शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

मराठवाडा, खानदेशाच्या तुलनेत विदर्भात मृत्यू कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:53 IST

पुणे, मुंबई विभागाच्या तुलनेतच नाहीतर मराठवाडा व खानदेशाच्या तुलनेत विदर्भातील मृत्यूसंख्या कमी आहे.

ठळक मुद्देअमरावती विभागात ३६८ मृत्यूनागपूर विभागात ६७५ हजार मृत्यूचा आकडा गाठायला लागले १६२ दिवस

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात ऑगस्ट महिन्यात वाढलेल्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली आहे. यात गुरुवारी मृत्यूची संख्या हजारावर गेली. परंतु पुणे, मुंबई विभागाच्या तुलनेतच नाहीतर मराठवाडा व खानदेशाच्या तुलनेत विदर्भातील मृत्यूसंख्या कमी आहे. २० ऑगस्टपर्यंत खानदेशात १८५५, मराठवाड्यात १३२० तर विदर्भात १०४३ मृतांची नोंद झाली. विदर्भात मृतांची ही संख्या गाठायला १६२ दिवस लागले.विदर्भात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारावर रुग्णांची भर तर ३० ते ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून येत आहे. या जिल्ह्यात ७०० ते १००० दरम्यान रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे, तर २५ ते ४० दरम्यान रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गुरुवारी या जिल्ह्याची रुग्णसंख्या १७,७२२ तर मृतांची संख्या ६२५वर गेली. याच्या निम्मेही रुग्ण किंवा मृत्यूची नोंद विदर्भाच्या इतर जिल्ह्यात झालेली नाही. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण अमरावती जिल्ह्यात आहेत. येथील रुग्णांची संख्या ४,१६१ आहे. असे असले तरी नागपूरनंतर सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात झाले आहेत. या जिल्ह्यात १४१ मृत्यूची नोंद आहे. अमरावती जिल्ह्यात मृतांची संख्या १०० आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ५०च्या आत मृतांची संख्या आहे. सर्वात कमी मृत्यूची नोंद गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे आतापर्यंत एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.- सर्वाधिक मृत्यू मुंबई विभागातआरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागाअंतर्गत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर येथे गुरुवारपर्यंत एकूण १२,०९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर विभागाच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू याच विभागात आहेत. पुणे विभागातील कोल्हापुर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात ५,१४१ मृत्यूची नोंद झाली. नाशिक विभाग म्हणजे, खानदेशातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात १८५५ रुग्णांचे मृत्यू झाले. औरंगाबाद विभाग म्हणजे, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात १३२० तर विदर्भातील नागपूर विभागात ६७५ व अमरावती विभागात ३६८असे एकूण १०४३ मृत्यू झाले आहेत.-विदर्भात अशी वाढली मृत्यूसंख्याविदर्भात पहिल्या मृत्यूची नोंंद मार्च महिन्यात बुुलडाणा जिल्ह्यात झाली. त्यानंतर मृतांची संख्या वाढतच गेली. एप्रिल महिन्यात १२, मे महिन्यात ९१, जुलै महिन्यात २२९ तर २० ऑगस्टपर्यंत ६५६ रुग्णांचे मृत्यू झाले. एकूणच विदर्भात रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.९२ टक्के आहे. यात साधारण ६० टक्के पुरुष तर ४० टक्के महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्य ५० ते ९० या वयोगटात झाले आहेत. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस