शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

मराठवाडा, खानदेशाच्या तुलनेत विदर्भात मृत्यू कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:53 IST

पुणे, मुंबई विभागाच्या तुलनेतच नाहीतर मराठवाडा व खानदेशाच्या तुलनेत विदर्भातील मृत्यूसंख्या कमी आहे.

ठळक मुद्देअमरावती विभागात ३६८ मृत्यूनागपूर विभागात ६७५ हजार मृत्यूचा आकडा गाठायला लागले १६२ दिवस

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात ऑगस्ट महिन्यात वाढलेल्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली आहे. यात गुरुवारी मृत्यूची संख्या हजारावर गेली. परंतु पुणे, मुंबई विभागाच्या तुलनेतच नाहीतर मराठवाडा व खानदेशाच्या तुलनेत विदर्भातील मृत्यूसंख्या कमी आहे. २० ऑगस्टपर्यंत खानदेशात १८५५, मराठवाड्यात १३२० तर विदर्भात १०४३ मृतांची नोंद झाली. विदर्भात मृतांची ही संख्या गाठायला १६२ दिवस लागले.विदर्भात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारावर रुग्णांची भर तर ३० ते ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून येत आहे. या जिल्ह्यात ७०० ते १००० दरम्यान रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे, तर २५ ते ४० दरम्यान रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गुरुवारी या जिल्ह्याची रुग्णसंख्या १७,७२२ तर मृतांची संख्या ६२५वर गेली. याच्या निम्मेही रुग्ण किंवा मृत्यूची नोंद विदर्भाच्या इतर जिल्ह्यात झालेली नाही. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण अमरावती जिल्ह्यात आहेत. येथील रुग्णांची संख्या ४,१६१ आहे. असे असले तरी नागपूरनंतर सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात झाले आहेत. या जिल्ह्यात १४१ मृत्यूची नोंद आहे. अमरावती जिल्ह्यात मृतांची संख्या १०० आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ५०च्या आत मृतांची संख्या आहे. सर्वात कमी मृत्यूची नोंद गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे आतापर्यंत एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.- सर्वाधिक मृत्यू मुंबई विभागातआरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागाअंतर्गत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर येथे गुरुवारपर्यंत एकूण १२,०९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर विभागाच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू याच विभागात आहेत. पुणे विभागातील कोल्हापुर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात ५,१४१ मृत्यूची नोंद झाली. नाशिक विभाग म्हणजे, खानदेशातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात १८५५ रुग्णांचे मृत्यू झाले. औरंगाबाद विभाग म्हणजे, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात १३२० तर विदर्भातील नागपूर विभागात ६७५ व अमरावती विभागात ३६८असे एकूण १०४३ मृत्यू झाले आहेत.-विदर्भात अशी वाढली मृत्यूसंख्याविदर्भात पहिल्या मृत्यूची नोंंद मार्च महिन्यात बुुलडाणा जिल्ह्यात झाली. त्यानंतर मृतांची संख्या वाढतच गेली. एप्रिल महिन्यात १२, मे महिन्यात ९१, जुलै महिन्यात २२९ तर २० ऑगस्टपर्यंत ६५६ रुग्णांचे मृत्यू झाले. एकूणच विदर्भात रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.९२ टक्के आहे. यात साधारण ६० टक्के पुरुष तर ४० टक्के महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्य ५० ते ९० या वयोगटात झाले आहेत. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस