शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मराठीला निस्सीम आपलेपणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:08 PM

मराठी भाषेला आज समाजाच्या निस्सीम आपलेपणाची गरज आहे, असे मत साहित्यिक व संतसाहित्याचे अभ्यासक विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविवेक घळसासी यांचे प्रतिपादनवि.भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते मराठी व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी संस्कृतीला टिकवण्याचे कार्य मध्ययुगीन काळात मराठी संतांनी केले. मराठी भाषेला टिकवून ठेवणे म्हणजे मराठी संस्कृतीला टिकवून ठेवणे होय. ही मराठी संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर मराठी संबंधीचा, पर्यायाने मराठी संस्कृतीसंबंधीचा आग्रह आपण जपला पाहिजे. आणि या आग्रहामागे मराठीसंबंधीची आंतरिक निष्ठा असली पाहिजे. मराठी भाषेला आज समाजाच्या निस्सीम आपलेपणाची गरज आहे, असे मत साहित्यिक व संतसाहित्याचे अभ्यासक विवेक घळसासी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे डॉ.वि.भि.उपाख्य भाऊसाहेब कोलते मराठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘मराठी भाषेचे संवर्धन : दिशा आणि परिणाम’ या विषयावर त्यांनी पुष्प गुंफले.मराठी विभागात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे हे होते. आजच्या कालखंडात मराठी भाषेच्या अस्तित्वासंबंधी विविध प्रकारचे प्रश्न समाजामध्ये पहावयास मिळतात. मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर उत्सवी प्रकारचे कार्यक्रम व वरपांगी स्वरूपाचे दिखावटी सोहळे पुरेसे नाहीत. त्याऐवजी अगदी घरगुती पातळीवर मराठीपणा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी भाषा ही केवळ भाषिक आविष्कारामधून आविष्कृत होत नाही तर ती मराठीपणा कायम ठेवणाऱ्या सण-उत्सवांमधून, सांस्कृतिक चालीरीतींमधून, परंपरेने चालत आलेल्या रूढीसंकेतांमधून देखील अभिव्यक्त होत असते. त्यामुळे आहारविहार, पोशाख-परंपरा, पारंपरिक विधी, सण-उत्सव, नृत्य-संगीत, गीतपरंपरा, संतवचने इत्यादी घटकांमधून मराठी संस्कृती आज टिकवून ठेवण्याची गरज आहे, असेदेखील घळसासी म्हणाले.डॉ.शैलेंद्र लेंडे यांनी मराठीचा इतिहास व संवर्धनासाठी झालेले आजवरचे प्रयत्न यावर भाष्य केले. डॉ.प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.अमृता इंदूरकर यांनी संचालन केले तर डॉ.प्रज्ञा निनावे यांनी आभार मानले.

टॅग्स :marathiमराठी