शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील नोकऱ्या जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:49 IST

राणे समितीने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणामुळे, ४०० ब्राह्मण वर्गातील नोकऱ्या जाणार असल्याची भीती समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्दे स्वतंत्र ब्राह्मण विकास महामंडळ नेमण्याची करणार मागणीनागपुरातून ३ आॅगस्टला ‘शंखनाद’

लोकमज न्यूज नेटवर्कनागपूर : राणे समितीने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणामुळे, जुलै २०१४ मध्ये राज्यात विविध सरकारी पदांवर नियुक्ती झालेल्या नोकरदार वर्गावर बेरोजगारीची टांगती तलवार उपसली गेली आहे. जवळपास १५०० नोकरदरांच्या नोकऱ्या जाणार असून, त्यात ४०० ब्राह्मण वर्गातील नोकऱ्या जाणार असल्याची भीती समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.जुलै २०१४ मध्ये सरळ सेवा भरतीअंतर्गत खुल्या गटात नोकरीभरती करण्यात आली होती. मात्र, राणे समितीच्या अहवालानंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ही नोकर भरती रद्द होणार असून, त्याअनुषंगाने येत्या १५ दिवसात दीड हजारावर नोकरदार नोकरीमुक्त होणार असल्याची शंका देशपांडे यांनी व्यक्त केली. त्या अनुषंगाने ब्राह्मणांच्या सामाजिक व आर्थिक समस्या सुधारण्याच्या ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करण्याच्या मागणीसाठी ३ ऑगस्ट रोजी नागपुरातून ‘घंटानाद आंदोलना’चा शंखनाद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांच्या व्यतिरिक्त काहीही दिले नाही. म्हणूनच, मुख्यमंत्र्यांच्या शहरातूनच आंदोलनाचा बिगुल फुंकण्यात येणार असून, मुख्यमंत्र्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आंदोलनात शहरातील ४८ संघटना सहभागी होणार असून, यात वेदाध्ययन करणारे १०० गुरूजी एकसाथ शंखनाद करणार असल्याचे विश्वजित देशपांडे यावेळी म्हणाले. या आंदोलनात साधारणत: राज्यभरातून दहा हजारावर ब्राह्मण समाजातील नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.

अन्य मागण्याछत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील भव्य स्मारक तातडीने पूर्ण करावे.पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या श्रीवर्धन येथील जन्मस्थळाचा जीर्णोद्धार व्हावालंडन येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवासस्थान सरकारने विकत घेऊन स्मारक करावेशनिवारवाडा येथे पेशवे सृष्टी निर्माण करण्यात यावीकेजी ते पीजी शिक्षण मोफत व्हावेग्रामीण भागातील समाजबांधवांना संरक्षण द्याब्राह्मण महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करावाविद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावेमाहिती तंत्रज्ञान कायदा अधिक कडक व्हावा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण