शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : टीबी वॉर्डचे क्वॉर्टरही धोकादायक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:47 IST

मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाचे गुरुवारी प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राजाबाक्षा व टीबी वॉर्ड परिसरातील निवासी गाळेधारकांमध्ये (क्वॉर्टर) भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब जगतात जीव मुठीत घेऊन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाचे गुरुवारी प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राजाबाक्षा व टीबी वॉर्ड परिसरातील निवासी गाळेधारकांमध्ये (क्वॉर्टर) भीतीचे वातावरण पसरले आहे. हे क्वॉर्टरही ४० वर्षे जुने व अनेक ठिकाणी तडे गेले आहे. मेडिकलचे बांधकाम विभाग केवळ तात्पुरती डागडुजीपलिकडे जात नसल्याने कधीही धोका होण्याची शक्यता येथील रहिवासी वर्तवित आहे.मेडिकलमध्ये सेवा देणाऱ्या चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी राजाबाक्षा परिसरात १२० तर टीबी वॉर्डाच्या परिसरात ९६ क्वॉर्टर आहेत. पूर्वी या क्वॉर्टरच्या देखभालीकडे व स्वच्छतेकडे स्वत: मेडिकल प्रशासन व बांधकाम विभाग लक्ष देऊन असायचे. अधिकारी या परिसराची पाहणी करायचे. परंतु गेल्या १५ वर्षांत या क्वॉर्टरकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे येथील काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. राजाबाक्षा येथे एक मजल्याचे सर्व्हंट क्वॉर्टर आहे. त्याची अवस्था फारशी चांगली नाही. या क्वॉर्टरच्या इमारतीचा कोणता भाग कधी पडेल याच नेम नाही. जुन्या काळातील इमारत असल्याने तग धरून असली तरी बांधकाम विभागाने इमारतीचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी येथील रहिवाशांची आहे. हे क्वॉर्टर तोडून अजनी मेडिकल क्वॉर्टरसारखे या भागातही अपार्टमेंट बांधून कर्मचाऱ्यांना गाळे द्यावेत, अशी नव्याने मागणी होऊ लागली आहे.कोणता भाग कधी पडेल याचा नेम नाहीयेथील लोकांनी सांगितले, क्वॉर्टर फार जुने आहे. यातच उंदीर, घुस यांनी अनेक ठिकाणी पोखरून ठेवले आहे. काही भिंतीना भेगाही गेल्या आहेत. विशेषत: पायरीच्या भिंती या कमजोर झाल्या आहेत. दर पावसाळ्यात क्वॉर्टरचा कोणता ना कोणता भाग पडतो. यामुळे रहिवाशांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. डागडुजीसाठी बांधकाम विभागाला सांगितल्यानंतरच ते कामाला सुरुवात करतात. परंतु त्यापूर्वी त्यांच्याकडून क्वॉर्टरची पाहणी करीत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.कचरा, गटारीचीही समस्याक्वॉर्टर परिसरातील कचऱ्याची उचल नियमित होत नाही. मोडकळीस आलेल्या गटार लाईनमुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कमी व्यासाच्या पाईपलाईनमुळे कधी गटारी तुंबणार आणि त्याची घाण क्वॉर्टरमध्ये शिरणार याचा नेम नाही. विशेषत: पावसाळ्यात ही समस्या वारंवार उद्भवते. क्वॉर्टरमधील सार्वजनिक शौचालय निवासी गाळ्यांपासून दूर आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने दुर्गंधी पसरलेली असते.

टॅग्स :Medicalवैद्यकीयnagpurनागपूरEmployeeकर्मचारी