शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

स्टडी इन इंडिया योजनेमध्ये वैद्यकीय शिक्षणाचाही विचार व्हावा : पालकांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 19:25 IST

भारतातच थांबून शिक्षण घेण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया, स्टे इन इंडिया’ हा प्रकल्प राबविण्याच्या मानसिकतेत आहे. यात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

ठळक मुद्दे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतामधून दरवर्षी लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जातात. मात्र या वर्षी कोरोनाच्या प्रकोपामुळे अनेक विद्यार्थी देशात परतले आहेत. नव्याने प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धास्ती आहे. पालकही चिंतित आहे. त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना भारतातच थांबून शिक्षण घेण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया, स्टे इन इंडिया’ हा प्रकल्प राबविण्याच्या मानसिकतेत आहे. यात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतामधून दरवर्षी ७.५ लाख विद्यार्थी विदेशामध्ये शिक्षणासाठी जातात. यात अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड, कॅनडा या देशांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यंदा कोरोनामुळे अडचण निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्याच्या योजनेवर या मंत्रालयाने काम सुरू केले आहे. यासाठी गेल्या आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठकही झाली. असे झाल्यास विद्यार्थीसंख्येअभावी बंद पडू पहाणाºया अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थी मिळतील, मात्र त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण या संस्थांमधून देणे या प्रक्रियेत महत्त्वाचे राहणार आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाचा विचार करून आरोग्य मंत्रालयानेही यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. नागपुरातील रवींद्र सरनाईक म्हणाले, त्यांची मुलगी चीनमध्ये द्वितीय वर्षाला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी शिकत आहे. असे अनेक विद्यार्थी नागपूरसह विदर्भातून तिकडे शिकत असल्याने या काळात पालकांना काळजी वाटत आहे. विदर्भातील अनेक विद्यार्थी विदेशात शिक्षण घेत आहेत. भारतामधील खासगी महाविद्यालयांमधील अवाढव्य शुल्क, प्रवेशासाठी असलेली जीवघेणी स्पर्धा यामुळे अनेक विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाला जाण्यापासून अडचण होते. तरीही उराशी स्वप्न बाळगून अनेक विद्यार्थी विदेशात वैद्यकीय शिक्षणासठी जातात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर भारतामध्ये सेवा द्यायची असल्यास त्यांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा पास होणे बंधनकारक असते. त्याशिवाय तेथील पदवीला अर्थ उरत नाही. त्यामुळे सरकारने या कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही विचार करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीMedicalवैद्यकीयEducationशिक्षणIndiaभारत