शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST

नागपूर : गेल्या पाच महिन्यापासून कच्च्या मालाच्या किमतीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याने हजारो लोकांना रोजगार देणारा विदर्भातील प्लास्टिक ...

नागपूर : गेल्या पाच महिन्यापासून कच्च्या मालाच्या किमतीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याने हजारो लोकांना रोजगार देणारा विदर्भातील प्लास्टिक प्रोसेसिंग उद्योग संकटात आहे. पेट्रोलियम उद्योगातील काही मोठ्या कंपन्यांनी अवाजवी नफा कमविण्याच्या उद्देशाने कच्च्या मालाच्या किमती वाढविल्या आहेत. किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नियामक प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी प्लास्टिक उत्पादकांची आहे.

कच्च्या मालावर लावण्यात आलेले आयात शुल्क कमी करावे तसेच देशातून होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालावी किंवा नियंत्रण आणावे, अशीही मागणी उत्पादकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. हे उपाय केल्यास या क्षेत्रातील देशातील ५० हजाराहून अधिक सूक्ष्म व लघु (एमएसएसई) उद्योग किंवा त्यावर रोजगारासाठी अवलंबून असलेल्या लक्षावधी लोकांची उपजीविका वाचविली जाऊ शकेल. शिवाय चीनसारख्या देशासोबत स्पर्धा केली जाऊ शकेल, असेही उत्पादक संघटनेने पत्रात नमूद केले आहे.

विदर्भ प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव डॉ. प्रशांत अग्रवाल म्हणाले, पाच महिन्यात कच्च्या मालाचे भाव अतोनात वाढल्याने या उद्योगाचा कणा मोडला आहे. नागपूर जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग एक हजारापेक्षा जास्त आहेत. त्यात जवळपास ७०० हून अधिक उद्योग सूक्ष्म असून असंघटित आहेत. तर बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर व उमरेड औद्योगिक वसाहतीत ३५० हून अधिक लघु व मध्यम प्लास्टिक उद्योग आहेत. या उद्योगाला महिन्याला २ हजार टन कच्चा माल लागतो. वार्षिक उलाढाल जवळपास ३०० कोटींची आहे. दिवाळीपूर्वी हे उद्योग पुन्हा सुरू झाले, पण शैक्षणिक संस्था व पर्यटन उद्योग बंद आहे आणि हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने त्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक उत्पादनाला मागणी नाही. कोरोना काळात सॅनिटायझर बॉटल, कॅन, पीपीई किट आदींचे उत्पादन झाले, पण आता त्यांनाही मागणी कमी झाली आहे. कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यास हे उद्योग पुन्हा सुरळीत होतील.

नियामक प्राधिकरण स्थापन व्हावे

कच्च्या मालाच्या किमतीवर नियंत्रणासाठी नियामक प्राधिकरण स्थापन व्हावे. त्यामुळे कंपन्या अतोनात दर वाढविणार नाहीत. महावितरण बंद काळातही उद्योगांकडून अनावश्यक विजेचे बिल वसूल करीत आहे. विजेचे दर कमी केल्यास प्लास्टिक उद्योगाला नवसंजीवनी मिळेल.

नागपूर जिल्ह्यात प्लास्टिक उद्योग व वार्षिक उलाढाल

उद्योगकंपन्याउलाढाल

सूक्ष्म ५३९ ८५ कोटी

लघु २४८ १५५ कोटी

मध्यम १०५ १४५ कोटी