शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सरकारच्या दुर्लक्षामुळे मिहान मागे पडला : आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 01:03 IST

नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे, तरीही सरकार खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, अशा शब्दात कॉर्पस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी टीका केली.

ठळक मुद्देबाईक रॅली काढून जनसंपर्क

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी हव्या तशा नोकऱ्या नाहीत. स्वयंरोजगाराच्या योजना कौशल्याविना बिनकामाच्या ठरल्या आहेत. नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे, तरीही सरकार खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, अशा शब्दात कॉर्पस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी टीका केली.गुरुवारी सकाळी ८ वाजता माटे चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करून आशिष देशमुख यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचाशुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते.सुभाष नगर, त्रिमूर्ती नगर, खामला, सोनेगाव, जयप्रकाश नगर, मनीष नगर, नरेंद्र नगर, छत्रपती नगर व लगतचा परिसर या रॅलीने पालथा घातला व जनसंपर्क साधला. रॅलीमध्ये शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, राकेश पन्नासे, डॉ. आयुश्री देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी देशमुख पुढे म्हणाले, नवीन गुंतवणूक नाही त्यामुळे बेरोजगार युवक तसेच व्यवसाय, उद्योग, आय टी कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्यांना विकासाची संधी मिळाली नाही. गरजू महिलांना प्रोत्साहन मिळेल अशा रोजगारासंबंधी योजनांचा अभाव आहे. उद्योगांची या सरकारने वाट लावली आहे. सरकारी तिजोरी रिकामी आहे.नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या फार दूर आहे. पेट्रोल, डिझेलच्या दराने उच्चांक गाठला. त्यामुळे महागाई वाढली आहे. जीएसटी, नोटाबंदी व आर्थिक मंदी ही सरकारने लादलेली समस्या आहे. व्यापारी भरडला जात आहे. लोकांना हातचा रोजगार गमवावा लागत आहे.काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, मागील पाच वर्षात भाजपा सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही. बेरोजगारी, उद्योगधंदे, महागाई यामुळे जनता त्रासली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम