शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

कळमन्यातील व्यापारी संतप्त : मतमोजणीमुळे बाजारात छावणीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 10:36 PM

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये होणार आहे. स्ट्राँग रूमच्या अवतीभोवती कुणीही येऊ नये म्हणून सुरक्षा दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील काही बाजारात मालाचे ट्रक आणण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी, अडतिये, व्यापारी आणि ग्राहकांना त्रास होत असून, व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्दे२१ ते २४ मेपर्यंत बाजारपेठा पूर्णत: बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये होणार आहे. स्ट्राँग रूमच्या अवतीभोवती कुणीही येऊ नये म्हणून सुरक्षा दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील काही बाजारात मालाचे ट्रक आणण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी, अडतिये, व्यापारी आणि ग्राहकांना त्रास होत असून, व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत. नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेल्या या बाजाराऐवजी प्रशासनाने मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये मतमोजणी करावी, अशी मागणी व्यापारी आणि अडतियांनी लोकमतशी बोलताना केली.चार दिवस बाजार बंदमतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणाने बाजार समितीला पत्र पाठवून चार दिवस बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार बाजार समितीने सर्व बाजाराच्या पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून २१ मेच्या दुपारी ४ वाजेपासून २४ मेपर्यंत बाजार बंद ठेवण्याचे पत्र दिले आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, अडतिये आणि ग्राहकांना बाजारात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बाजारात चार दिवसांत मालाची आवक बंद राहील. त्यामुळे कोट्यवधींचा व्यवसाय होणार नाही.भाज्यांची आवक बंद राहणारकळमन्यात सहा मोठ्या बाजारपेठा आहेत. संपूर्ण जिल्ह्यात भाज्यांचा पुरवठा करणारा भाजीबाजार बंद राहिल्यामुळे शहरात भाज्यांचा तुटवडा जाणवणार आहे. तसेच आंब्याच्या सीझनमध्ये बाजारात माल येणार नाही; शिवाय कांदे-बटाटे, लसूण, अद्रक आदींची आवकही होणार नाही. त्यामुळे चार दिवस ग्राहकांना या शेतकी मालापासून वंचित राहावे लागेल. तसेच धान्यबाजारही बंद राहणार असल्यामुळे शेतकरी धान्य आणणार नाही. त्यामुळे दररोज होणाऱ्या मालाचे लिलाव बंद राहतील. तपत्या उन्हामुळे अडतिये आणि व्यापाऱ्यांना बाजारात उपलब्ध फळांचा स्टॉक कमी भावात विकावा लागणार आहे. प्रशासनाच्या निर्णयाचा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसणार आहे.मतमोजणी कळमन्यात करू नयेलोकसभेची मतमोजणी कळमना बाजारात करू नये, याकरिता गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी विविध बाजारपेठांमधील पदाधिकाऱ्यांनी शासनाला पत्र लिहिले होते. मतमोजणी मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये घेण्याची मागणी केली केली होती. पण शासनाने दुर्लक्ष केले. गेल्या मतमोजणीच्या वेळी बाजार दोन दिवस बंद होता, पण यंदा चार दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसणार आहे.आनंद डोंगरे, माजी अध्यक्ष,कळमना फळे बाजार अडतिया असोसिएशन.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpurनागपूर