शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

...आत्मसमर्पण झाले असते तर वाचला असता मिलिंद तेलतुंबडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 11:50 IST

मिलिंदने आत्मसमर्पण करावे, या संबंधाने व्यूहरचना केली होती. त्यानुषंगाने वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत पोलिसांनी मिलिंदला निरोप पाठविले होते. मिलिंदकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्चमध्ये बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये या संबंधाने मध्यस्थाची बैठक अन् चर्चाही झाली होती.

ठळक मुद्देसात महिन्यांपासून सुरू होते प्रयत्न

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशातील नक्षल चळवळीतील शीर्षस्थ नेत्यांपैकी एक मानला जाणारा आणि गेल्या आठवड्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला नक्षलनेता मिलिंद ऊर्फ सह्याद्री ऊर्फ दीपक तेलतुंबडे याने आत्मसमर्पण करावे, यासाठी पोलिसांकडून गेल्या सात महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. मिलिंदने सकारात्मकता दाखविल्यामुळे बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये बैठकही पार पडली होती. मिलिंदने आत्मसमर्पण केले असते तर तो बचावला असता, असे शीर्षस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले असून, त्याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा मिळाला आहे.

१३ नोव्हेंबर २०२१ ला भल्या सकाळी गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी मारले गेले. त्यात मिलिंदचाही समावेश आहे. या चकमकीने आधीच बॅकफूटवर असलेल्या नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. या चकमकीनंतर एकीकडे पोलिसांचे मनोबल वाढले आहे, तर दुसरीकडे नक्षल्यांचे पित्त खवळल्याने त्यांनीही मोठा धमाका करण्याची तयारी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर, नक्षल चळवळीच्या नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकृतपणे हे वृत्त पुढे आले.

यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. वणी) येथील रहिवासी असलेला आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मिलिंद तेलतुंबडे १९९२-९३ पासून नक्षल चळवळीशी जुळला होता. १९९५-९६ ला तो खऱ्या अर्थाने पोलिसांच्या रेकॉर्डवर आला. त्याचे संघटन चळवळीतील काैशल्य बघता त्याला प्रतिबंधित माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिवही बनविण्यात आले होते. देशभरातील अनेक घातपाती कृत्य आणि चकमकीत त्याने महत्त्वाची भूमिका वठविली होती. पोलिसांच्या विरोधातील त्याची घातक आक्रमकता बघता त्याच्यावर पोलिसांनी ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

नक्षल चळवळीत मिलिंदचे वजन वाढले असतानाच फेब्रुवारी-मार्चपासून त्याने त्याच्या काही अंतस्थ गोटातील व्यक्तींकडे आधीसारखी धावपळ होत नसल्याचे सांगितले होते. ते लक्षात घेता चंद्रपुरात काम केलेल्या आणि आता अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने मिलिंदने आत्मसमर्पण करावे, या संबंधाने व्यूहरचना केली होती. त्यानुषंगाने वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत पोलिसांनी मिलिंदला निरोप पाठविले होते.

मिलिंदकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्चमध्ये बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये या संबंधाने मिलिंदसोबत मध्यस्थाची बैठक अन् चर्चाही झाली होती. त्यानंतर भेटीगाठीचा दाैर सुरू असतानाच मिलिंद डावपेच करतो की काय, अशा काही घडामोडी घडल्या होत्या. दरम्यान, मे २०२१ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील खोब्रामेंढा जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर भास्कर इचामीसह ५ नक्षलवादी ठार मारले गेले. या चकमकीने महाराष्ट्रातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले गेल्याने अबूझमाडमध्ये देशभरातील शीर्षस्थ नक्षल नेत्यांनी बैठक बोलाविली. त्यात मिलिंदही सहभागी झाला.

अखेर कंठस्नान

अबूझमाडमधून परतल्यानंतर मिलिंद कमालीचा आक्रमक झाला होता. त्याने नक्षल नेता नंबाला केशव आणि भूपती यांना सोबत घेऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्याची नवीन झोन कमिटी तयार केली. यानंतर मोठा अटॅक करण्याची तयारी मिलिंदने चालविली होती. दिवाळीनंतर मोठा धमाका होण्याचे सांकेतिक संदेश पोलिसांना मिळाले होते. त्याची ही तयारी बघता तो आत्मसमर्पण करणार नाही याची पोलिसांना कल्पना आली होती. त्यामुळे पोलिसांनी मिलिंदवरची नजर करडी केली अन् अखेर १३ नोव्हेंबरला मिलिंदसह २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घालण्यात यश मिळविले.

होय, आम्ही प्रयत्न केले - पोलीस महानिरीक्षक पाटील

या वृत्ताला दुजोरा देताना गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले की, नक्षल्यांनी आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. मिलिंद तेलतुंबडेनेही आत्मसमर्पण करावे यासाठी आम्ही मार्च २०२१ पासून प्रयत्न केले होते. प्रारंभी सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता. मात्र, ते होऊ शकले नाही. अखेर मिलिंद पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस