शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

...आत्मसमर्पण झाले असते तर वाचला असता मिलिंद तेलतुंबडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 11:50 IST

मिलिंदने आत्मसमर्पण करावे, या संबंधाने व्यूहरचना केली होती. त्यानुषंगाने वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत पोलिसांनी मिलिंदला निरोप पाठविले होते. मिलिंदकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्चमध्ये बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये या संबंधाने मध्यस्थाची बैठक अन् चर्चाही झाली होती.

ठळक मुद्देसात महिन्यांपासून सुरू होते प्रयत्न

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशातील नक्षल चळवळीतील शीर्षस्थ नेत्यांपैकी एक मानला जाणारा आणि गेल्या आठवड्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला नक्षलनेता मिलिंद ऊर्फ सह्याद्री ऊर्फ दीपक तेलतुंबडे याने आत्मसमर्पण करावे, यासाठी पोलिसांकडून गेल्या सात महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. मिलिंदने सकारात्मकता दाखविल्यामुळे बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये बैठकही पार पडली होती. मिलिंदने आत्मसमर्पण केले असते तर तो बचावला असता, असे शीर्षस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले असून, त्याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनही दुजोरा मिळाला आहे.

१३ नोव्हेंबर २०२१ ला भल्या सकाळी गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी मारले गेले. त्यात मिलिंदचाही समावेश आहे. या चकमकीने आधीच बॅकफूटवर असलेल्या नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे. या चकमकीनंतर एकीकडे पोलिसांचे मनोबल वाढले आहे, तर दुसरीकडे नक्षल्यांचे पित्त खवळल्याने त्यांनीही मोठा धमाका करण्याची तयारी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर, नक्षल चळवळीच्या नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकृतपणे हे वृत्त पुढे आले.

यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. वणी) येथील रहिवासी असलेला आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मिलिंद तेलतुंबडे १९९२-९३ पासून नक्षल चळवळीशी जुळला होता. १९९५-९६ ला तो खऱ्या अर्थाने पोलिसांच्या रेकॉर्डवर आला. त्याचे संघटन चळवळीतील काैशल्य बघता त्याला प्रतिबंधित माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिवही बनविण्यात आले होते. देशभरातील अनेक घातपाती कृत्य आणि चकमकीत त्याने महत्त्वाची भूमिका वठविली होती. पोलिसांच्या विरोधातील त्याची घातक आक्रमकता बघता त्याच्यावर पोलिसांनी ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

नक्षल चळवळीत मिलिंदचे वजन वाढले असतानाच फेब्रुवारी-मार्चपासून त्याने त्याच्या काही अंतस्थ गोटातील व्यक्तींकडे आधीसारखी धावपळ होत नसल्याचे सांगितले होते. ते लक्षात घेता चंद्रपुरात काम केलेल्या आणि आता अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने मिलिंदने आत्मसमर्पण करावे, या संबंधाने व्यूहरचना केली होती. त्यानुषंगाने वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत पोलिसांनी मिलिंदला निरोप पाठविले होते.

मिलिंदकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने मार्चमध्ये बालाघाटमधील कान्हा नॅशनल पार्कमध्ये या संबंधाने मिलिंदसोबत मध्यस्थाची बैठक अन् चर्चाही झाली होती. त्यानंतर भेटीगाठीचा दाैर सुरू असतानाच मिलिंद डावपेच करतो की काय, अशा काही घडामोडी घडल्या होत्या. दरम्यान, मे २०२१ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील खोब्रामेंढा जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर भास्कर इचामीसह ५ नक्षलवादी ठार मारले गेले. या चकमकीने महाराष्ट्रातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले गेल्याने अबूझमाडमध्ये देशभरातील शीर्षस्थ नक्षल नेत्यांनी बैठक बोलाविली. त्यात मिलिंदही सहभागी झाला.

अखेर कंठस्नान

अबूझमाडमधून परतल्यानंतर मिलिंद कमालीचा आक्रमक झाला होता. त्याने नक्षल नेता नंबाला केशव आणि भूपती यांना सोबत घेऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्याची नवीन झोन कमिटी तयार केली. यानंतर मोठा अटॅक करण्याची तयारी मिलिंदने चालविली होती. दिवाळीनंतर मोठा धमाका होण्याचे सांकेतिक संदेश पोलिसांना मिळाले होते. त्याची ही तयारी बघता तो आत्मसमर्पण करणार नाही याची पोलिसांना कल्पना आली होती. त्यामुळे पोलिसांनी मिलिंदवरची नजर करडी केली अन् अखेर १३ नोव्हेंबरला मिलिंदसह २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घालण्यात यश मिळविले.

होय, आम्ही प्रयत्न केले - पोलीस महानिरीक्षक पाटील

या वृत्ताला दुजोरा देताना गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले की, नक्षल्यांनी आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. मिलिंद तेलतुंबडेनेही आत्मसमर्पण करावे यासाठी आम्ही मार्च २०२१ पासून प्रयत्न केले होते. प्रारंभी सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता. मात्र, ते होऊ शकले नाही. अखेर मिलिंद पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस