शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

लग्नाची पद्धतच बदलली; ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा धूमधडाका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:07 IST

कोरोनामुळे लग्नसमारंभाची पद्धतच बदली असून हजारो लोकांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या समारंभात आता केवळ ५० जणांची उपस्थिती आवश्यक झाली आहे.

ठळक मुद्देकॅटरर्स, मंगल कार्यालय व लॉन संचालकांचा पुढाकार

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लग्नसमारंभाची पद्धतच बदली असून हजारो लोकांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या समारंभात आता केवळ ५० जणांची उपस्थिती आवश्यक झाली आहे. लग्न समारंभाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची नियमावली केली आहे. त्यामुळे अनेकांनी लग्न पुढे ढकलले असून नागपुरात १०० पेक्षा जास्त कॅटरर्सने ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा धूमधडाका घातला आहे. लग्न पुढे न ढकलता ५० वऱ्हाड्यांच्या पॅकेजचा अनेकांनी अवलंब केला आहे.लग्नसमारंभ, वाढदिवस आणि लहानमोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मंगल कार्यालयाच्या संचालकांनी पॅकेज तयार केले आहेत. ठराविक पॅकेजमध्ये ५० जणांचे मिठाईसह रुचकर जेवण, जागेची उपलब्धता, हॉलचे सॅनिटायझेशन, हॅण्डग्लोव्हजची उपलब्धता, सजावट आदींचा पॅकेजमध्ये समावेश आहे. ५० पेक्षा जास्त लोक लग्न समारंभात आढळले, तर लग्नासाठी परवानगी मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगीसाठी कुणीही पुढे येत नसल्याची माहिती आहे.खंगार कॅटरर्सचे चंद्रकांत खंगार म्हणाले, लग्नसमारंभ आणि वाढदिवस साजरे करण्यासाठी अनेक मंगल कार्यालय आणि लॉन संचालकांशी बोलणी केली आहे. ५० जणांसाठी संपूर्ण सुविधेसह विशेष पॅकेज तयार केले आहे. पॅकेज तयार करून महिना झाला आहे. पण सध्या कुणीही ग्राहक आले नाही. लग्नसमारंभाच्या तारखा आता नाहीत. दिवाळीत साजरे होतील. जगदंबा कॅटरर्सचे बंडू राऊत म्हणाले, मार्च ते मे महिन्याचा लग्नाचा हंगाम कोरडा गेला आहे. थोडक्यात कार्यक्रम साजरे करण्याची लोकांची मानसिकता झाली आहे. तीन महिन्यात केवळ ९ हजाराचे उत्पन्न झाले.

मानसिकता बदलणे गरजेचेनागपुरात लग्नापूर्वी साक्षगंध आणि हळदीचे कार्यक्रम तसेच वाढदिवस असले तरीही किमान २५० ते ३०० जणांची उपस्थिती असते. नातेवाईक आणि मित्रमंडळी ५०० च्या आसपास असतात. त्यामुळे ५० जणांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम कसे साजरे करणार, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतरही प्रशासन २०० ते ३०० जणांच्या उपस्थितीला परवानगी देईल. अशा स्थितीतही नागपूरकरांचे कार्यक्रम होणार नाहीत. कोरोनामुळे कार्यक्रम आयोजनाचे स्वरुप बदलल्याचा सूर नागपूरकरांनी काढला.लग्नासाठी नियमकेवळ ५० जणांच्याच उपस्थितीत होणार लग्न५० पेक्षा अधिक लोक आढळल्यास, लग्नासाठी परवानगी मागणाऱ्यांवर कारवाई होणारलग्न समारंभात सॅनिटायझेशन व फिजिकल डिस्टन्सिंग बंधनकारक

टॅग्स :marriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस