शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

स्टडी इन इंडिया योजनेमध्ये वैद्यकीय शिक्षणाचाही विचार व्हावा : पालकांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 19:25 IST

भारतातच थांबून शिक्षण घेण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया, स्टे इन इंडिया’ हा प्रकल्प राबविण्याच्या मानसिकतेत आहे. यात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

ठळक मुद्दे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतामधून दरवर्षी लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जातात. मात्र या वर्षी कोरोनाच्या प्रकोपामुळे अनेक विद्यार्थी देशात परतले आहेत. नव्याने प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धास्ती आहे. पालकही चिंतित आहे. त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना भारतातच थांबून शिक्षण घेण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया, स्टे इन इंडिया’ हा प्रकल्प राबविण्याच्या मानसिकतेत आहे. यात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतामधून दरवर्षी ७.५ लाख विद्यार्थी विदेशामध्ये शिक्षणासाठी जातात. यात अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड, कॅनडा या देशांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यंदा कोरोनामुळे अडचण निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्याच्या योजनेवर या मंत्रालयाने काम सुरू केले आहे. यासाठी गेल्या आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठकही झाली. असे झाल्यास विद्यार्थीसंख्येअभावी बंद पडू पहाणाºया अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थी मिळतील, मात्र त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण या संस्थांमधून देणे या प्रक्रियेत महत्त्वाचे राहणार आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाचा विचार करून आरोग्य मंत्रालयानेही यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. नागपुरातील रवींद्र सरनाईक म्हणाले, त्यांची मुलगी चीनमध्ये द्वितीय वर्षाला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी शिकत आहे. असे अनेक विद्यार्थी नागपूरसह विदर्भातून तिकडे शिकत असल्याने या काळात पालकांना काळजी वाटत आहे. विदर्भातील अनेक विद्यार्थी विदेशात शिक्षण घेत आहेत. भारतामधील खासगी महाविद्यालयांमधील अवाढव्य शुल्क, प्रवेशासाठी असलेली जीवघेणी स्पर्धा यामुळे अनेक विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाला जाण्यापासून अडचण होते. तरीही उराशी स्वप्न बाळगून अनेक विद्यार्थी विदेशात वैद्यकीय शिक्षणासठी जातात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर भारतामध्ये सेवा द्यायची असल्यास त्यांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा पास होणे बंधनकारक असते. त्याशिवाय तेथील पदवीला अर्थ उरत नाही. त्यामुळे सरकारने या कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही विचार करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीMedicalवैद्यकीयEducationशिक्षणIndiaभारत