो तर जगलो, अशी योद्धा मानसिकता असते. ही मानसिकता सैन्य प्रशिक्षण काळातील शिक्षा ज्याला 'रगडा' म्हणतात, त्यातूनच घडत जाते, अश्या भावना सेवानिवृत्त कॅप्टन मधुसूदन वखरे यांनी व्यक्त केल्या.रणशिंग आणि मनी बी च्या वतीने १९७१च्या युद्धातील विजयाला, बांगलादेश निर्मितीला व ९३ हजार पाकिस्तानि सैनिकांच्या शरणागतीला ४८ वर्ष पूर्ण झाल्याच्या पर्वावर त्या युद्धात आत्ताच्या बांगलादेश सीमेवर तीन पॉईंटवर नेतृत्व करणाऱ्या कॅ. वखरे यांची प्रगट मुलाखत प्रसिद्ध निवेदिका रेणुका देशकर यांनी घेतली. सिव्हिल लाईन्स येथील चिटनविस सेंटर येथे हा कार्यक्रम सोमवारी पार पडला.११ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१ या युद्धाच्या काळात मी डायरी लिहिली. कुठून डायरी आली आणि त्यावर युद्ध प्रसंगातील घटना लिहून काढाव्या, असे सुचले हे देवच जाणे. मात्र, त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीच डायरी लिहिली नाही. या डायरीमधील नोंदी युद्धप्रसंगातील दस्ताऐवज झाल्याचे कॅ. वखरे यावेळी म्हणाले. सेनेत अनुशासन, चिकाटी आणि देशनिष्ठा अंगी बाणवली जाते. सैनिक युद्धात कधीच मरत नाही. तो विरगतीला प्राप्त होतो. मृत्यूचे भय जपून मुलांना सेनेत जाण्यापासून परावृत्त करू नका. सेनेत युद्धात विरगतीला प्राप्त होणाऱ्यांपेक्षा देशात दररोज रस्ते अपघातात हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. सैनिकाची नोकरी ही मानाची, प्रत्येक कुटूंबाला अभिमान वाटावी अशी आहे. प्रत्येक घरातून एक तरुण सेनेत असला तर त्या कुटूंबात आपल्या सिमा, देश आणि आपले नागरिक, आपला इतिहास याबद्दल समाजात जाणिव होईल. सैनिकाबद्दल मनात सन्मान वाढेल आणि संपूर्ण समाज अनुशाशीत होईल, असे ते म्हणाले. यावेळी प्रसिध्द वक्ते आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी उपस्थित होते. निवेदन प्रफुल्ल माटेगावकर यांनी केले.बरं झालं घोडा नव्हता! - अनुराधा वखरेहे उत्तम घोडेस्वार आहेत. सर्कस मधील सर्व कवायती ते सहज करतात. कुठे फिरायला गेलो आणि घोडा दिसला की लगेच घोड्याची लगाम घ्यायची आणि सुसाट पळायचं, हा त्यांचा नेम. बरं झालं आमच्या लग्नात नवरदेवाला घोडा नव्हता. नाही तर घोड्यावर नवरदेव म्हणून आलेले कॅप्टन स्वत:ला पृथ्वीराज चौहान समजले असते आणि मला संयुक्ता समजून सुसाट पळाले असते, अशी मिस्कीली अनुराधा मधुसूदन वखरे यांनी यावेळी केली. देशभक्ती प्रत्येकाच्या मनात असलीच पाहिजे. आई-वडिलांनी मुलांमध्ये देशप्रेम जागृत केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.अटलजींचे ते आवाहन मानले गेले असते तर! - दयाशंकर तिवारी१९०५ मध्ये आपण गुलामीत असतानाही इंग्रजांना बंगालची फाळणी करू दिली नव्हती. त्यासाठी लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल यांनी आंदोलन उभे केले. १९४७मध्ये भारताचे विभाजन झाल्यानंतर, १९७१च्या युद्धामुळे बंगाल प्रांत पुन्हा भारतात विलिन करून लाल-बाल-पाल यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्याची मागणी तेव्हा संसदेत अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे केली होती. मात्र, तसे केले गेले नाही. अन्यथा बांग्लादेश कधीच अस्तित्त्वात आला नसता, अशी भावना दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :warयुद्धPakistanपाकिस्तान