शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सरकारने लोकशाहीचे पालन करावे; उपमुख्यमंत्र्यांचे विधानपरिषदेत खडेबोल

By योगेश पांडे | Updated: December 19, 2022 14:52 IST

Maharashtra Winter Session 2022 : कर्नाटकात मराठीभाषिकांना आंदोलनाचा अधिकार, त्यांचे हे दडपशाहीचे धोरण निषेधार्ह

ठळक मुद्देकर्नाटक सरकारच्या धोरणांचा निषेध

नागपूर : बेळगावात महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशाला मज्जाव करणे व मराठीभाषिकांनी केलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रकार झाल्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. या मुद्द्यावर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारबाबत परखड वक्तव्य केले. कर्नाटकात मराठी भाषिकांना संविधानानुसार आंदोलनाचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचे हे दडपशाहीचे धोरण निषेधार्ह असून तसे त्यांना कळविण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारने लोकशाहीच्या तत्वांचे पालन करावे, असे फडणवीस यांनी म्हटले.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली. सीमाप्रश्नावर गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यातील नेत्यांची बैठक झाली. ६० वर्षांचा हा प्रश्न एका बैठकीत संपणारा नाही. मात्र लोकशाहीने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे २० वर्षांपासून आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र कर्नाटक सरकारने एकदाही परवानगी दिली नाही. आंदोलन केले तर तुरुंगात टाकणे, लाठीमार करणे असे प्रकार करण्यात येतात. कर्नाटक सरकारने आतादेखील आंदोलकांना बळजबरीने अटक केली असून त्यांना सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून लगेच पावले उचलण्यात येतील. याबाबत राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय ठोस भूमिका घेण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.

शांतीपूर्वक आंदोलनाला निर्बंध घालण्याची गरज नव्हती - देवेंद्र फडणवीस

सीमाभागातील गावांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम

राज्याच्या सीमाभागातील गावांच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. सरकार त्यांच्यासोबत आहे हे त्यांना पटवून देणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी राज्य शासन विशेष विकास कार्यक्रम राबविणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येईल, असेदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ती भारत-पाकिस्तान सीमा आहे का ?

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रातील नेत्यांना मिळणारी वागणूक पाहून आपण पाकिस्तानात आहोत की काय व ती भारत-पाकिस्तान सीमा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कर्नाटक सरकारने नेहमी दुटप्पी भूमिका घेतली व महाराष्ट्रानेदेखील त्यांना ‘ईट का जवाब पत्थर से’ असेच उत्तर दिले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी शशिकांत शिंदे,, अभिजीत वंजारी यांनीदेखील कर्नाटक सरकारवर प्रश्न उपस्थित केले. तर कर्नाटक सरकारने न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. ही बाब तपासून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावMaharashtraमहाराष्ट्र