शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मराठी साहित्य संमेलन : ९४ वे संमेलनाध्यक्ष कोण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 23:44 IST

Marathi Sahitya Sammelan, nagpur news नाशिकला होणारे ९४वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनही याला अपवाद नाही. आता वेध लागले आहेत, ते ९४वे संमेलनाध्यक्ष कोण होणार त्याचे. मात्र, कोण होऊ नये यावरच भर महामंडळ आणि महामंडळाच्या कारभारावर आक्षेप घेणाऱ्यांचा दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहामंडळाकडे आज पोहोचतील घटकसंस्थांकडून नावे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राजकारण, नाटक आणि साहित्य हे विषय मराठी माणसाच्या जीवनवृत्तीचे महत्त्वाचे भाग आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आणि काडीचाही संबंध नसणाऱ्यांनाही, हे विषय चघळण्याची भारी हौस. साहित्य संमेलनाबाबत तर दरसाल चर्चांच्या फैरी, उकरून काढलेले वादंग आणि विरोध ठरलेलेच आहेत. हजेरी लावणार नाही पण येनकेनप्रकारेण शाब्दिक दंगा जरूर घडवू, अशी ही स्थिती असते. नाशिकला होणारे ९४वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनही याला अपवाद नाही. आता वेध लागले आहेत, ते ९४वे संमेलनाध्यक्ष कोण होणार त्याचे. मात्र, कोण होऊ नये यावरच भर महामंडळ आणि महामंडळाच्या कारभारावर आक्षेप घेणाऱ्यांचा दिसून येत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाबाबतचा स्थळ निवडीचे भला मोठ्ठे वादंग अवघ्या सात दिवसात शमले. महामंडळाने आपल्या इच्छेनुसार नाशिकला संमेलन देऊन दिल्लीचा पुकारा करणाऱ्यांना शह दिला. आता संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. मंगळवारी महामंडळांच्या घटकसंस्थांकडून नियोजित अध्यक्षांची नावे पोहोचवली जातील. त्या नावांपैकी एकावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महामंडळाच्या १९ सदस्यांची बैठक जमेल आणि एकमताने अगर मतदानातून बहुमताचा गजर करत अध्यक्षांची घोषणा २४ जानेवारीला महामंडळ अध्यक्ष करतील. मात्र, नागपुरात महामंडळाचे कार्यालय असताना सरल निवड प्रक्रियेचा विषय म्हणून घटनादुरुस्तीने निवडणूक रद्द करून केवळ निवड प्रक्रियाच राबवण्याचा निर्णय झाला आणि मनमर्जीचे आरोप सुरू झाले. ९३वे संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून असाच वादंग रंगले होते, हे याच निवड प्रक्रियेचे द्योतक आहे. यंदाही तसाच प्रयत्न होत असल्याचा आरोप महामंडळातील घटकसंस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांडून होत आहे आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत जे प्रतिभावान महामंडळाच्या नजरेत आले नाही, त्यांची नावे सोशल माध्यमांद्वारे सर्वत्र प्रसारित केली जात आहेत. एक प्रकारे महामंडळाच्या हेकेखोरपणाला लगाम लावण्यासाठीचाच हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे. त्याच अनुषंगाने सर्वत्र फोनाफानीला सुरुवात झाली आहे.

घुमानचा वचपा काढला!

२०१५ मध्ये पंजाबातील घुमानमध्ये ८८वे साहित्य संमेलन पार पडले. आयोजक सरहद संस्था होती. त्यावेळी झालेल्या अपमानाचा वचपा यंदा सरहदला दिल्लीमध्ये संमेलन नाकारून विद्यमान महामंडळ अध्यक्षांनी घेतला असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्याच संमेलनाच्या अध्यक्ष निवडीवरूनही पराभवरूपी झालेल्या मानहानीची सल भरून काढण्यास महामंडळ अध्यक्ष सज्ज असल्याचेही बोलले जात आहे.

सोशल मीडियावर फिरताहेत ही नावे

संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी योग्य नावे म्हणून भारत सासणे, भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, रंगनाथ पठारे, आशा बगे, यशवंत मनोहर, ना.धों. महानाेर, विठ्ठल वाघ, सुरेश द्वादशीवार, रावसाहेब कसबे, श्रीपाद जोशी, विवेक घळसासी आदी २८ साहित्यिकांची नावे सोशल मीडियावर फिरवली जात आहेत.

संमेलनाध्यक्षांची निवड ही घटनेनुसारच होईल. घटकसंस्थांकडून येणाऱ्या नावांवर समग्र चर्चेतूनच बैठकीत नावाची घोषणा २४ जानेवारीला केली जाईल. उगीच कुणाचेही नाव पुढे करून कुणालाही अपमानित अथवा कुणाचा गवगवा करण्याची गरज नाही.

-कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष - अ.भा. मराठी साहित्य महामंडळ

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन