शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, खानदेशाच्या तुलनेत विदर्भात मृत्यू कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:53 IST

पुणे, मुंबई विभागाच्या तुलनेतच नाहीतर मराठवाडा व खानदेशाच्या तुलनेत विदर्भातील मृत्यूसंख्या कमी आहे.

ठळक मुद्देअमरावती विभागात ३६८ मृत्यूनागपूर विभागात ६७५ हजार मृत्यूचा आकडा गाठायला लागले १६२ दिवस

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात ऑगस्ट महिन्यात वाढलेल्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली आहे. यात गुरुवारी मृत्यूची संख्या हजारावर गेली. परंतु पुणे, मुंबई विभागाच्या तुलनेतच नाहीतर मराठवाडा व खानदेशाच्या तुलनेत विदर्भातील मृत्यूसंख्या कमी आहे. २० ऑगस्टपर्यंत खानदेशात १८५५, मराठवाड्यात १३२० तर विदर्भात १०४३ मृतांची नोंद झाली. विदर्भात मृतांची ही संख्या गाठायला १६२ दिवस लागले.विदर्भात गेल्या काही दिवसांपासून रोज हजारावर रुग्णांची भर तर ३० ते ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून येत आहे. या जिल्ह्यात ७०० ते १००० दरम्यान रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे, तर २५ ते ४० दरम्यान रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गुरुवारी या जिल्ह्याची रुग्णसंख्या १७,७२२ तर मृतांची संख्या ६२५वर गेली. याच्या निम्मेही रुग्ण किंवा मृत्यूची नोंद विदर्भाच्या इतर जिल्ह्यात झालेली नाही. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण अमरावती जिल्ह्यात आहेत. येथील रुग्णांची संख्या ४,१६१ आहे. असे असले तरी नागपूरनंतर सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात झाले आहेत. या जिल्ह्यात १४१ मृत्यूची नोंद आहे. अमरावती जिल्ह्यात मृतांची संख्या १०० आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ५०च्या आत मृतांची संख्या आहे. सर्वात कमी मृत्यूची नोंद गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे आतापर्यंत एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.- सर्वाधिक मृत्यू मुंबई विभागातआरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागाअंतर्गत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर येथे गुरुवारपर्यंत एकूण १२,०९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर विभागाच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू याच विभागात आहेत. पुणे विभागातील कोल्हापुर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात ५,१४१ मृत्यूची नोंद झाली. नाशिक विभाग म्हणजे, खानदेशातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात १८५५ रुग्णांचे मृत्यू झाले. औरंगाबाद विभाग म्हणजे, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात १३२० तर विदर्भातील नागपूर विभागात ६७५ व अमरावती विभागात ३६८असे एकूण १०४३ मृत्यू झाले आहेत.-विदर्भात अशी वाढली मृत्यूसंख्याविदर्भात पहिल्या मृत्यूची नोंंद मार्च महिन्यात बुुलडाणा जिल्ह्यात झाली. त्यानंतर मृतांची संख्या वाढतच गेली. एप्रिल महिन्यात १२, मे महिन्यात ९१, जुलै महिन्यात २२९ तर २० ऑगस्टपर्यंत ६५६ रुग्णांचे मृत्यू झाले. एकूणच विदर्भात रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.९२ टक्के आहे. यात साधारण ६० टक्के पुरुष तर ४० टक्के महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्य ५० ते ९० या वयोगटात झाले आहेत. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस