शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सोयाबीन, धान, कापूस व संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 11:24 IST

अतिवृष्टीमुळे विभागातील सोयाबीन, धान, कापूस व संत्रा या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीसंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानींची माहिती घेतली.

ठळक मुद्दे परतीच्या पावसाने तोंडचा घासच हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे विभागातील सोयाबीन, धान, कापूस व संत्रा या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीसंदर्भातील प्रत्यक्ष पाहणी करून केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी सोमवारी नागपूर विभागातील प्रत्यक्ष झालेल्या पिकांच्या नुकसानींची माहिती घेतली.विभागातील आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीसंदर्भात पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे कापूस विकास संचालक आर.पी. सिंग यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, कृषी सहसंचालक रवींद्र्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आदी यावेळी उपस्थित होते.पिकांच्या नुकसानीसंदर्भात विभागातील जिल्हानिहाय झालेल्या पीकहानीसंदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. या नुकसानीसाठी केंद्र्र शासनाकडून शेतकºयांना मदत मिळावी यासाठी केंद्रीय पथक आपला अहवाल सादर करणार आहे.या परतीच्या पावसामुळे संत्र्याचा बहार गळून पडला असून, या फळांच्या गुणवत्तेचीसुद्धा मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कपाशीच्या पिकांच्या पात्या व बोंड्या मोठ्या प्रमाणात गळल्या असून, कपाशींच्या फुलांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाल्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. सोयाबीन शेतातच काढून ठेवल्यामुळे शेंगांना अंकुर फुटले असून, सोयाबीनच्या प्रत्यक्ष नुकसानीसंदर्भात छायाचित्र या पथकाला सादर करण्यात आले.विभागात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे सांगताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, विभागात १०५.०८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जून ते आॅक्टोबर या महिन्यात ८३ दिवस पाऊस पडला असून, विभागात सरासरी १०३.५९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात सात दिवसात ५४.२१ म्हणजे ११०.९५ टक्के तर चंद्रपूर जिल्ह्यात सहा दिवसात ६१.५८ म्हणजेच ११८.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विभागात सरासरी ५३.५२ च्याऐवजी ९०.१२ टक्के एवढा पाऊस पाच दिवसात पडला आहे. प्रारंभी कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी स्वागत करून विभागातील पीक नुकसानीची माहिती दिली.

जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुके प्रभावितनागपूर जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुक्यात, चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुक्यात, वर्धा जिल्ह्यात ८ पैकी ६ तालुक्यात, गडचिरोली जिल्ह्यातील १२ पैकी ६, भंडारा जिल्ह्यातील ७ पैकी ४ तालुक्यात तर गोंदिया जिल्ह्यातील ८ पैकी २ तालुक्यात मोठ्या प्रमाणात सतत परतीचा पाऊस पडला आहे.

सर्वाधिक धान पिकाचे नुकसानविभागात सरासरी ८ लाख १९ हजार ०५९ हेक्टर क्षेत्रात धानाची पेरणी झाली होती. त्यापैकी आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ३३ टक्केपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रामध्ये विभागातील ७० हजार ४४९.१५ हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनमध्ये विभागात ४४ हजार ०२४.८३ हेक्टर क्षेत्रात, कापूस पिकाच्या ६५ हजार १९७.७९ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. त्यासोबतच नागपूर जिल्ह्यातील संत्रा या फळ पिकांतर्गत ७ हजार ३४२.६२ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे.

केंद्रीय पथक दिल्लीला रवानामिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय चमू पीक नुकसानीसंदर्भात पाहणी करण्यासाठी चंद्रपूरसाठी रवाना झाली होती. परंतु दिल्लीला कृषी विभागाला तातडीची बैठक बोलावल्याने पथक रवाना झाले.

टॅग्स :agricultureशेती