शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

Corona Virus in Nagpur; उपराजधानीत अनेक बेघर व मनोरुग्ण प्रतिक्षेत; निवारे पडताहेत अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 10:33 IST

नागपूर महानगरपालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने बेघरांसाठी आणि भिकारी व मनोरुग्णांसाठी तात्पुरते निवारे उभारले असले तरी अनेक बेघर आणि मनोरुग्ण आजही रस्त्यावरच असल्याचे चित्र शहरात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने बेघरांसाठी आणि भिकारी व मनोरुग्णांसाठी तात्पुरते निवारे उभारले असले तरी अनेक बेघर आणि मनोरुग्ण आजही रस्त्यावरच असल्याचे चित्र शहरात आहे. अनेकांपर्यंत या निवाऱ्यांची माहिती पोहचत नसल्याने आणि आपल्या गावाकडे जाण्याच्या प्रयत्नात असल्याने अनेकजण रस्त्यावरच वाहनांची प्रतीक्षा करत असल्याची माहिती आहे.नागपूर महानगरपालिकेने नागरी उपजीविका अभियान आणि दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून आजघडीला १५ बेघर निवारा केंदे्र उभारली आहेत. त्यांची क्षमता १ हजार २६२ अशी आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून परप्रांतीय कामगार, बेघरांना येथे पाठविले जात असले तरी अनेक बेघर आणि परप्रांतीय कामगार रस्त्यावरच आहेत. मंदिरांसमोर मनोरुग्ण आणि भिकाऱ्यांची गर्दी असते. रात्रीही ते त्याच परिसरात मुक्कामाला असतात. बहुतेक भिकारी आता अशा ठिकाणाहून हटले असले तरी वर्धा रोडवरील साईबाबा मंदिरासमोर मनोरुग्ण आणि भिकारी असे मिळून सात व्यक्ती आजही तिथेच वास्तव्याला आहेत. समाजसेवी संस्थांचे कार्यकर्ते त्यांना अन्न देत आहेत.अशीच स्थिती अन्य मंदिरांसमोरही कमी अधिक प्रमाणात आहे. मंदिरे बंद झाली असली तरी परिसरातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्था अन्न पुरवत असल्याने त्यांची गरज सध्यातरी भागत आहे.परप्रांतीय कामगार आपल्या गावाकडे निघाले असले अद्यापही अनेक कामगार अडकून आहेत. प्रवासासाठी एखादे साधन मिळेल या प्रतीक्षेत ही मंडळी असल्याने शहराबाहेर त्यांचे जत्थ्ये दिसत आहेत. मध्य प्रदेशातील जौनपूर येथील २० मजूर हुडकेश्वरमधील राजापेठ बसस्थानकाजवळ सोमवारी सकाळी अडकून पडले होते. त्याच्या जेवणाचे हाल सुरू असल्याने त्यांनी मदतीसाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे. गावाकडे जाण्यासाठी काहीतरी साधन मिळेल, या आशेने ते या ठिकाणी थांबले होते, अशी माहिती आहे.बुटी कन्या शाळेचा निवारा नावापुरतामहानगरपालिकेने सीताबर्डी येथील सुपर मार्केटमागे असलेल्या बुटी कन्या शाळेत शहरी बेघर निवारा उभारला असून येथे २८ व्यक्तींच्या निवाºयाची व्यवस्था असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात हा निवारा नावापुरताच आहे. या शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. पिल्लरचेही काम सुरू असल्याने निवासासारखी सुविधा येथे शक्य नाही. तरीही महानगरपालिकेने येथे काही गाद्या टाकून विश्रांतीची व्यवस्था केली आहे. मात्र येथे सोमवारी फक्त एकच व्यक्ती थांबलेला होता.निवारे अपुरेशहरात उभारलेले निवारे आता अपुरे पडत आहेत. या निवाऱ्यांची क्षमता १ हजार २६२ असली तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे अनेक निवाºयांमध्ये बेडमधील अंतर वाढविले आहे. गणेशमंदिर टेकडी रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली असलेल्या गाळ्यांमध्ये ३० जणांच्या निवाऱ्यांची क्षमता असली तरी येथे बेडमध्ये अंतर राखण्यात आल्याने जेमतेम १५ ते १६ व्यक्तींच्याच निवाºयाची व्यवस्था झाली आहे. यामुळे निवारे अपुरे पडत असल्याने ते वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस