शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

मेडिकल : ‘टेलिमेडिसीन’मधून सात हजार रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:07 PM

दुर्गम भागातच नव्हे तर खेड्यापाड्यात विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर नाहीत. येथील रुग्ण प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवितात. तेथील उपचारांनी फरक न पडल्यास मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येतात. यात पैशांची सोय न झाल्यास वा सोबतीला कुणी नसल्यास बराच उशीर होतो. त्यामुळे रोग बळावतो. अनेकवेळा हाताबाहेरही जातो. मात्र, टेलिमेडिसीनमुळे ही परिस्थिती सुधारतेय. रुग्णाला त्यांच्या गावाजवळच विशेषज्ञाकडून उपचार होत असल्याने हा प्रकल्प रुग्णांसाठी संजीवनी ठरतोय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या प्रकल्पात गेल्या तीन वर्षात टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सात हजार रुग्णांना उपचाराला घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देदुर्गम व खेड्यापाड्यातील रुग्णांना विशेषज्ञांकडून मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुर्गम भागातच नव्हे तर खेड्यापाड्यात विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर नाहीत. येथील रुग्ण प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवितात. तेथील उपचारांनी फरक न पडल्यास मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येतात. यात पैशांची सोय न झाल्यास वा सोबतीला कुणी नसल्यास बराच उशीर होतो. त्यामुळे रोग बळावतो. अनेकवेळा हाताबाहेरही जातो. मात्र, टेलिमेडिसीनमुळे ही परिस्थिती सुधारतेय. रुग्णाला त्यांच्या गावाजवळच विशेषज्ञाकडून उपचार होत असल्याने हा प्रकल्प रुग्णांसाठी संजीवनी ठरतोय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या प्रकल्पात गेल्या तीन वर्षात टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सात हजार रुग्णांना उपचाराला घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना आरोग्यसेवा देणे म्हणजे, टेलिमेडिसीन. यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रुग्णाशी संवाद साधला जातो. याशिवाय विशेष तंत्रज्ञानामुळे ई स्टेथोस्कोपद्वारे रुग्णाच्या हृदयाचे ठोके आणि फुफ्फुसाचे कार्य ऐकण्याची सोय आहे. रुग्णाचे एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय विशिष्ट सॉफ्टवेअरने पाठवताही येतात. या शिवाय रुग्णाचे ईसीजी, ईको, अँजिओग्राफी थेट पाहण्याची सोय उपलब्ध आहे. यामुळे गडचिरोलीतील दुर्गम भागातील रुग्णांच्या चाचण्यांची माहिती, सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन उपचार केला जात आहे. या प्रकल्पाची सुरुवात २००९ मध्ये मेडिकलमध्ये झाली. सुरुवातीला ही योजना ढेपाळली. मात्र २०१३-१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे, ४९१९ रुग्णांना उपचारविषयक मार्गदर्शन करण्यात आले. २०१४-२०१५ मध्ये टेलिमेडिसीनच्या जागेला घेऊन बराच गोंधळ उडाल्याने हे केंद्र बंद पडल्यासारखेच होते. जुलै २०१६ पर्यंत ही स्थिती होती. परंतु त्यानंतर ‘फॅसिलीटी मॅनेजर’ची जागा भरताच गेल्या गेल्या तीन वर्षांत सात हजार दोन रुग्णांच्या समस्या सोडविण्यात आल्या.११ केंद्रांवरील रुग्णांवर होतो उपचारगडचिरोली जिल्ह्याच्या तीन, गोंदिया, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा ११ केंद्रांवरील रुग्णांवर टेलिमेडिसीनच्या मदतीने उपचार केले जात आहे. या केंद्रावरील डॉक्टरांना रुग्णांच्या उपचाराला घेऊन काही शंका असल्यास त्याचे निदान नागपूर मेडिकलमधील तज्ज्ञ डॉक्टर करतात. यात हृदयरोग, कान-नाक-घसा, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती, कॅन्सर,अस्थिरोग, शस्त्रक्रियांसह उर्वरित विभागांशी संबंधित रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.४८९ कैद्यांना मिळाला उपचारमध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांनाही ‘टेलिमेडिसीन’द्वारे मेडिकल डॉक्टरांची वैद्यकीय सेवा दिली जात होती. यासाठी मध्यवर्ती कारागृह व मेडिकल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडण्यात आले होते. आजारी कैद्याला कारागृहातील इस्पितळामध्ये दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी निदान न झाल्यास तेथील डॉक्टर मेडिकलमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधत. आजारी कैद्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवून उपचाराची दिशा ठरवली जायची. जून २०१८ पासून या कार्याचा प्रारंभ झाला. परंतु सहा महिन्यातच ‘कॉल’ येणे बंद झाले. या कालावधीमध्ये ४८९ कैदी रुग्णांना लाभ मिळाल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनmedicineऔषधंGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय