शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

कर्नाटक सरकारने लोकशाहीचे पालन करावे; उपमुख्यमंत्र्यांचे विधानपरिषदेत खडेबोल

By योगेश पांडे | Updated: December 19, 2022 14:52 IST

Maharashtra Winter Session 2022 : कर्नाटकात मराठीभाषिकांना आंदोलनाचा अधिकार, त्यांचे हे दडपशाहीचे धोरण निषेधार्ह

ठळक मुद्देकर्नाटक सरकारच्या धोरणांचा निषेध

नागपूर : बेळगावात महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशाला मज्जाव करणे व मराठीभाषिकांनी केलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रकार झाल्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. या मुद्द्यावर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारबाबत परखड वक्तव्य केले. कर्नाटकात मराठी भाषिकांना संविधानानुसार आंदोलनाचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचे हे दडपशाहीचे धोरण निषेधार्ह असून तसे त्यांना कळविण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारने लोकशाहीच्या तत्वांचे पालन करावे, असे फडणवीस यांनी म्हटले.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली. सीमाप्रश्नावर गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यातील नेत्यांची बैठक झाली. ६० वर्षांचा हा प्रश्न एका बैठकीत संपणारा नाही. मात्र लोकशाहीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे २० वर्षांपासून आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र कर्नाटक सरकारने एकदाही परवानगी दिली नाही. आंदोलन केले तर तुरुंगात टाकणे, लाठीमार करणे असे प्रकार करण्यात येतात. कर्नाटक सरकारने आतादेखील आंदोलकांना बळजबरीने अटक केली असून त्यांना सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून लगेच पावले उचलण्यात येतील. याबाबत राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय ठोस भूमिका घेण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.

शांतीपूर्वक आंदोलनाला निर्बंध घालण्याची गरज नव्हती - देवेंद्र फडणवीस

सीमाभागातील गावांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम

राज्याच्या सीमाभागातील गावांच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. सरकार त्यांच्यासोबत आहे हे त्यांना पटवून देणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी राज्य शासन विशेष विकास कार्यक्रम राबविणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येईल, असेदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ती भारत-पाकिस्तान सीमा आहे का ?

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रातील नेत्यांना मिळणारी वागणूक पाहून आपण पाकिस्तानात आहोत की काय व ती भारत-पाकिस्तान सीमा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कर्नाटक सरकारने नेहमी दुटप्पी भूमिका घेतली व महाराष्ट्रानेदेखील त्यांना ‘ईट का जवाब पत्थर से’ असेच उत्तर दिले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी शशिकांत शिंदे,, अभिजीत वंजारी यांनीदेखील कर्नाटक सरकारवर प्रश्न उपस्थित केले. तर कर्नाटक सरकारने न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. ही बाब तपासून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावMaharashtraमहाराष्ट्र