शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार : सुभाष देसाई यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:51 IST

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाची बाजू मांडण्यासाठी यापूर्वी नेमलेले ज्येष्ठ विधिज्ञ हे यापुढेही सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडतील. त्यांच्या नियुक्तीत राज्य शासनाने कोणताही बदल केलेला नाही, असे निवेदन गुरुवारी विधान परिषदेत सभागृह नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

ठळक मुद्देविधान परिषदेत निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा आरक्षणासंदर्भातसर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलल्याच्या काही बातम्या समाजमाध्यमांमध्ये तसेच काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्या तथ्यहीन व दिशाभूल करणाऱ्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाची बाजू मांडण्यासाठी यापूर्वी नेमलेले ज्येष्ठ विधिज्ञ हे यापुढेही सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडतील. त्यांच्या नियुक्तीत राज्य शासनाने कोणताही बदल केलेला नाही, असे निवेदन गुरुवारी विधान परिषदेत सभागृह नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.राज्य शासनाने सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२ द्वारे राज्यातील सामाजिक व आर्थिक मागास समाज प्रवर्गास आरक्षण दिले आहे. यात मराठा समाजाचा समावेश आहे. या आरक्षणास जयश्री पाटील व इतर याचिकाकर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत राज्य शासनाने दिलेले आरक्षण कायम ठेवले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जयश्री पाटील व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्या प्रलंबित आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. या विशेष अनुमती याचिकांमध्ये, मराठा समाजास पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आरक्षणासंदर्भात एक अंतरिम अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची प्राथमिक सुनावणी १८ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात झाली व पुढील सुनावणी जानेवारी २०२० मध्ये होणार आहे.मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळेस राज्य शासनातर्फे अ‍ॅड. मुकु ल रोहतगी, अ‍ॅड. परमजितसिंग पटवालिया, अ‍ॅड. विजयसिंग थोरात, अ‍ॅड. अनिल साखरे या ज्येष्ठ विधिज्ञांनी राज्य शासनाची बाजू समर्थपणे मांडली. या कामात त्यांना अ‍ॅड. निशांत काटनेश्वरकर, अ‍ॅड. वैभव सुकदेवे, अ‍ॅड. अक्षय शिंदे, अ‍ॅड. प्राची ताटके व इतर वकिलांनी सहाय्य केले होते. सर्वोच्च न्यायालयात वरील नमूद ज्येष्ठ विधिज्ञांव्यतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. तुषार मेहता, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. आत्माराम नाडकर्णी हे राज्य शासनाची बाजू संबंधित प्रकरणात भक्कमपणे मांडत आहेत. यापुढेही सर्व ज्येष्ठ विधिज्ञ सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची बाजू मांडतील. त्यांच्या नियुक्तीत राज्य शासनानेकोणताही बदल केला नसल्याचे सुभाष देसाई यांनी निवेदनात स्पष्ट केले.याव्यतिरिक्त प्रत्येक सुनावणीच्या वेळी महाधिवक्ता आशुतोष कुंंभकोणी हे राज्य शासनातर्फे सर्वोंच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. आवश्यकता भासल्यास अन्य वरिष्ठ विधिज्ञांची नियुक्ती केली जाईल, अशी ग्वाही देसाई यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSubhash Desaiसुभाष देसाई