शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोच, ओबीसी मुक्ती मोर्चाची हायकोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 11:29 IST

समिती स्थापनेचा वादग्रस्त निर्णय रद्द करण्याची मागणी

नागपूर : ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून मराठा समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश करण्याचे राज्य सरकारचे मनसुबे घटनाबाह्य असल्याचा दावा केला आहे. तसेच, यासंदर्भात समिती स्थापन करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

मराठा समाजाला स्वत:ची ओळख कायम ठेवून आरक्षण हवे आहे. त्याकरिता ते गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली होती; पण ते आरक्षण न्यायालयीन परीक्षणात टिकले नाही. विविध न्यायालयीन निर्णयांमध्ये मराठा समाज कुणबी (ओबीसी) नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना सरकार मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता देण्याचे प्रयत्न करीत आहे. मराठा समाज हा कुणबी असल्याचे सिद्ध करणारे दस्तावेज, करार व इतर ऐतिहासिक पुरावे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय ७ सप्टेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आला आहे. हा निर्णय अवैध आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

कुणबी जात सिद्ध करण्यात अपयश

राज्य सरकारने १ जून २००४ रोजी निर्णय जारी करून इतर मागासवर्गाच्या यादीमध्ये कुणबी जातीच्या उपजाती म्हणून मराठा कुणबी व कुणबी मराठाचा समावेश केला आहे; परंतु, मराठा समाजाचे नागरिक ही जात सिद्ध करण्यात अपयशी ठरत आहेत. जात प्रमाणपत्र कायद्यातील कलम आठ अनुसार संबंधित व्यक्तीने स्वत:ची जात स्वत: सिद्ध करणे आवश्यक आहे, याकडेही याचिकाकर्त्याने लक्ष वेधले आहे.

याचिकेत या तिघांना केले प्रतिवादी

याचिकेमध्ये सामान्य प्रशासन, इतर मागास बहुजन कल्याण व सामाजिक न्याय या तीन विभागाच्या मुख्य सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. भूपेश पाटील कामकाज पाहतील.

टॅग्स :Courtन्यायालयmarathaमराठाkunbiकुणबीHigh Courtउच्च न्यायालयOBCअन्य मागासवर्गीय जाती